शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी शिवसेना शेतकऱ्यांसोबत - ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:42 IST

बीड जिल्ह्यातील शेतक-यांच्या जनावरांना वाचवण्यासाठी चारा कमी पडू दिला जाणार नाही असा शब्द शिवसेनेचे पक्षप्रमुुख उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांना दिला.

ठळक मुद्देशेतक-यांना आवाहन : घाबरु नका, खचू नका, आत्महत्या करु नका; म्हाळस जवळा येथे शेतक-यांना पशुखाद्याचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दुष्काळाचे संकट गंभीर आहे. घाबरु नका, खचू नका, आत्महत्या करु नका. दुष्काळाचा सामना करण्यासाठी शिवसेना तुमच्यासोबत आहे. आम्ही दुष्काळाचे राजकारण करत नाहीत, राजकारणापलिकडेही माणुसकी असते. बीड जिल्ह्यातील पशुधन वाचवण्यासाठी शंभर ट्रकच काय त्यापेक्षा जास्त चारा लागला तर उपलब्ध करून देवू. बीड जिल्ह्यातील शेतक-यांच्या जनावरांना वाचवण्यासाठी चारा कमी पडू दिला जाणार नाही असा शब्द शिवसेनेचे पक्षप्रमुुख उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांना दिला.शिवसेनेच्या वतीने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी शंभर ट्रक पशुखाद्य वाटपाचा प्रारंभ बुधवारी बीड तालुक्यातील म्हाळसजवळा येथे करण्यात आला. त्यावेळी शेतकºयांशी संवाद साधताना ठाकरे बोलत होते. प्रातिनिधिक स्वरूपात दहा शेतकºयांना पशुखाद्याचे वाटप ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ठाकरे म्हणाले, या दुष्काळामध्ये कोरडी भाषणे करून उपयोग होणार नाही, शेतकºयांना मदतीचा हात आणि आधार दिला तरच शेतकरी उभा राहिल. सरकार फक्त घोषणांचा पाऊस पाडेल पण याने मायमाऊलींचे हंडे भरणार नाहीत अशी टीका त्यांनी केली.ते म्हणाले, आज मी येथे जे आलो आहे ते तुमच्या आशिर्वादाची परतफेड करण्यासाठी. सरकार काय करत आहे मला माहित नाही. मी मात्र अशा गंभीर परिस्थितीत तुमच्यासोबत आहे. दुष्काळाचा सामना खंबीरपणे करू, असा विश्वास देताना संधीसाधूंपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भाषण केले. व्यासपीठावर एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, उपनेत्या निलम गोºहे, अर्जुन खोतकर, व जिल्हा पदाधिकारी आदी उपस्थित होते.स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीने देऊ केलेली मदत उद्धव ठाकरे यांनी सन्मानाने केली परतगेवराईत माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानजवळ मैदानावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पशुधनासाठीची मदत वाटप झाली. शिवसेना राबवत असलेल्या दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदत उपक्रमाला स्वातंत्र्यसैनिक कै. लक्ष्मणराव भोपळे यांच्या पत्नी विजयाताई भोपळे यांनी त्यांच्या पेन्शनमधून २१ हजार रु पयांची मदत अ‍ॅड. उज्वला भोपळे यांच्या हस्ते देऊ केली. परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, देशासाठी बलिदान देणाºया स्वातंत्र्य सैनिकाचा शिवसेना नेहमीच सन्मान करते. जवान आणि किसान यांच्या मदतीसाठी शिवसेना सदैव तयार असते. देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकाच्या कष्टाची रक्कम शेतकºयाला देण्याऐवजी, शिवसेना शेतकºयांसाठी मदत करून, प्राण पणाला लावेल असा विश्वास देत सन्मानपूर्वक त्यांचा मदतनिधी परत केला.बीडच्या सभेमध्ये तगडा बंदोबस्तम्हाळस जवळा येथील कार्यक्रमानंतर बीड येथे सभा झाली. यावेळी सुरक्षेसाठी विशेष रक्षक तैनात होते. तर प्रवेशद्वारापासून सभास्थळ परिसरात स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त होता. यासपीठावर पर्यावरण मंत्री रामदास कदम, आरोग्य व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. चंद्रकांत खैरे, खा. रवींद्र गायकवाड, आमदार निलम गोºहे, विनोद घोसाळकर, अंकित प्रभू, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, माजी. आ. सुनिल धांडे, बदामराव पंडित, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा प्रमुख विश्वनाथ स्वामी, अंबादास दानवे, राजू वैद्य, गोविंद घोळवे, बाळासाहेब पिंगळे, सुशील पिंगळे, युवासेना प्रमुख सागर बहीर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात अंजनडोह येथील बाळासाहेब सोळंके यांना व्यासपीठावर बोलावून त्यास कर्जमाफीचे पत्र मिळाले, परंतु कर्जमाफी झाली नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :BeedबीडUddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरी