शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गुणवत्तेसह प्रवेशवाढीसाठी विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 23:33 IST

महिनाभरापूर्वी जिज्ञासा कसोटी उपक्रम यशस्वी झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून आता जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी व या शाळांमध्ये जास्तीत जास्त प्रवेश होण्यासाठी शिक्षण विभाग विशेष मोहीम राबविणार आहे.

ठळक मुद्देमहिनाभर प्रवेशोत्सव : बीड जि. प. च्या शाळांचा दर्जा पटवून सेमी इंग्रजीचे शिक्षण देणार, इंग्रजी शाळांच्या आकर्षणाची झूल हटविणार

बीड : महिनाभरापूर्वी जिज्ञासा कसोटी उपक्रम यशस्वी झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून आता जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी व या शाळांमध्ये जास्तीत जास्त प्रवेश होण्यासाठी शिक्षण विभाग विशेष मोहीम राबविणार आहे.यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून ही मोहीम राबविण्यासाठी येथील स्काऊट भवनच्या सभागृहात बुधवारी जिल्हयातील उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षकांची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, शिक्षणाधिकारी (प्रा.) राजेश गायकवाड आदी उपस्थित होते.यावेळी अमोल येडगे म्हणाले, विद्यार्थ्यांना जीवनोपयोगी व गुणवत्तावत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी शैक्षणिक सत्राच्या प्रारंभापासून नियोजनबध्द उपक्रम राबवावेत. प्रवेशप्रात्र सर्व विद्यार्थ्यांना १०० टक्के शाळा प्रवेश द्यावेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती टिकवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर द्यावा. प्रशिक्षण पायाभूत शिक्षण, गुणवत्ता या उपक्रमामध्ये काम करण्यास शिक्षकांना मर्यादा नसल्याचे सांगून इच्छाशक्ती आणि कर्तव्य भावनेतून कार्य केल्यास उपक्र म यशस्वी होईल, असे ते म्हणाले. जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू करावे. आपल्या अवतीभवतीच्या गुणवत्तापूर्ण शाळांचा आदर्श घेऊन तसे उपक्रम सुरु करावेत. चौदाव्या वित्त आयोगातून शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधितांना आदेश दिले आहेत. त्यातून जिल्हा परिषदेच्या शाळा अधिक सक्षम करण्याचे आवाहन त्यांनी केले. शिक्षकांच्या सहकार्याने विविध १५-२० नाविन्यपूर्ण उपक्र म राबवून जिल्हा परिषद शाळांची नवीन ओळख निर्माण करून,पालकांनाही त्यांच्या पाल्यांना जि. प. च्या गुणवत्ता पूर्ण शाळेत पाठविण्यास प्रेरित करण्याचे आवाहन सीईओंनी केले.यावेळी उपक्र मशिल शिक्षकांनी राबविलेल्या उपक्र माविषयी आणि विविध अडचणींबाबत सीईओंनी संवाद साधला. यावेळी विस्तार अधिकारी प्रविण काळम, सोमनाथ वाळके, संतोष दाणी, आश्रुबा सोनवणे, बा.म.पवार, अशोक निकाळजे, जया इगे, राजश्री अंडील आदींनी विविध उपक्रम राबविण्यासाठी आपले विचार मांडले.याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी वाढविण्यासाठी विविध माध्यमातून प्रसिद्धी, विविध उपक्रमांसह प्रश्न मंजूषा सारखे कार्यक्र म राबविण्याचे आवाहन केले. शिक्षणाधिकारी (प्रा.) राजेश गायकवाड यांनी आगामी शैक्षणिक सत्रात राबविण्यात येणाऱ्या उपक्र माविषयी माहिती दिली.यावेळी गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांसह उपक्रमशील शिक्षक उपस्थित होते.ग्रामीण भागात इंग्रजी शाळांबद्दलचे आकर्षण अनेक पालकांमध्ये आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनुभवी शिक्षक आहेत, शासनाच्या योजना राबवल्या जातात तसेच पर्यवेक्षण केले जाते. त्यामुळे त्या भागातील इंग्रजी शाळांच्या तुलनेत जि. प. च्या शाळा सक्षम कशा आहेत, शिक्षण कसे दर्जेदार आहे हे पटवून देत जि. प. च्या शाळांमध्ये जास्तीत जास्त प्रवेश व्हावेत म्हणून सर्व स्तरावर प्रयत्न करणार आहोत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे म्हणाले.

टॅग्स :Beedबीडzp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थी