शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

टाकरवण येथे गोधनासह शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:51 IST

दुष्काळात जनावरांना चारा छावणीऐवजी शेतकºयांना दावणीला चारा द्या, गाय, बैल, म्हैस व इतर पाळीव प्राण्यांना प्रती जनावर वीस हजार रु पये चारा अनुदान द्या, यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारी शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देभाकड जनावरे जगवायची कशी ?: आंदोलकांचा सवाल, २० हजार रु. अनुदानाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कटाकरवण : दुष्काळात जनावरांना चारा छावणीऐवजी शेतकºयांना दावणीला चारा द्या, गाय, बैल, म्हैस व इतर पाळीव प्राण्यांना प्रती जनावर वीस हजार रु पये चारा अनुदान द्या, यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारी शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलन केले.माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथे भगतसिंग चौकात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ बंडूराम गरड यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनातशेतकरी गोधन व बैलगाड्यांसह सहभागी झाले होते. सरकारचा गोवंशाचा पुळका फसवा असल्याचा आरोप करून कॉ. गरड म्हणाले की, सरकारने गाय, बैल विकण्यास प्रतिबंध करणारा कायदा करून शेतकºयांचा भुर्दंड वाढवला आहे. त्यामुळे आता अनुत्पादक व भाकड जनावरे पोसावी लागत आहेत. दुष्काळात कामाच्या व दुभत्या जनावरांना सांभाळणे मुश्किल झाले असताना आता भाकड जनावरांचे करायचे काय हा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. सरकारने आता दुष्काळात प्रत्येक जनावरांना वीस हजार रु पये चारा अनुदान द्यावे व अनुदानाची रक्कम शेतकºयांच्या खात्यात वर्ग करुन आपण गोवंशाचे रक्षक असल्याचे सिद्ध करावे, असे यावेळी आंदोलनकर्ते व शेतकºयांना मार्गदर्शन करताना कॉ. गरड म्हणाले.चारा छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने चारा छावण्यांऐवजी शेतकºयांना थेट चारा अनुदान द्यावे, प्रत्येक जनावरामागे शेतकºयांना वीस हजार रु पये चारा भत्ता द्यावा, रोजगार हमीची कामे तात्काळ सुरु करु न या कामावर रोज किमान ६०० सहाशे रु पये वेतन द्यावे, शेतातील पिके नष्ट झाल्याने शेतकºयाला प्रतीहेक्टरी पन्नास हजार रु पये नुकसान भरपाई द्यावी, थकित पिक विम्याची रक्कम शेतकºयांना तात्काळ वाटप करावी, गरीब शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, सर्व शेतमजूर व शेतकºयांची नावे अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करून त्यांना प्रतीमाह ३५ किलो धान्य २ रु पये किलो दराने वाटप करावे, शेतकºयांचे वीज बिल माफ करावे, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची फीस माफ करावी, कापसाला प्रति क्विंटल नऊ हजार रु पये भाव द्यावा, ऊसाला तीन हजार रु पये एफ आर पी द्यावा इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या.या मागण्यांचे निवेदन तलाठी ए.के. सपकाळ यांना देण्यात आले. या आंदोलनात माकपचे शांतीलाल पटेकर, बाबासाहेब पटेकर, रेणुकादास सुरवसे, मोहन भुंबे, शेतमजूर युनियनचे बळीराम भुंबे, किसान सभेचे नेते भाऊसाहेब झिरपे, बापू लव्हाळे, शिवाजी गायकवाड, मधुकर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर लव्हाळे, सखाराम गरड, किसन कोरडे, अभिमान शिंदे, दादा लव्हाळे, शाहूराव लव्हाळे, सूर्यभान अडागळे, गुलाब गरड, अशोक गरड, रोहिदास मस्के, गंगाराम काळे यांच्यासह शेतकरी बैलगाडी व जनावरांसह सहभागी झाले होते.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलन