शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

बस वेळेवर सुटत नसल्याने कडा येथे विद्यार्थींनीना स्थानकातच करावा लागतो अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 19:11 IST

गेल्या अनेक वर्षांपासून आष्टी आगाराचे नियोजन कोलमडले असल्याने ग्रामीण भागातील सुटणा-या आॅर्डिनरी बस वेळेवर येत  नाही. त्यामुळे रोजच विद्यार्थ्यांना घरी जायला अंधार पडतो. त्यामुळे या विद्यार्थिनींवर बसची वाट पाहत बसस्थानकात अभ्यास करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देआष्टी आगाराचे नियोजन कोलमडले बसस्थानकातच विद्यार्थिनींचा अभ्यासबिघडलेल्या वेळापत्रकाकडे आगर प्रमुखांचे दुर्लक्षबस वेळेवर सोडण्याची मागणी

कडा (बीड ) : गेल्या अनेक वर्षांपासून आष्टी आगाराचे नियोजन कोलमडले असल्याने ग्रामीण भागातील सुटणा-या आॅर्डिनरी बस वेळेवर येत  नाही. त्यामुळे रोजच विद्यार्थ्यांना घरी जायला अंधार पडतो. त्यामुळे या विद्यार्थिनींवर बसची वाट पाहत बसस्थानकात अभ्यास करण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची सुरक्षा वा-यावर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

आष्टी तालुक्यातील कडा या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा परिषद, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय असल्याने तालुक्यातून विद्यार्थी, विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. घरातून सकाळी सात वाजता बस थांब्यावर येऊन उभा राहावे लागते. मग येणाºया बसमध्ये बसून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शाळा, कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घ्यायचे आणि चार वाजता पुन्हा बसस्थानकात येऊन उपाशीपोटी उभा राहत आॅर्डिनरी बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते. या सा-या गोष्टींमुळे घरी जायला उशीर होऊन म्हणून अभ्यास करायला वेळ मिळत नाही. यावर उपाय म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसस्थानक परिसरातच अभ्यास करावा लागत आहे. ही परिस्थिती एक दिवसापुरतीच नव्हे तर वर्षानुवर्ष दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने याकडे गांभीर्याने पाहून अवेळी सुटणा-या आॅर्डिनरी बस वेळेवर सोडाव्यात, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे.

आम्ही खेड्यापाड्यातून शिक्षण घेण्यासाठी शहरात येतो; पण शाळेतून घरी येईपर्यंत आई, वडील काळजी करतात; परंतु बस वेळेवर येत नसल्याने वाट पाहण्याशिवाय पर्याय नसल्याचे उंदरखेल येथील दहावीच्या रूपाली शेकडे, वृषाली वामन यांनी सांगितले. बस वेळेवर येत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो. तसेच तहान- भूक विसरुन बससाठी ताटकळावे लागते. शिक्षणासाठी येणा-या ग्रामीण विद्यार्थ्यांची अशा प्रकारे हेळसांड होत आहे. 

लवकरच सुरळीत होईल

सध्या शाळेच्या शैक्षणिक सहली जात असल्याने बसेस वेळेवर उपलब्ध करण्यात अडचणी येत आहेत. आम्ही वरिष्ठांकडे यासंदर्भात मागणी केली असून, लवकरच सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे आष्टी आगार प्रमुख राजेंद्र दिवटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

परिवहन मंत्र्यांना निवेदन देणारअनेक ठिकाणी शाळेतून घरी जाताना उशीर झाल्याने विद्यार्थिनींवर वाईटप्रसंग ओढवल्याच्या घटना घडल्या असताना देखील यातून  कसलाच धडा न घेता एस.टी. महामंडळाला कसलेच गांभीर्य नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची सुरक्षा वा-यावर आली आहे. आष्टी आगाराने अवेळी सुटणा-या बसेस किमान वेळेवर तरी सोडाव्यात यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन देणार असल्याचे कडा येथील सरपंच दीपमाला ढोबळे यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडStudentविद्यार्थी