शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

शिवसेनेचे उमेदवार जयदत्तअण्णा असल्यामुळे विरोधकांना थारा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 23:40 IST

पालसिंगण परिसर शिवसेनेला साथ देणारा आहे. पुर्वीपासून जयदत्त आण्णा यांनादेखील येथून मदत झाली आहे. यावेळी शिवसेनेचे उमेदवार आण्णा स्वत: असल्यामुळे विरोधकांना मत मागण्यासाठी कुठेही थारा मिळणार नाही. राज्याच्या विधानसभेत बीडचा उमेदवार सर्वाधिक मताने निवडून येणार असे मत विलास महाराज शिंदे व्यक्त केले.

ठळक मुद्देविलास महाराज शिंदे : बालाघाटावरील गावांत कार्नर बैठकांमधून संवाद

बीड : पालसिंगण परिसर शिवसेनेला साथ देणारा आहे. पुर्वीपासून जयदत्त आण्णा यांनादेखील येथून मदत झाली आहे. यावेळी शिवसेनेचे उमेदवार आण्णा स्वत: असल्यामुळे विरोधकांना मत मागण्यासाठी कुठेही थारा मिळणार नाही. राज्याच्या विधानसभेत बीडचा उमेदवार सर्वाधिक मताने निवडून येणार असे मत विलास महाराज शिंदे व्यक्त केले.शिवसेना-भाजपा, रिपाई, रासप, रयत क्रांती महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ पालसिंगण, सफेपूर, चांदेगाव, जेबापिंप्री येथे झालेल्या कॉर्नर बैठकीत ते बोलत होते.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे, अरूण डाके, अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, दिनकर कदम, नितीन धांडे, सुशिल पिंगळे, सागर बहीर, झुंजार धांडे, भारत जगताप आदी उपस्थित होते.विलास महाराज म्हणाले की, शांत, संयमी आणि माणूस जपणारे नेतृत्व म्हणून आण्णांकडे पाहिले जाते. आपण शिवसैनिकांनी जागरूकपणे आणि खंबीरपणे आण्णांच्या मागे उभे राहून एक नंबरचे मतदान धनुष्यबाणावर करावे, असे आवाहन त्यांनी केले.कुंडलीक खांडे म्हणाले की, एक पुतण्या गेला म्हणून काय झाले हजारो पुतणे आण्णांच्या बरोबर आहेत. आण्णा नावातच एक मोठा पक्ष आहे. या परिसरात एकही गाव असे नाही की जिथे आण्णांनी काम केले नाही. आण्णा पुन्हा मंत्री होणार आहेत त्यामुळे आपल्या भागाच्या विकासाला गती येईल. त्यामुळेच येणाऱ्या युती सरकारमध्ये अण्णांना भरघोस मतांनी निवडून पाठवा.भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे म्हणाले, राज्याच्या राजकारणात अण्णा ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर चांगल्या मंत्रीपदाची जबाबदारी येणार आहे. भाजपासह मित्रपक्ष आण्णांच्या सोबत आहेत. ही निवडणूक म्हणजे पोरखेळ नाही. त्यामुळे आपले अमुल्य मत धनुष्यबाण या चिन्हावर देऊन बीडचे नाव राज्यात पोहोचवा, असे आवाहन त्यांनी केले.जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आदि गावातील बहूसंख्य नागरिक, युवक, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.गल्ली ते दिल्ली सरकार असेल तर जनतेला फायदायावेळी जयदत्त क्षीरसागर म्हणाले, धर्मवीर असे ज्यांना संबोधतात ते विलास महाराज आपल्यासोबत आहेत तसेच काकूंच्या काळापासून माझ्या पाठीशीही हा परिसर उभा राहिला आहे. हा योग जुळून आला आहे. दिल्ली ते गल्लीपर्यंत एकच सरकार असेल तर त्याचा फायदा होतो. नवा इतिहास घडविण्याची ही संधी आहे मी शेवटपर्यंत जनतेच्या प्रश्नासाठी काम करणार आहे. जनतेचे प्रेम हाच आपला श्वास आहे. त्यामुळे जनता एकमताने धनुष्यबाण पाहून मतदान करेल असा विश्वास वाटतो, असेही क्षीरसागर म्हणाले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना