शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भरधाव वेगातील वाळूच्या टिपरने दुचाकीला उडवले; तीन तरुण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 23:52 IST

अंबाजोगाई जवळ झाला भीषण अपघात

ठळक मुद्देलॉकडाऊनमधेही वाळूची अवैध वाहतूक सुरूच

अंबाजोगाई : परळीकडून वाळू घेऊन अंबाजोगाईच्या दिशेने निघालेल्या भरधाव वेगातील टिपरने दिलेल्या धडकेत तीन तरुण जागीच ठार झाले. हा भीषण अपघात अंबाजोगाई-परळी रोडवरील काळवीट तांडा परिसरात शनिवारी (दि.०८) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास झाला. मयत तिघेही तरुण परळी तालुक्यातील वानटाकळी येथील आहेत. 

नागनाथ महादेव गायके (वय ३५), वसंत जनार्दन गायके (वय ४५) आणि विठ्ठल मुंजाजी गायके (वय २३) अशी अपघातातील मयत तरुणांची नावे आहेत. हे तिघेजण शनिवारी रात्री दुचाकीवरून (एमएच १३ बीडी ५६८४) गावाकडे निघाले होते. ते काळवीट तांडा परिसरात आले असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या वाळूच्या टिपरने (एमएच २५ यु २४४४) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता कि दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरिक्षक महादेव राऊत यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. 

लॉकडाऊनमधेही वाळूची अवैध वाहतूक सुरूच :दरम्यान, लॉकडाऊन सुरु असतानाही वाळू माफिया मात्र कुठलेही निर्बंध पाळत नसल्याचे आजच्या अपघाताने पुन्हा एकदा उघड झाले आहे. रात्रीच्या वेळी परळीहून पठाण मांडवा मार्गे अनेक गाड्या अंबाजोगाईच्या दिशेने येत असतात. लॉकडाऊनमध्येही वाळूची अवैध वाहतूक अव्याहतपणे सुरु आहे. सर्वसामान्य नागरिकांना लॉकडाऊनमुळे कायद्याचा बडगा दाखविणाऱ्या प्रशासनाची वाळू माफियांबद्द्ल बोटचेपी भूमिका कशासाठी असा सवाल नागरिक करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूBeedबीड