शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

पिसाळलेला कुत्रा चावल्याने शाळकरी मुलाचा रेबीजने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:35 IST

गेवराई : शहरातील सरस्वती काॅलनी भागात राहणाऱ्या एका आठ वर्षीय शाळकरी मुलाला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर वेळेत लक्षात न ...

गेवराई : शहरातील सरस्वती काॅलनी भागात राहणाऱ्या एका आठ वर्षीय शाळकरी मुलाला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर वेळेत लक्षात न आल्याने त्याचा रेबीजने मृत्यू झाल्याची घटना ४ मे रोजी घडली. कुत्र्याने चावा घेतल्याचे लक्षात न आल्याने १५-२० दिवसांत रेबीजच्या प्रभावाने त्याची प्रकृती बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने गेवराईतील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुनीत जितेंद्र मुंदडा असे कुत्रा चावल्याने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो दुसरीच्या वर्गात शिकत होता. घराजवळच्या रस्त्यावर सायकल चालवत असताना कुत्रा मागे लागल्याने पुनीत घाबरून खाली पडला. त्याचवेळी पिसाळलेल्या त्या कुत्र्याने त्याच्या कानाजवळ चावा घेतला. त्यावेळी लाॅकडाऊन असल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हती. त्यामुळे ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. कुत्र्याने चावा घेतल्याचे पुनीतलाही लक्षात आले नाही. घरीदेखील सायकलवरून पडल्याने मार लागल्याचे त्याने सांगितले. त्याअनुषंगाने त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र पाच-सहा दिवसांपासून पुनीत अचानक घाबरू लागला, थरथर कापू लागला. या तक्रारी वाढल्याने वडिलांनी त्याला खासगी दवाखान्यात नेले व उपचार घेतले. नंतर प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला अखेर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी रक्ताची तपासणी केल्यानंतर रेबीज झाल्याचे लक्षात आले. उपचाराला विलंब झाल्याने रेबीजची लक्षणे बळावली होती. त्यामुळे ४ मे रोजी रोजी पुनीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरात सर्वत्र भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. दिवसा व रात्रीच्या वेळी भटकी कुत्री लोकांवर हल्ले करतात. भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा नगर परिषदेने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

माझा पुतण्या पुनीत मुंदडा याचा मृत्यू पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे रेबीजने झाला असल्याचे उपचार करणाऱ्या डाॅक्टरांनी आम्हाला सांगितल्याचे मयत पुनीतचे चुलते योगेश मुदंडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.