शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

वाल्मीक कराडने तब्बल सहा वेळा मागितली खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 10:59 IST

आवादा कंपनीतील प्रकल्प अधिकाऱ्याच्या जबाबातून माहिती उघड

बीड :वाल्मीक कराड याने एक-दोन नव्हे तर तब्बल सहा वेळा दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. फोनवरून न ऐकल्याने ६ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुलेसह गुंडांना तेथे पाठविले; परंतु सरपंच संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केली. याचाच राग मनात धरून देशमुख यांची हत्या करण्यात आली. आवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी सीआयडीला दिलेल्या जबाबातून हे स्पष्ट झाले आहे.

सुनील केदू शिंदे (४२, रा. नाशिक, ह. मु. बीड) हे आवादा एनर्जी प्रा. लि. या कंपनीच्या मस्साजोग येथील पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहतात. त्यांनी १३ जानेवारी रोजी सीआयडीला जबाब दिला.

'तो' कॉल केला रेकॉर्ड म्हणे, ...तर याद राखा 

२९ नोव्हेंबर २०२४ रोजी चाटे याने कॉल केला. 'तुमच्याशी अण्णा बोलणार आहेत', असे सांगून त्यांच्याकडे फोन दिला. त्यावेळी कराड म्हणाला की, 'ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत काम बंद करा, काम चालू कराल तर याद राखा. त्याचे रेकॉर्डिंग मी केले. त्याच दिवशी दुपारी एक वाजता घुले आमच्या ऑफिसमध्ये आला. 'तुम्हाला काम चालू करायचे असेल तर वाल्मीक कराडची भेट घ्या, तोपर्यंत काम चालू करू नका, नाही तर तुम्हाला त्रास होईल,' अशी धमकी दिल्याचेही जबाबात म्हटले आहे.

जबाबात म्हटले, खंडणीत अडथळा म्हणूनच खून 

संतोष देशमुख हे ६ डिसेंबर २०२४ रोजी मदतीला आले होते; परंतु तेच खंडणीत अडथळा ठरल्याने ९ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांनी देशमुख यांची अपहरण करून हत्या केल्याचे शिंदे यांनी जबाबात म्हटले आहे.

'प्लांट सुरू ठेवायचा असेल तर २ कोटी रुपये द्या'

२८ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी कराडचा फोन आला. बाहेरील व्यवहार शिवाजी थोपटे हे पाहत असल्यामुळे तो त्यांच्याकडे दिला. कराड याने 'तुम्ही परळीत येऊन भेटा नाही तर काम बंद करा', असे म्हणाल्याचे सांगितले. त्यानंतर ११ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता कराडचा फोन आला.

'तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या,' असे तो म्हणाला. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी थोपटे, कराड, विष्णू चाटे यांच्यात परळी येथील जगमित्र कार्यालयात भेट झाली. यात कराड याने थोपटे यांना 'प्लांट सुरू ठेवायचा असेल तर २ कोटी रुपये द्या.

नाही तर जिल्ह्यात कोठेही प्लांट सुरू ठेवू देणार नाही,' अशी धमकी दिली. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुले आवादा कंपनीत आला. 'वाल्मीक अण्णांनी मागितलेले २ कोटी रुपये दिले नाहीत तर बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काम करू देणार नाही,' अशी धमकी दिली. 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरण