शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बस वेळेवर सुटत नसल्याने कडा येथे विद्यार्थींनीना स्थानकातच करावा लागतो अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 19:11 IST

गेल्या अनेक वर्षांपासून आष्टी आगाराचे नियोजन कोलमडले असल्याने ग्रामीण भागातील सुटणा-या आॅर्डिनरी बस वेळेवर येत  नाही. त्यामुळे रोजच विद्यार्थ्यांना घरी जायला अंधार पडतो. त्यामुळे या विद्यार्थिनींवर बसची वाट पाहत बसस्थानकात अभ्यास करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देआष्टी आगाराचे नियोजन कोलमडले बसस्थानकातच विद्यार्थिनींचा अभ्यासबिघडलेल्या वेळापत्रकाकडे आगर प्रमुखांचे दुर्लक्षबस वेळेवर सोडण्याची मागणी

कडा (बीड ) : गेल्या अनेक वर्षांपासून आष्टी आगाराचे नियोजन कोलमडले असल्याने ग्रामीण भागातील सुटणा-या आॅर्डिनरी बस वेळेवर येत  नाही. त्यामुळे रोजच विद्यार्थ्यांना घरी जायला अंधार पडतो. त्यामुळे या विद्यार्थिनींवर बसची वाट पाहत बसस्थानकात अभ्यास करण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची सुरक्षा वा-यावर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

आष्टी तालुक्यातील कडा या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा परिषद, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय असल्याने तालुक्यातून विद्यार्थी, विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. घरातून सकाळी सात वाजता बस थांब्यावर येऊन उभा राहावे लागते. मग येणाºया बसमध्ये बसून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शाळा, कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घ्यायचे आणि चार वाजता पुन्हा बसस्थानकात येऊन उपाशीपोटी उभा राहत आॅर्डिनरी बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते. या सा-या गोष्टींमुळे घरी जायला उशीर होऊन म्हणून अभ्यास करायला वेळ मिळत नाही. यावर उपाय म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसस्थानक परिसरातच अभ्यास करावा लागत आहे. ही परिस्थिती एक दिवसापुरतीच नव्हे तर वर्षानुवर्ष दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने याकडे गांभीर्याने पाहून अवेळी सुटणा-या आॅर्डिनरी बस वेळेवर सोडाव्यात, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे.

आम्ही खेड्यापाड्यातून शिक्षण घेण्यासाठी शहरात येतो; पण शाळेतून घरी येईपर्यंत आई, वडील काळजी करतात; परंतु बस वेळेवर येत नसल्याने वाट पाहण्याशिवाय पर्याय नसल्याचे उंदरखेल येथील दहावीच्या रूपाली शेकडे, वृषाली वामन यांनी सांगितले. बस वेळेवर येत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो. तसेच तहान- भूक विसरुन बससाठी ताटकळावे लागते. शिक्षणासाठी येणा-या ग्रामीण विद्यार्थ्यांची अशा प्रकारे हेळसांड होत आहे. 

लवकरच सुरळीत होईल

सध्या शाळेच्या शैक्षणिक सहली जात असल्याने बसेस वेळेवर उपलब्ध करण्यात अडचणी येत आहेत. आम्ही वरिष्ठांकडे यासंदर्भात मागणी केली असून, लवकरच सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे आष्टी आगार प्रमुख राजेंद्र दिवटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

परिवहन मंत्र्यांना निवेदन देणारअनेक ठिकाणी शाळेतून घरी जाताना उशीर झाल्याने विद्यार्थिनींवर वाईटप्रसंग ओढवल्याच्या घटना घडल्या असताना देखील यातून  कसलाच धडा न घेता एस.टी. महामंडळाला कसलेच गांभीर्य नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची सुरक्षा वा-यावर आली आहे. आष्टी आगाराने अवेळी सुटणा-या बसेस किमान वेळेवर तरी सोडाव्यात यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन देणार असल्याचे कडा येथील सरपंच दीपमाला ढोबळे यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडStudentविद्यार्थी