शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ऐन दुष्काळात मांजरा धरण ठरले संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:25 IST

या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीने सर्वत्र तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील ३२ गावातील लाखो लोकांची दुष्काळी परिस्थितीतही तहान भागवत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ३२ गावांसह शेजारच्या जिल्ह्यांनाही पाणीपुरवठा । जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध

दीपक नाईकवाडे।लोकमत न्यूज नेटवर्ककेज : या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीने सर्वत्र तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणबीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील ३२ गावातील लाखो लोकांची दुष्काळी परिस्थितीतही तहान भागवत आहे. मांजरा धरणात पिण्याच्या पाण्यासाठी जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याने हे धरण तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांना संजीवनी ठरले आहे.केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणातून लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यातील ३२ गावांना तसेच लातूर एमआयडीसीसह येडेश्वरी साखर कारखान्यास पाणी पुरवठा केला जातो.मागील दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात मांजरा धरण कोरडेठाक पडल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या, तर लातूरच्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी शासनास लातूर येथे रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता, तर बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता.दोन वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थितीने कोरडेठाक पडलेले मांजरा धरण परतीच्या पावसात अवघ्या तीन दिवसात भरल्याने बीड, लातूर ,उस्मानाबाद जिल्ह्यातील ३२ गावांना या धरणातून परत पाणीपुरवठा चालू करण्यात आला. मात्र, याही वर्षी पावसाने दगा दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने परत एकदा तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. मात्र, या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीत बीड, लातूर ,उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना मांजरा धरण संजीवनी ठरले आहे.मांजरा धरणातून बीड जिल्ह्यातील केज ,धारुरसह १२ गावांची पाणीपुरवठा योजना, भालगाव, युसूफवडगाव, माळेगाव, धनेगाव, नायगाव, साळेगाव येथील नागरिकांना, लातूर जिल्ह्यातील लातूर महानगर पालिका , ग्रामपंचायत मुरुड, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरासह शिराढोण, पूर्व लोटा, कोथळा, आवाढ, शिरपुरा, करंजकल्ला, दाभा , हिंगणगाव या गांवाना पाणीपुरवठा योजनाद्वारे मांजरा धरणातुन पाणी पुरवठा होत आहे.दुष्काळी परिस्थिती असतानाही आजमितीस मांजरा धरणात १४.३५१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये काही अंशी गाळ असण्याची शक्यता आहे. बीड , लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील योजनेस पाणीपुरवठा करण्यासाठी वार्षिक २ दशलक्ष घनमीटर पाणी लागते. वर्षात धरणातुन २ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने धरणातील पाण्याचा पिण्याच्या पाण्यासह बाष्पीभवनासह एकूण ४ दशलक्ष घनमीटर वापर होतो.धरणातील सद्य:स्थितीतील उपलब्ध पाणीसाठा पाहता जुलै अखेरपर्यंत हे पाणी तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागवणार असल्याने ऐन दुष्काळातही मांजरा धरण बीड ,लातुर , उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांसाठी संजीवनी ठरले आहे.केज, धारुर तसेच १२ गाव पाणीपुरवठा योजना धरणपातळीवरुन एक मीटर उंचीवर असल्याने नगरपंचायतने पाणी पुरवठा करण्यासाठी चर खोदण्याची आवश्यकता आहे. तसे नियोजन झाल्यास अडचणी दूर होऊ शकतात. सद्य:स्थितीमध्ये केज धारुरसह १२ गावाना मांजरा धरणातून जुलै अखेर पर्यंत पाणीपुरवठा होऊ शकतो, अशी माहिती शाखा अभियंता शहाजी पाटील यांनी दिली आहे.आवाहन : पाणी काटकसरीने वापरामांजरा धरणातून पाणीपुरवठा होत असलेल्या गावातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास मांजरा धरणातील पाणी एक महिना जास्त म्हणजे आॅगस्टपर्यंत पुरु शकते अशी माहिती पाटबंधारे सिंचन शाखा क्रमांक १ चे शाखा अभियंता शहाजी पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :BeedबीडManjara Damमांजरा धरणwater shortageपाणीटंचाई