शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाच्या कामास मिळेना गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 13:14 IST

काम सुरु केले तेव्हा या मार्गाकरिता २ हजार ८२६ कोटी एवढा खर्च अंदाजित होता.

ठळक मुद्देकामाचा अंदाजित खर्च वाढला आणखी दोन वर्षे करावी लागणार प्रतीक्षा

- सतीश जोशी  

बीड : बीड जिल्ह्यासाठी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाचे काम २०२२ पर्यंतही पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत. या मार्गावर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रेल्वे धावेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बीडच्या जाहीर सभेत दिले होते. अतिशय संथगतीने हे काम चालू असून २०२० साल उजाडले तरी ५० टक्केही काम पूर्णत्वास गेलेले नाही. 

या रेल्वेमार्गास फेब्रुवारी १९९७ मध्ये मान्यता देण्यात आली, तेव्हा रेल्वेमार्ग प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च हा २२७१ कोटी ५० लाख इतका होता. जास्तीत जास्त २०२१ पर्यंत हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे ठरले होते. मध्य रेल्वे विभागाने कामासंदर्भात डिसेंबर २०१९ चा मासिक अहवाल दिला आहे. त्यात हा मार्ग मार्च २०२२ पर्यंत जवळपास पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. या अहवालाप्रमाणे आतापर्यंत ६० टक्के काम झाले असल्याचे म्हटले आहे. २३ वर्षांपासून या मार्गाचे काम रेंगाळत चालल्यामुळे प्रस्तावित खर्चही २२०० कोटीवरून ३७१२.५० कोटीपर्यंत जाईल, असेही मध्य रेल्वेच्या डिसेंबर १९ च्या मासिक अहवालात म्हटले आहे. म्हणजे १४४१ कोटी रुपयांनी खर्च वाढण्याची शक्यता आहे. काम रेंगाळत गेले आणि असाच खर्च वाढत गेला तर निधी मिळण्यासही भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

जेव्हा रेल्वेमार्गाचे काम प्रत्यक्ष करण्याचे ठरले तेव्हा अंदाजित खर्च २८२६ कोटी एवढा होता. रेल्वे बोर्ड आणि महाराष्टÑ शासनाने प्रत्येकी ५०-५० टक्के खर्च करण्याचे ठरले. बीड जिल्ह्याच्या नशिबाने २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत केंद्रात आणि राज्यातही भाजपाचे सरकार आले आणि निधी मिळत गेला. आतापर्यंत जवळपास २४७० कोटी ७३ लाख इतका खर्च झाला असल्याचे रेल्वेच्या डिसेंबर १९ च्या मासिक अहवालात म्हटले आहे. या अहवालाप्रमाणेच झालेल्या ६० टक्के कामावर हा खर्च झाला असून मार्च २२ पर्यंत काम पूर्ण होईल, असे गृहीत धरले तरी आणखी १४४१ कोटी रुपये निधी आवश्यक आहे. 

जवळपास २६० कि.मी अंतरापैकी नारायणडोह ते सोलापूरवाडी ह्या ३५ कि.मी. मार्गाचे काम पूर्ण झाले असून चाचणीही झाली आहे. पहिल्या टप्प्यात अहमदनगर ते नारायणडोह हे १२.२७ कि.मी.चे काम २९ मार्च १७ रोजी पूर्ण झाले. दुसऱ्या टप्प्यातील म्हणजे नारायणडोह ते सोलापूरवाडी हे २३.२६ कि.मी. अंतराचे काम आणि चाचणी २५ फेब्रुवारी १९ रोजी यशस्वी झाली. सोलापूरवाडी ते आष्टी या १३.६ कि.मी. ट्रॅक लिंकींगचे काम पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी खासगी तर काही ठिकाणी वन खात्याच्या जमिनीचे भूसंपादन करताना अडचणी आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेमार्गाच्या कामात अडथळा येत आहे. 

पाठपुरावा चालूच आहे - प्रीतम मुंडेकाम सुरु केले तेव्हा या मार्गाकरिता २ हजार ८२६ कोटी एवढा खर्च अंदाजित होता. पैकी एक हजार ४१३ कोटी एवढा पन्नास टक्के हिस्सा राज्य शासनाकडून केंद्रीय रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या स्तरावर घेतलेला होता. राज्य सरकारने हिश्याचे समप्रमाण राखण्यासाठी सन २०१९-२० करिता मागणी केलेल्या रकमेपैकी ६३ कोटी रुपये नुकतेच रेल्वे विभागाला वितरित केले आहेत. हा रेल्वेमार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पंकजाताई आणि माझा प्रयत्न चालू असल्याचे बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेBeedबीडState Governmentराज्य सरकारPritam Mundeप्रीतम मुंडे