शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
4
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
5
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
6
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
7
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
8
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
9
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
10
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
11
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
12
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
13
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
14
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
15
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
16
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
17
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
18
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
19
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
20
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...

शिवसेनेचे उमेदवार जयदत्तअण्णा असल्यामुळे विरोधकांना थारा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 23:40 IST

पालसिंगण परिसर शिवसेनेला साथ देणारा आहे. पुर्वीपासून जयदत्त आण्णा यांनादेखील येथून मदत झाली आहे. यावेळी शिवसेनेचे उमेदवार आण्णा स्वत: असल्यामुळे विरोधकांना मत मागण्यासाठी कुठेही थारा मिळणार नाही. राज्याच्या विधानसभेत बीडचा उमेदवार सर्वाधिक मताने निवडून येणार असे मत विलास महाराज शिंदे व्यक्त केले.

ठळक मुद्देविलास महाराज शिंदे : बालाघाटावरील गावांत कार्नर बैठकांमधून संवाद

बीड : पालसिंगण परिसर शिवसेनेला साथ देणारा आहे. पुर्वीपासून जयदत्त आण्णा यांनादेखील येथून मदत झाली आहे. यावेळी शिवसेनेचे उमेदवार आण्णा स्वत: असल्यामुळे विरोधकांना मत मागण्यासाठी कुठेही थारा मिळणार नाही. राज्याच्या विधानसभेत बीडचा उमेदवार सर्वाधिक मताने निवडून येणार असे मत विलास महाराज शिंदे व्यक्त केले.शिवसेना-भाजपा, रिपाई, रासप, रयत क्रांती महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ पालसिंगण, सफेपूर, चांदेगाव, जेबापिंप्री येथे झालेल्या कॉर्नर बैठकीत ते बोलत होते.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे, अरूण डाके, अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, दिनकर कदम, नितीन धांडे, सुशिल पिंगळे, सागर बहीर, झुंजार धांडे, भारत जगताप आदी उपस्थित होते.विलास महाराज म्हणाले की, शांत, संयमी आणि माणूस जपणारे नेतृत्व म्हणून आण्णांकडे पाहिले जाते. आपण शिवसैनिकांनी जागरूकपणे आणि खंबीरपणे आण्णांच्या मागे उभे राहून एक नंबरचे मतदान धनुष्यबाणावर करावे, असे आवाहन त्यांनी केले.कुंडलीक खांडे म्हणाले की, एक पुतण्या गेला म्हणून काय झाले हजारो पुतणे आण्णांच्या बरोबर आहेत. आण्णा नावातच एक मोठा पक्ष आहे. या परिसरात एकही गाव असे नाही की जिथे आण्णांनी काम केले नाही. आण्णा पुन्हा मंत्री होणार आहेत त्यामुळे आपल्या भागाच्या विकासाला गती येईल. त्यामुळेच येणाऱ्या युती सरकारमध्ये अण्णांना भरघोस मतांनी निवडून पाठवा.भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे म्हणाले, राज्याच्या राजकारणात अण्णा ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर चांगल्या मंत्रीपदाची जबाबदारी येणार आहे. भाजपासह मित्रपक्ष आण्णांच्या सोबत आहेत. ही निवडणूक म्हणजे पोरखेळ नाही. त्यामुळे आपले अमुल्य मत धनुष्यबाण या चिन्हावर देऊन बीडचे नाव राज्यात पोहोचवा, असे आवाहन त्यांनी केले.जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आदि गावातील बहूसंख्य नागरिक, युवक, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.गल्ली ते दिल्ली सरकार असेल तर जनतेला फायदायावेळी जयदत्त क्षीरसागर म्हणाले, धर्मवीर असे ज्यांना संबोधतात ते विलास महाराज आपल्यासोबत आहेत तसेच काकूंच्या काळापासून माझ्या पाठीशीही हा परिसर उभा राहिला आहे. हा योग जुळून आला आहे. दिल्ली ते गल्लीपर्यंत एकच सरकार असेल तर त्याचा फायदा होतो. नवा इतिहास घडविण्याची ही संधी आहे मी शेवटपर्यंत जनतेच्या प्रश्नासाठी काम करणार आहे. जनतेचे प्रेम हाच आपला श्वास आहे. त्यामुळे जनता एकमताने धनुष्यबाण पाहून मतदान करेल असा विश्वास वाटतो, असेही क्षीरसागर म्हणाले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना