शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

हरभरा घसरल्याने स्टॉकिस्ट व्यापाऱ्यांचा आतबट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:30 IST

आडत बाजारात नवा मूग आणि उडदाची आवक कमी प्रमाणात होत आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने संभाव्य उत्पादन घटणार असल्याचे दृष्टीपथात आहे. तर चार महिन्यांपूर्वी शासनाच्या हमीदरापेक्षा जादा भाव देत खरेदी करून स्टॉक करणाºया हरभरा व्यापाºयांचा आतबट्टा झाला आहे.

ठळक मुद्देपावसाअभावी आडत बाजारात आवक मंदावली; मुगाची साधारण आवक

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आडत बाजारात नवा मूग आणि उडदाची आवक कमी प्रमाणात होत आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने संभाव्य उत्पादन घटणार असल्याचे दृष्टीपथात आहे. तर चार महिन्यांपूर्वी शासनाच्या हमीदरापेक्षा जादा भाव देत खरेदी करून स्टॉक करणाºया हरभरा व्यापाºयांचा आतबट्टा झाला आहे.बीड येथील आडत बाजारात उडीद आणि मुगाची रोज प्रत्येकी १०० क्विंटल आवक होत आहे. उडदाला ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये भाव मिळत आहे. तर मुगाला ४ हजार ५०० ते ५४०० रुपये भाव आहे. बाजरीचीही साधारण आवक असून उत्तम प्रतीच्या बाजरीला १६०० रुपये प्रती क्विंटल तर हलक्या प्रतीला १२०० रुपये भाव आहे.मागील हंगामात शासनाने हरभºयाला ४ हजार ४०० रुपये हमीभाव दिला होता. तसेच उत्पादनही बंपर झाले होते. नाफेडमार्फत मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. दुसरीकडे बाजारात हमीदरापेक्षा जादा दराने ५ हजार २०० रुपयांपर्यंत व्यापाºयांनी हरभरा खरेदी केला होता. भविष्यात तेजीच्या आशेने काही व्यापाºयांनी खरेदी केलेल्या हरभरा स्टॉक केला होता. परंतु, मागील तीन महिन्यात बाजारात हरभºयाच्या दरात घसरण होत राहिली. सध्या ३ हजार २०० रुपये क्विंटल भाव आहे. त्यामुळे जादा दराने खरेदी केलेल्या व्यापाºयांना बाजारदरानुसार प्रतिक्विंटल एक हजार ते १५०० रुपयांचा फटका बसू शकतो. त्यामुळे हरभरा विक्री करण्यास स्टॉकिस्ट व्यापारी धजावत नसल्याचे दिसते.बफर स्टॉक करणाºया व्यापाºयांना गुंतवणुकीवरील व्याज, गोदाम भाडे परवडेनासे झाले आहे. तसेच हरभºयाचा दर्जा घसरण्याची भीती सतावत आहे. सध्या बाजारत घसरलेले दर पाहता हरभरा व्यापाºयांना त्यात मुद्दलात नुकसानीची वेळ आली आहे.घ्यायला गेलं तर मिळत नाही, मिळालं तर विकत नाहीयंदा कमी पावसामुळे उत्पादकता घटणार आहे. तसेच मंदीचे वारे असल्याने तसेच शेतकरी व व्यापाºयांकडे स्टॉक नसल्याने आडत बाजारात मोठ्या प्रमाणात आवक घटली आहे. यंदा कापसाचे ५० टक्के तर सोयाबीनचे ६० टक्के उत्पादन हाती लागेल असा अंदाज आहे.खरेदी करावे तर बाजारात माल नाही, मिळाले तर पुढे चांगला भाव नाही, आणि विकत नाही अशी स्थिती असल्याचे बीड येथील आडत व्यापारी विष्णूदास बियाणी यांनी सांगितले. तर पाऊस नसल्याने परळीच्या बाजारपेठेत मूग वगळता इतर सर्व मालाची आवक नसल्यासारखी आहे. नविन सोयाबीनला अजून दोन आठवडे अवकाश असल्याचे आडत व्यापारी महावीर कोटेचा यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रMarket Yardमार्केट यार्ड