शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

मंजरथकरांचे टॉवरवर ‘शोले’स्टाईल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:41 PM

तालुक्यातील मंजरथ ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात वेळोवेळी उपोषण करून व सतत प्रशासनाकडे तक्र ारी करूनही दखल न घेतल्यामुळे समस्त गावकऱ्यांच्या वतीने सोमवारी ग्रामपंचायत विरोधात गावातील मोबाईल टॉवरवर चढून गावक-यांनी दीड तास शोले स्टाईल आंदोलन केले.

ठळक मुद्देआजी- माजी गटांचा वाद : गावाचा विकास खुंटला

माजलगाव : तालुक्यातील मंजरथ ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात वेळोवेळी उपोषण करून व सतत प्रशासनाकडे तक्र ारी करूनही दखल न घेतल्यामुळे समस्त गावकऱ्यांच्या वतीने सोमवारी ग्रामपंचायत विरोधात गावातील मोबाईल टॉवरवर चढून गावक-यांनी दीड तास शोले स्टाईल आंदोलन केले.मंजरथ येथील सरपंच ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर या परराज्यात नोकरी करत असून, ग्रामपंचायतीकडे त्यांचे लक्ष नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतीला ग्रामसेवकदेखील नाही. यामुळे येथील नागरिकांची अनेक कामे प्रलंबित आहेत. सरपंच व ग्रामसेवकाअभावी येथून कुठलेच काम होत नाही. याविरोधात गावकºयांच्या वतीने नेहमीच उपोषणे, आंदोलने करण्यात आलेली आहेत. परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे गावकºयांच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावातील मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यता आले. यावेळी रमाई, पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांची कामे करा, गावातील स्वच्छता करा, गावाला पाणीपुरवठा व्यवस्थित करा, याठिकाणी ग्रामसेवकाची नियुक्ती करा आदी मागण्या ग्रामस्थांनी लावून धरल्या.पोलिसांच्या मध्यस्तीनंतर गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण यांनी तात्काळ ग्रामसेवक नियुक्त करण्याचे आश्वासन दिले.१३ महिन्यांत अनेक वेळा विरोधात आंदोलनेमाजलगाव तालुक्यातील मंजरथ येथील ग्रामपंचायत ही सधन ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. मागील पाच वर्षांपूर्वी येथील सरपंच व सदस्यांनी पाणीपुरवठा योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप विद्यमान सरपंच ऋतुजा आनंदगावकर यांनी करत यासंदर्भात जिल्हा परिषदेकडे तक्रारीदेखील केल्या होत्या.चौकशी झाल्यास आपल्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात अशी भीती ज्यांच्या काळात गैरप्रकार झाले, त्यांना आहे. या पार्श्वभूमीवर म्हणून तत्कालीन सरपंचांनी मागील १३ महिन्यात ऋतुजा आनंदगावकर यांनी चार्ज घेतल्यापासून अनेक वेळा त्यांच्या विरोधात आंदोलने केली.याबाबत आनंदगावकर यांनी जिल्हा परिषदेकडे अनेक तक्र ारी केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी १२ मार्च रोजी चौकशी समिती नेमली. परंतु ही समिती अद्याप चौकशीसाठी गावात आलीच नाही.या ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा योजनेसाठी ५० लक्ष रु पये खर्च झाले होते. तर आता आजी माजी सरपंचाच्या वादात चौदाव्या वित्त आयोगातून आलेला २१ लक्ष रु पयांचा निधी मागील एक वर्षापासून धूळ खात पडून आहे. यामुळे गावचा विकास खुंटला आहे.

टॅग्स :Beedबीडagitationआंदोलन