शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

रस्त्यावरुन ओढले रेल्वेचे प्रतीकात्मक इंजिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:38 IST

बीड : रेल्वेकडे डोळे लावून बसलेल्या बीडकरांनी २० ऑगस्ट रोजी जिल्हावासीयांच्या अस्मितेच्या नगर-बीड- परळी रेल्वेमार्गाचे काम रखडल्याने प्रशासनाने लक्ष ...

बीड :

रेल्वेकडे डोळे लावून बसलेल्या बीडकरांनी २० ऑगस्ट रोजी

जिल्हावासीयांच्या अस्मितेच्या नगर-बीड- परळी रेल्वेमार्गाचे काम रखडल्याने प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी २० ऑगस्ट रोजी शहरातून रेल्वेचे प्रतीकात्मक इंजिन ओढत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आले. रखडलेला रेल्वेप्रश्न रुळावर आणण्यासाठी चक्क रस्त्यावरुन इंजिन ढकलण्यात आले. या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी होते.

या स्थळापर्यंत ओढत घेऊन जाऊन प्रतीकात्मक रेल्वेचे उद्घाटन करण्यासाठी सेल्फी स्टॅन्ड ठेवण्यात आले. या अनोख्या आंदोलनाची बीडमध्ये चर्चा झाली.

जिल्ह्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या रेल्वेप्रश्नावर आजपर्यंत अनेकदा आंदोलने झाली. अनेक वर्षांपासून अनेक आंदोलने झाली, परंतु सरकार व राजकीय इच्छाशक्ती नसलेले लोकप्रतिनिधी व आडमुठे प्रशासन यांच्यामुळे नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गास उशीर झाला. रेल्वे मार्गासाठी राज्याने ५० टक्के व केंद्राने ५० टक्के वाटा उचलला. मात्र, प्रत्येकवेळी निराशाच झाली. प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून रेल्वेचे प्रतीकात्मक इंजिन ओढत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेले. यावेळी

कृती समितीचे अध्यक्ष जयप्रकाश आघाव, उपाध्यक्ष ॲड.गणेश करांडे, सचिव संगमेश्वर आंधळकर, ॲड.अंबादास आगे, मोहन जाधव, ॲड.शैलेश जाधव, नगरसेवक युवराज जगताप, राजेश शिंदे, गणेश मस्के, ॲड.महेश धांडे, राजेंद्र नाईकवाडे,मळीराम यादव, जोतीराम हुरकुडे,चेतन पोर्कणा, ॲड.शफिक शेख,बाबू लव्हाळे आदी सहभागी झाले होते. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी रेल्वेमार्गाचे प्रतीकात्मक उद्घाटन करण्यात आले. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता.

...

रेल्वेचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित ठेवल्याने विकास खुंटला. या प्रश्नावर अनेक वर्षे राजकारण झाले.अनेकांनी सोयीपुरता हा प्रश्न हाताळला, पण जिल्हावासीयांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे प्रतीकात्मक आंदोलन करुन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

- संगमेश्वर आंधळकर, आंदोलक

...

नगर-बीड- परळी रेल्वेसाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली; मात्र प्रत्येकवेळी केवळ आश्वासने देण्यात आली. खुद्द पंतप्रधानांनी बीडमध्ये झालेल्या सभेत रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले;मात्र अजूनही या कामास गती मिळाली नाही.

- ॲड.शैलेश जाधव, आंदोलक

....