शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

शरद पवारांनी पाळला शब्द, संजय दौंड यांना दिली विधान परिषदेची उमेदवारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 19:03 IST

धनंजय मुंडे यांना परळीतून निवडून आणण्याची जबाबदारी माजी राज्यमंत्री पंडितराव दौंड व त्यांचे पुत्र संजय दौंड यांच्यावर टाकताना शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेचा शब्द दिला होता.

ठळक मुद्देधनंजय मुंडेंच्या विजयासाठी घेतले होते कष्ट जिल्ह्याला आणखी एका आमदाराची संधी 

- सतीश जोशी  

बीड : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्टवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांना परळीतून निवडून आणण्याची जबाबदारी माजी राज्यमंत्री पंडितराव दौंड व त्यांचे पुत्र संजय दौंड यांच्यावर टाकताना शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेचा शब्द दिला होता.

दौंड पिता-पुत्रांनी दिवस-रात्र प्रचार करुन धनंजय यांच्या विजयास मोलाचा हातभार लावत जबाबदारी यशस्वी पेलली आणि पवारांनीही विधान परिषदेची उमेदवारी देत शब्द पाळल्याने बीड जिल्ह्यास आता संजय दौंड यांच्या रुपाने आणखी एक आमदार मिळण्याची संधी प्राप्त झाली आहे. तसे बघितले तर उमेदवार संजय दौंड हे काँग्रेसचे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी दौंड यांनी उमेदवारी दाखल केली आहे. गोपीनाथराव मुंडे आणि दौंड कुटुंबातील ३० ते ३५ वर्षांपासूनचे राजकीय वैर सर्वश्रूत आहे. १९८५ साली पंडितराव दौंड यांनी गोपीनाथरावांचा तत्कालीन रेणापूर (आताचा परळी) विधानसभा मतदारसंघातून पराभव केला होता.  नंतर मात्र ९० आणि ९९ साली ते पराभूत झाल्यानंतर राजकारणाची धुरा संजय दौंड यांनी स्वत:च्या खांद्यावर घेत मुंडे यांच्याशी राजकीय संघर्ष चालूच ठेवला परंतु, दाळ शिजत नव्हती.

गोपीनाथरावानंतर पंकजा आणि डॉ. प्रीतम मुंडे यांच्याशी परळीतील प्रत्येक निवडणुकीत विरोध करणे त्यांनी सुरूच ठेवले होते. धनंजय मुंडे हे काका गोपीनाथरावांसोबत असताना त्यांनाही जि.प., अंबाजोगाई, परळी पालिका निवडणुकीतही कडवा विरोध केला होता. एकत्र असताना जि.प. गट निवडणुकीत धनंजय यांनी संजय दौंड यांचा दोन वेळा पराभव केला होता. एक वेळा संजय दौंड यांनीही धनंजय मुंडेंच्या बंधूचा पराभव करून हिशेब चुकता केला होता.घरगुती कलहातून धनंजय मुंडे भाजपातून बाहेर पडून राष्टÑवादीमध्ये गेले. काकांशी संघर्ष करण्यासाठी, त्यांनी त्यांच्या विरोधकांशी जवळीक साधण्यास सुरूवात केली. संजय दौंड हे त्यापैकीच एक नेतृत्व होते. गोपीनाथरावानंतरही दौंड यांनी पंकजा मुंडे यांच्याशी संघर्ष चालूच ठेवला. पंकजांचे राजकीय वर्चस्व कमी झाल्याशिवाय आपली उन्नती नाही, हे धनंजय व दौंड पिता-पुत्रासही कळून चुकले होते. 

परळीतून मिळत नव्हती उमेदवारीक्षमता असूनही दौंड कुटुंबियांचे राजकारण जि.प.तील राजकारणापुरतेच मर्यादित राहिले होते. धनंजय मुंडेंमुळे परळी विधानसभा मतदार संघातून उमेदवारीही मिळत नव्हती. धनंजय यांना निवडून दिल्यासच सर्व प्रश्न सुटणार आहेत, हे चाणाक्ष संजय दौंड यांनी ओळखले. शरद पवारांचा विश्वास जिंकत विधान परिषदेची उमेदवारी मिळवली.

टॅग्स :BeedबीडVidhan Parishadविधान परिषदNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस