शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

शासनाच्या पंचनाम्यानुसार मिळणार विमा रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:37 IST

बीड : २०२० या वर्षातील खरीप हंगमात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, ७२ तासांच्या आत विमा ...

बीड : २०२० या वर्षातील खरीप हंगमात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, ७२ तासांच्या आत विमा कंपनीला यासंदर्भात माहिती न दिल्यामुळे १७ लाख शेतकरी सभासदांपैकी फक्त २० हजार शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाली होती. त्यामुळे शासकीय पंचनाम्यानुसार विमा देण्यात यावा, अशी विविध शेतकरी संघटनांकडून करण्यात आली होती. त्याचा विचार करून ‘एनडीआरएफ’च्या नुकसान याद्यानुसार विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्याचा विचार शासनस्तरावरून झाला असून, त्यासाठी पुढील कार्यवाही जिल्हा प्रशासनस्तरावर सुरू करण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि व ज्यांची नावे एनडीआरएफच्या मदतीच्या यादीत आहेत, त्यांच्यातील जे पीक विमाधारक असतील त्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश राज्य सरकारने विमा कंपनीला दिले आहेत. अशा शेतकऱ्यांची माहिती जमविण्याचे आदेश राज्याच्या कृषी आयुक्तांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. बीड जिल्ह्यात मागील वर्षीच्या खरीप हंगामात काढणीच्यावेळी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातील ज्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीला तातडीने सूचना दिली आणि ज्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले त्यांना काढणीपश्चात नुकसान म्हणून नुकसानभरपाई देण्यात आली. मात्र, लाखो शेतकरी विमा कंपनीला वेळेत सूचना देऊ शकले नव्हते. परिणामी असे शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहिले आहेत. या निर्णयामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासंदर्भात सरकारने विमा कंपनीला निर्देश दिले आहेत. मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याचे पंचनामे महसूल विभागाने केले आहेत. अशा शेतकऱ्यांना एनडीआरएफ (नैसर्गिक आपत्ती निधी)मधून मदत देण्यात आली आहे. आता तीच यादी ग्राह्य धरून यातील जे शेतकरी विमाधारक आहेत आणि ज्यांना अद्याप पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यांना नुकसानभरपाई देण्याचे निर्देश सरकारने कंपनीला दिले आहेत. यासाठी अशा शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे आदेश राज्याच्या कृषी आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

असा होता २०२० मधील खरीप विमा आराखडा

विमा भरलेल्या शेतकरी सभासदांची संख्या १७ लाख ९१ हजार ५२२

शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम ६० कोटी ७२ लाख

राज्य सरकारने भरलेले पैसे ४०५ कोटी ९६ लाख

केंद्र सरकारने भरलेले पैसे ३३९ कोटी ८९ लाख

विमा मिळालेली रक्कम १३ कोटी

विमा मिळालेले शेतकरी सभासद १९ हजार ३४४

विमा न मिळालेल्या शेतकरी सभासद १७ लाख ७२ हजार

कृषी आयुक्तांच्या पत्रानुसार जिल्हा प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन निधी देण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या याद्यांची पडताळणी करण्यात येत असून, लवकरच शासनाकडे नुकसान होऊनदेखील लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी शासनाकडे पाठविण्यात येईल.

जिल्हाधिकारी बीड