शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

टाकरवण येथे गोधनासह शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:51 IST

दुष्काळात जनावरांना चारा छावणीऐवजी शेतकºयांना दावणीला चारा द्या, गाय, बैल, म्हैस व इतर पाळीव प्राण्यांना प्रती जनावर वीस हजार रु पये चारा अनुदान द्या, यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारी शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देभाकड जनावरे जगवायची कशी ?: आंदोलकांचा सवाल, २० हजार रु. अनुदानाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कटाकरवण : दुष्काळात जनावरांना चारा छावणीऐवजी शेतकºयांना दावणीला चारा द्या, गाय, बैल, म्हैस व इतर पाळीव प्राण्यांना प्रती जनावर वीस हजार रु पये चारा अनुदान द्या, यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारी शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलन केले.माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथे भगतसिंग चौकात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ बंडूराम गरड यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनातशेतकरी गोधन व बैलगाड्यांसह सहभागी झाले होते. सरकारचा गोवंशाचा पुळका फसवा असल्याचा आरोप करून कॉ. गरड म्हणाले की, सरकारने गाय, बैल विकण्यास प्रतिबंध करणारा कायदा करून शेतकºयांचा भुर्दंड वाढवला आहे. त्यामुळे आता अनुत्पादक व भाकड जनावरे पोसावी लागत आहेत. दुष्काळात कामाच्या व दुभत्या जनावरांना सांभाळणे मुश्किल झाले असताना आता भाकड जनावरांचे करायचे काय हा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. सरकारने आता दुष्काळात प्रत्येक जनावरांना वीस हजार रु पये चारा अनुदान द्यावे व अनुदानाची रक्कम शेतकºयांच्या खात्यात वर्ग करुन आपण गोवंशाचे रक्षक असल्याचे सिद्ध करावे, असे यावेळी आंदोलनकर्ते व शेतकºयांना मार्गदर्शन करताना कॉ. गरड म्हणाले.चारा छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने चारा छावण्यांऐवजी शेतकºयांना थेट चारा अनुदान द्यावे, प्रत्येक जनावरामागे शेतकºयांना वीस हजार रु पये चारा भत्ता द्यावा, रोजगार हमीची कामे तात्काळ सुरु करु न या कामावर रोज किमान ६०० सहाशे रु पये वेतन द्यावे, शेतातील पिके नष्ट झाल्याने शेतकºयाला प्रतीहेक्टरी पन्नास हजार रु पये नुकसान भरपाई द्यावी, थकित पिक विम्याची रक्कम शेतकºयांना तात्काळ वाटप करावी, गरीब शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, सर्व शेतमजूर व शेतकºयांची नावे अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करून त्यांना प्रतीमाह ३५ किलो धान्य २ रु पये किलो दराने वाटप करावे, शेतकºयांचे वीज बिल माफ करावे, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची फीस माफ करावी, कापसाला प्रति क्विंटल नऊ हजार रु पये भाव द्यावा, ऊसाला तीन हजार रु पये एफ आर पी द्यावा इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या.या मागण्यांचे निवेदन तलाठी ए.के. सपकाळ यांना देण्यात आले. या आंदोलनात माकपचे शांतीलाल पटेकर, बाबासाहेब पटेकर, रेणुकादास सुरवसे, मोहन भुंबे, शेतमजूर युनियनचे बळीराम भुंबे, किसान सभेचे नेते भाऊसाहेब झिरपे, बापू लव्हाळे, शिवाजी गायकवाड, मधुकर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर लव्हाळे, सखाराम गरड, किसन कोरडे, अभिमान शिंदे, दादा लव्हाळे, शाहूराव लव्हाळे, सूर्यभान अडागळे, गुलाब गरड, अशोक गरड, रोहिदास मस्के, गंगाराम काळे यांच्यासह शेतकरी बैलगाडी व जनावरांसह सहभागी झाले होते.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलन