शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

रस्त्यावरुन ओढले रेल्वेचे प्रतीकात्मक इंजिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:38 IST

बीड : रेल्वेकडे डोळे लावून बसलेल्या बीडकरांनी २० ऑगस्ट रोजी जिल्हावासीयांच्या अस्मितेच्या नगर-बीड- परळी रेल्वेमार्गाचे काम रखडल्याने प्रशासनाने लक्ष ...

बीड :

रेल्वेकडे डोळे लावून बसलेल्या बीडकरांनी २० ऑगस्ट रोजी

जिल्हावासीयांच्या अस्मितेच्या नगर-बीड- परळी रेल्वेमार्गाचे काम रखडल्याने प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी २० ऑगस्ट रोजी शहरातून रेल्वेचे प्रतीकात्मक इंजिन ओढत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आले. रखडलेला रेल्वेप्रश्न रुळावर आणण्यासाठी चक्क रस्त्यावरुन इंजिन ढकलण्यात आले. या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी होते.

या स्थळापर्यंत ओढत घेऊन जाऊन प्रतीकात्मक रेल्वेचे उद्घाटन करण्यासाठी सेल्फी स्टॅन्ड ठेवण्यात आले. या अनोख्या आंदोलनाची बीडमध्ये चर्चा झाली.

जिल्ह्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या रेल्वेप्रश्नावर आजपर्यंत अनेकदा आंदोलने झाली. अनेक वर्षांपासून अनेक आंदोलने झाली, परंतु सरकार व राजकीय इच्छाशक्ती नसलेले लोकप्रतिनिधी व आडमुठे प्रशासन यांच्यामुळे नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गास उशीर झाला. रेल्वे मार्गासाठी राज्याने ५० टक्के व केंद्राने ५० टक्के वाटा उचलला. मात्र, प्रत्येकवेळी निराशाच झाली. प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून रेल्वेचे प्रतीकात्मक इंजिन ओढत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेले. यावेळी

कृती समितीचे अध्यक्ष जयप्रकाश आघाव, उपाध्यक्ष ॲड.गणेश करांडे, सचिव संगमेश्वर आंधळकर, ॲड.अंबादास आगे, मोहन जाधव, ॲड.शैलेश जाधव, नगरसेवक युवराज जगताप, राजेश शिंदे, गणेश मस्के, ॲड.महेश धांडे, राजेंद्र नाईकवाडे,मळीराम यादव, जोतीराम हुरकुडे,चेतन पोर्कणा, ॲड.शफिक शेख,बाबू लव्हाळे आदी सहभागी झाले होते. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी रेल्वेमार्गाचे प्रतीकात्मक उद्घाटन करण्यात आले. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता.

...

रेल्वेचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित ठेवल्याने विकास खुंटला. या प्रश्नावर अनेक वर्षे राजकारण झाले.अनेकांनी सोयीपुरता हा प्रश्न हाताळला, पण जिल्हावासीयांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे प्रतीकात्मक आंदोलन करुन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

- संगमेश्वर आंधळकर, आंदोलक

...

नगर-बीड- परळी रेल्वेसाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली; मात्र प्रत्येकवेळी केवळ आश्वासने देण्यात आली. खुद्द पंतप्रधानांनी बीडमध्ये झालेल्या सभेत रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले;मात्र अजूनही या कामास गती मिळाली नाही.

- ॲड.शैलेश जाधव, आंदोलक

....