शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

सोयाबीन पाण्यामध्ये, शेतकऱ्यांचे नुकसान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:36 IST

परिसरातील अनेक भागात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : तालुक्यासह परिसरातील अनेक भागात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने शेतात पूर्णपणे पाणी साचले आहे. त्यामुळे सोयाबीनचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने दाणादाण उडाली. शेतकऱ्यांना शेतीची कामे करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी शेतक-यांनी सोयाबीन काढून त्याची गरज रचली आहे. पण अचानक सुरू होणा-या पावसामुळे शेतक-यांना त्याची रास करण्यास अडचणी येत आहेत. पावसाने यावर्षीही हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे हिरावला आहे. दुपारपर्यंत आॅक्टोबर हिटचा सामना करणाºया शेतक-यांना दुपारनंतर पावसाचा सामना करावा लागत आहे.आपेगाव परिसरातील तटबोरगाव, आपेगाव, धानोरा, कोपरा, अंजनपूर व इतर गावांत सोयाबीन काढणीअभावी शेतात भिजत आहे. यामुळे शेतक-यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यातच निवडणुकीच्या धामधुमीत मजूर वर्ग वेळेवर उपलब्ध झाला नाही. यामुळे मिळालेल्या वेळेत खळे करून घेणे शक्य झाले नाही. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला जेमतेम पडलेल्या पावसाने शेतक-यांनी पेरणी केलेले पीक जोमात होती. चांगली फळधारणा होती. मात्र, खळ्यासाठी सज्ज असलेल्या शेतक-यांवर आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडयापासून पावसाने सुरुवात केल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावरून घेतला आहे. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.उत्पादनात घट होण्याची शक्यतापरतीच्या पावसाने मुक्काम वाढविल्यामुळे सोयाबीन, उडीद व मूग या पिकांच्या उत्पन्नात यावर्षीही घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिणामी शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असल्याचे चित्र आहे. लवकर खळे करून यंदाची दिवाळी गोड करावी या आशेने शेतक-याने केलेल्या नियोजनावर पावसाने पाणी फेरले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून पाऊस कधी उघडीप देईल, याकडे लक्ष आहे.यावर्षी पावसाअभावी खरीप गेलेला आहे. रब्बीची चिंता वाढली असतांना आता चार दिवसापासून पाऊस उघडायचे नाव घेत नाही. या पावसामुळे शेतक-यांचे सोयाबीन पाण्याखाली गेले.अक्षरश: काढून टाकलेले सोयाबीचे कडप पाण्यावर पोहत आहेत. उभ्या सोयाबीनला कर फुटत आहेत. शेतक-यांची वर्षभराची मेहनत वाया गेली असून प्रचंड प्रमाणात सोयीबनचे नुकसान होत आहे.हवामान खात्याकडून पावसाचा मुक्काम ३० आॅक्टोबरपर्यत वाढणार असल्याचा अंदाज वर्तविल्यामुळे धाकधुक वाढली आहे. खरीप हंगामातील पिके हातून जाण्याची भीती वाटत आहे.आठ दिवसांपासून दररोज पाऊस पडत असल्यामुळे परिसर जलमय झाला आहे. पावसामुळे खरीप हंगामातील नुकसान होत असलेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी