शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पाणीटंचाईबाबत उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:35 IST

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस होऊनही पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अनेक गावांमध्ये विहिरी व इंधन विहिरी ...

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस होऊनही पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अनेक गावांमध्ये विहिरी व इंधन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. अजूनही अनेक गावांमध्ये अधिग्रहणाची आवश्यकता आहे. तिथे प्रशासनाने सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे यांनी केली आहे.

दुचाकीस्वारांना होतोय धुळीचा त्रास

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील रिंगरोडचे काम गेल्या वर्षभरापासून सुरूच आहे. हे काम करणाऱ्या कंत्राटदार यांनी एका बाजूने रस्ता उखडून व खोदून ठेवला, मात्र रस्त्याचे काम केले नाही. परिणामी रस्त्यावर मोठी धूळ साचली आहे. याचा मोठा त्रास वाहनचालकांना होत आहे. या रस्त्याचे रखडलेले काम लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी रिपाइंच्या महिला आघाडीच्या जिल्हा सचिव राणी गायकवाड यांनी केली आहे.

खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग

अंबाजोगाई : उन्हाळी हंगामात शेतकरी प्रामुख्याने खरीप हंगामाची तयारी करतात. पेरणीपूर्वी शेतजमीन नांगरणे, कोळपणे, वेचणी करणे, बांधावर उगवलेली झाडे-झुडपे काढणे, आदी कामे सुरू आहेत. या सर्व कामांना वेग आला आहे.

वातावरणात बदल; थंडी-तापाचे रुग्ण वाढले

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे. दोनवेळा पाऊस पडला; तर आता दररोज आभाळ भरून येते. त्यामुळे कधी उन्ह, तर कधी पाऊस अशा वातावरणातील बदलांमुळे थंडी-तापाचे रुग्ण वाढले आहेत.

लपून- छपून अनेक व्यवसाय सुरूच

अंबाजोगाई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले आहे. अनेक कडक नियम लागू केले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवांना मुभा दिली आहे. असे असले तरीही शहरातील अनेक भागांत अनेक व्यावसायिक आपली दुकाने लपून छपून सुरूच ठेवत आहेत. पोलिसांनी अशा अनेकांवर कारवाई केली, तरीही पुन्हा लपून व्यवसाय सुरूच आहेत.