शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

काळोख्या अंधारात पुराच्या पाण्यात १२ तास अडकले; आजोबा-नातवाचा थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 19:09 IST

Rain in Beed : पाण्याचा वेढा पडल्याने पडताच आजोबा व नातु बाभळीच्या झाडावर चढले.

-  पुरूषोत्तम करवामाजलगाव ( बीड ) :  माजलगाव धरणातुन ( Majalgaon Dam ) मोठ्या प्रमाणावर सिंदफना नदीपात्रात ( Sindhfana River ) पाणी सोडण्यात आले. पाण्याचा वेढा पडल्याने शेतातील गोठ्यात निवांतपणे बसलेल्या आजोबा व नातवास 12 तास झाडावर काढण्याची वेळ आली. तर त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या जवानांची बोट उलटली. सुदैवाने त्यातील एकाने झाडाला तर खाली लांब जावुन झाडाला लटकल्याने त्यांचे प्राण वाचले. ( The soldiers who came to the rescue were carried away; Grandfather and grandson rescued from the flood after 12 hours) 

माजलगाव धरणाच्या पायथ्याशी देवखेडा येथील शेतकरी रामप्रसाद गोविंद कदम आणि त्यांचा सात वर्षाचा नातू शिवप्रसाद सचिन कदम हे आपल्या गोठ्यावर थांबलेले होते . मंगळवारी दिवसभर धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची मोठी आवक झाली. त्यामुळे धरणातुन सिंदफना नदीपात्रात 1 लाख 32 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोठ्याला पाण्याचा वेढा पडला. मंगळवारी दुपारी तीन वाजता पाण्याचा वेढा पडल्याने आजोबा व नातु बाभळीच्या झाडावर चढले. ही माहिती रामप्रसाद कदम यांनी आपल्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर ही माहिती प्रशासनाला मिळतात तहसीलदार वैशाली पाटील व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे ते घटनास्थळी तळ ठोकून होते. सुरुवातीस काही मच्छीमार व भोई लोकांनी त्यांना काढण्याचा प्रयत्न केला असता पाणी जास्त असल्याने तेही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते.

हेही वाचा - पुरात वाहून गेलेल्या माजी आमदाराच्या मुलाचा आणि नातवाचा मृतदेह सापडला

यानंतर तहसीलदार वैशाली पाटील यांनी परळी व बीड येथील एनडीआरएफ च्या जवानांना पाचारण केले. ते रात्री 10 वाजता पाण्यात उतरले. मात्र, आजोबा नातवापर्यंत पोहोचले असता त्यांची बोट उलटली. या बोटीत दोघे जण होते. यातील एकाने त्याच बाभळीला तर दुसऱ्याने गोशाळेजवळील एका झाडाचा आसरा घेत स्वतःचे प्राण वाचवले. वेगवान प्रवाहामुळे बचाव पथकाची बोट अडकलेल्यापर्यंत पोहचत नव्हती. यातच रात्रीचा अंधार, बाभुळीची झुडुपे त्यामुळेही मदत करताना अडचणी निर्माण होत होत्या. पहाटे तीनपर्यंत पाण्याचा वेग कमी झाल्यानंतर स्थानिक भोई पानबुडे यांनी आजोबा-नातू व बचाव पथकातील कर्मचाऱ्याला  सुखरूप बाहेर काढले.

हेही वाचा - - पावसाचे थैमान ! पुरात एकजण वाहून गेला; तर ९०० कोंबड्या दगावल्या- एकाच कुटुंबातील तिघींना सर्पदंश; दोन चिमुकल्या दगावल्या,आईची मृत्यूशी झुंज

टॅग्स :floodपूरBeedबीडRainपाऊस