शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण बीड जिल्ह्यात भयंकर दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:45 IST

गुरुवारी येणारे केंद्राचे पथक दुष्काळी पाहणी करणार आहे. परंतू पथकाने पाहिलेली परिस्थिती आणि महिना- दीड महिन्यानंतर उद्भवणारी परिस्थिती यात मोठी तफावत राहणार आहे,

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गुरुवारी येणारे केंद्राचे पथक दुष्काळी पाहणी करणार आहे. परंतू पथकाने पाहिलेली परिस्थिती आणि महिना- दीड महिन्यानंतर उद्भवणारी परिस्थिती यात मोठी तफावत राहणार आहे, ही बाब जिल्हा प्रशासनाने पथकाला पटवून देण्याची गरज आहे. मागील पाच वर्षात बीड जिल्ह्यात पाऊस प्रमाण कमी अधिक राहिलेतरी खरीप व रबी दोन्ही हंगाम वाया गेले नव्हते. पिण्याच्या पाण्याचे हाल झाले नव्हते. मागील पाच वर्षांचा तुलनात्मक अभ्यास केलातर मांडलेला तर्क वेगळा निघू शकतो. त्यामुळे यंदाच्या संभाव्य भीषण दुष्काळाची दाहकता पथकापुढे प्रभावीपणे मांडावी लागणार आहे.जिल्ह्यात यावर्षी अत्यंत कमी पावसामुळे खरीप आणि रबी दोन्ही हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाणी पातळी खोलवर चालली आहे. थोडेफार उपलब्ध असलेल्या पाण्यावर सध्या ग्रामीण जनता दिवस काढत आहे. पण खरा दुष्काळ जानेवारीनंतर जाणवणार आहे. पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा आणि वितरण व्यवस्था पुरेसे अन्नधान्य उपलब्ध करुन द्यावे लागणार आहे.बीड जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ६६६. ३६ आहे. यंदा ३३४. ७० मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षीची तुलना केली तर ५० टक्के पाऊस कमी झाला आहे. पण हा पाऊस काही महिने धीर देण्यापुरताच बरसलेला आहे. सध्या पाणी असलेतरी जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाण्यासाठी जनतेची कसरत सुरु झाली आहे. गाव परिसरातील जलस्त्रोत आटल्याने दूर अंतरावरुन पाणी आणावे लागणार आहे. त्यामुळे कराव्या लागणाऱ्या उपाययोजनेसाठी निधीची उपलब्धता वेळेवर होणे गरजेचे आहे.दुष्काळ पाहणीसाठी आज केंद्राचे पथक जिल्हा दौºयावरलोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक आज जिल्हा दौ-यावर येणार आहे. यामध्ये विविध विभागाचे मुख्य अधिकाºयांचा समावेश असणार आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास परळी तालुक्यातीतून दुष्काळी पाहणी दौरा सुरु होणार आहे. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन पथक केंद्र शासनाकडे अहवाल सादर करणार आहे.दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र कृषी विभागाच्या योजना आयोगाचे सह सल्लागार मनीष चौधरी, पेयजल व स्वच्छता विभागाचे एस.सी.शर्मा, ग्रामविकास खात्याचे एस.एन. मिश्रा यांचा सहभाग असणार आहे. तसेच राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, पुनर्वसन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर, महाराष्ट्र रिमोट सेन्स्ािंग अ‍ॅप्लीकेशन सेंटरचे रांजणकर, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, कृषी अधीक्षक एम.एल.चपळेसह महसूल, कृषी व इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग असणार आहे.परभणी जिल्ह्यातील पाहणी दौरा झाल्यानंतर पथक परळी तालुक्यातील रेवली येथे दुपारी २ च्या सुमारास दुष्काळी पाहणीस सुरुवात करणार आहेत. त्यानंतर माजलगाव मार्गे वडवणी तालुक्यातील खडकी, बीड तालुक्यातील जरुड, कांबी या गावांची पाहणी केली जाणार आहे. यावेळी पथकातील प्रत्येक अधिका-यांसोबत जिल्ह्यातील अधिकारी असणार आहेत. पथक येणार असल्याने बुधवारी दिवसभर प्रशासन अहवाल तयार करण्यात व्यस्त होते.दुष्काळी पाहणी दौरा करण्यासाठी आलेले केंद्राचे पथक मागील ५ वर्षातील पर्जन्यमान, पीकपरिस्थिती, पाणी पातळी तसेच शासनाच्या वतीने मंजूर केलेल्या विविध योजना व प्रशासनाने केलेली अंमलबजावणी याचा आढावा घेणार आहे. यामध्ये कृषी विभागाच्या मार्फत शेतक-यांसाठी राबवलेल्या विविध योजना त्यामध्ये कांदाचाळ, ठिबक, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार यासह चारा टंचाईची पाहणी केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मागील पाच वर्षाची माहिती संकलित केली असून ती केंद्र पथकाला दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

टॅग्स :droughtदुष्काळCentral Institute Of cotton researchकेंद्रीय कापूस संशोधन संस्था