शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

राज्यभर भगव्या विचाराचे वादळ अधिक गतीने पसरतंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 11:43 PM

मिळालेल्या संधीचा लाभ लोककल्याण, विकासाची अधिक कामे करून घेणार असून याकामी मला आपले आशिर्वाद आणि खंबीर साथ आवश्यक आहे, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : शिवसेनेने दिलेल्या संधीचे विकासासाठी करणार सोने; सर्वांगीण विकासाच्या विविध योजनांसाठी प्रयत्न

बीड : येत्या २१ तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होऊ घातली असून राज्याच्या कानाकोपऱ्यात भगव्या विचाराचे वादळ अधिक गतीने पसरत आहे. शिवसेना पक्षाने मला संधी दिली आहे. मिळालेल्या संधीचा लाभ लोककल्याण, विकासाची अधिक कामे करून घेणार असून याकामी मला आपले आशिर्वाद आणि खंबीर साथ आवश्यक आहे, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले.रविवारी शहरातील कबाड गल्ली भागातील आदर्श नवरात्र महोत्सवात क्षीरसागर यांच्याहस्ते देवीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर माजी सभापती बाळासाहेब जाधव यांच्या निवासस्थानी त्यांनी सदीच्छा भेट दिली. यावेळी जयदत्त क्षीरसागर बोलत होते. याप्रसंगी विलास बडगे, प्रा.जगदीश काळे, माजी सभापती बाळासाहेब जाधव, बंडूभाऊ कदम आदींची उपस्थिती होती.नवरात्रीच्या पवित्र काळात प्रत्येक घरोघरी आई भवानीची मनोभावे सेवा केली जाते. नवरात्र उत्सवाची या भागाची परंपरा असून स्व.किसन जाधव, स्व.राजेंद्र जाधव यांनी सुरू केलेल्या उत्सवाची परंपरा आजही बाळासाहेब जाधव, बंडू कदम यांनी सर्वाना सोबत घेऊन मोठ्या उत्साहाने कायम ठेवली आहे. आदर्श नावाप्रमाणे उत्सव ही आदर्श पध्दतीने संपन्न होत असल्याचे जयदत्त क्षीरसागर म्हणाले.पुढे बोलतांना क्षीरसागर म्हणाले की, शहराच्या मूलभूत गरजांसोबतच सर्वांगीण विकासाच्या विविध योजना शासन दरबारी पाठपुरावा करून पदरात पाडून घ्याव्या लागतात. शहरात सुरू असलेल्या अमृत पाणी पुरवठा, ड्रेनेज योजनेमुळे शहराची भविष्यातील व्याप्ती आणि लोकसंख्या लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन केले आहे. आतापर्यंत विकासाच्या अनेक योजना प्रत्यक्षात शहरात आणून विकास करण्याचा व सुविधा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यापुढेही विकासाठी प्रयत्नशील राहील. भविष्यात संधी आणि आशिर्वादाचा मला विश्वास असल्याचे ते जयदत्त क्षीरसागर यावेळी म्हणाले.कबाड गल्ली परिसराने मला मागील काळापासून स्नेह दिला असून हा भाग राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रभावी आणि मध्यवर्ती असून शिवसेनेचा उगम येथूनच झाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जय भवानी जय शिवाजीचा जयघोष याच भागातून शहरात वाºयासारखा पसरला. शहराला दिशा देण्याचे काम या भागाने आजपर्यत केले असून हाच वारसा पुढील काळात ही जोपासला जावा. कबाड गल्ली परिसराशी माझे मागील काळापासून स्नेहाचे नाते असून स्नेहाचा हा धागा भविष्यातही अधिक मजबूज राहील असा ठाम विश्वास आहे.- जयदत्त क्षीरसागर, रोहयो मंत्री

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना