शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणीकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
5
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
6
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
8
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
9
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
10
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
11
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
13
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
14
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
15
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
16
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
17
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
18
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
19
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
20
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!

परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाच्या कामास मिळेना गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 13:14 IST

काम सुरु केले तेव्हा या मार्गाकरिता २ हजार ८२६ कोटी एवढा खर्च अंदाजित होता.

ठळक मुद्देकामाचा अंदाजित खर्च वाढला आणखी दोन वर्षे करावी लागणार प्रतीक्षा

- सतीश जोशी  

बीड : बीड जिल्ह्यासाठी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाचे काम २०२२ पर्यंतही पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत. या मार्गावर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रेल्वे धावेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बीडच्या जाहीर सभेत दिले होते. अतिशय संथगतीने हे काम चालू असून २०२० साल उजाडले तरी ५० टक्केही काम पूर्णत्वास गेलेले नाही. 

या रेल्वेमार्गास फेब्रुवारी १९९७ मध्ये मान्यता देण्यात आली, तेव्हा रेल्वेमार्ग प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च हा २२७१ कोटी ५० लाख इतका होता. जास्तीत जास्त २०२१ पर्यंत हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे ठरले होते. मध्य रेल्वे विभागाने कामासंदर्भात डिसेंबर २०१९ चा मासिक अहवाल दिला आहे. त्यात हा मार्ग मार्च २०२२ पर्यंत जवळपास पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. या अहवालाप्रमाणे आतापर्यंत ६० टक्के काम झाले असल्याचे म्हटले आहे. २३ वर्षांपासून या मार्गाचे काम रेंगाळत चालल्यामुळे प्रस्तावित खर्चही २२०० कोटीवरून ३७१२.५० कोटीपर्यंत जाईल, असेही मध्य रेल्वेच्या डिसेंबर १९ च्या मासिक अहवालात म्हटले आहे. म्हणजे १४४१ कोटी रुपयांनी खर्च वाढण्याची शक्यता आहे. काम रेंगाळत गेले आणि असाच खर्च वाढत गेला तर निधी मिळण्यासही भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

जेव्हा रेल्वेमार्गाचे काम प्रत्यक्ष करण्याचे ठरले तेव्हा अंदाजित खर्च २८२६ कोटी एवढा होता. रेल्वे बोर्ड आणि महाराष्टÑ शासनाने प्रत्येकी ५०-५० टक्के खर्च करण्याचे ठरले. बीड जिल्ह्याच्या नशिबाने २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत केंद्रात आणि राज्यातही भाजपाचे सरकार आले आणि निधी मिळत गेला. आतापर्यंत जवळपास २४७० कोटी ७३ लाख इतका खर्च झाला असल्याचे रेल्वेच्या डिसेंबर १९ च्या मासिक अहवालात म्हटले आहे. या अहवालाप्रमाणेच झालेल्या ६० टक्के कामावर हा खर्च झाला असून मार्च २२ पर्यंत काम पूर्ण होईल, असे गृहीत धरले तरी आणखी १४४१ कोटी रुपये निधी आवश्यक आहे. 

जवळपास २६० कि.मी अंतरापैकी नारायणडोह ते सोलापूरवाडी ह्या ३५ कि.मी. मार्गाचे काम पूर्ण झाले असून चाचणीही झाली आहे. पहिल्या टप्प्यात अहमदनगर ते नारायणडोह हे १२.२७ कि.मी.चे काम २९ मार्च १७ रोजी पूर्ण झाले. दुसऱ्या टप्प्यातील म्हणजे नारायणडोह ते सोलापूरवाडी हे २३.२६ कि.मी. अंतराचे काम आणि चाचणी २५ फेब्रुवारी १९ रोजी यशस्वी झाली. सोलापूरवाडी ते आष्टी या १३.६ कि.मी. ट्रॅक लिंकींगचे काम पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी खासगी तर काही ठिकाणी वन खात्याच्या जमिनीचे भूसंपादन करताना अडचणी आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेमार्गाच्या कामात अडथळा येत आहे. 

पाठपुरावा चालूच आहे - प्रीतम मुंडेकाम सुरु केले तेव्हा या मार्गाकरिता २ हजार ८२६ कोटी एवढा खर्च अंदाजित होता. पैकी एक हजार ४१३ कोटी एवढा पन्नास टक्के हिस्सा राज्य शासनाकडून केंद्रीय रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या स्तरावर घेतलेला होता. राज्य सरकारने हिश्याचे समप्रमाण राखण्यासाठी सन २०१९-२० करिता मागणी केलेल्या रकमेपैकी ६३ कोटी रुपये नुकतेच रेल्वे विभागाला वितरित केले आहेत. हा रेल्वेमार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पंकजाताई आणि माझा प्रयत्न चालू असल्याचे बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेBeedबीडState Governmentराज्य सरकारPritam Mundeप्रीतम मुंडे