शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दुष्काळात मांजरा धरण ठरले संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:25 IST

या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीने सर्वत्र तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील ३२ गावातील लाखो लोकांची दुष्काळी परिस्थितीतही तहान भागवत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ३२ गावांसह शेजारच्या जिल्ह्यांनाही पाणीपुरवठा । जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध

दीपक नाईकवाडे।लोकमत न्यूज नेटवर्ककेज : या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीने सर्वत्र तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणबीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील ३२ गावातील लाखो लोकांची दुष्काळी परिस्थितीतही तहान भागवत आहे. मांजरा धरणात पिण्याच्या पाण्यासाठी जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याने हे धरण तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांना संजीवनी ठरले आहे.केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणातून लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यातील ३२ गावांना तसेच लातूर एमआयडीसीसह येडेश्वरी साखर कारखान्यास पाणी पुरवठा केला जातो.मागील दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात मांजरा धरण कोरडेठाक पडल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या, तर लातूरच्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी शासनास लातूर येथे रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता, तर बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता.दोन वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थितीने कोरडेठाक पडलेले मांजरा धरण परतीच्या पावसात अवघ्या तीन दिवसात भरल्याने बीड, लातूर ,उस्मानाबाद जिल्ह्यातील ३२ गावांना या धरणातून परत पाणीपुरवठा चालू करण्यात आला. मात्र, याही वर्षी पावसाने दगा दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने परत एकदा तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. मात्र, या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीत बीड, लातूर ,उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना मांजरा धरण संजीवनी ठरले आहे.मांजरा धरणातून बीड जिल्ह्यातील केज ,धारुरसह १२ गावांची पाणीपुरवठा योजना, भालगाव, युसूफवडगाव, माळेगाव, धनेगाव, नायगाव, साळेगाव येथील नागरिकांना, लातूर जिल्ह्यातील लातूर महानगर पालिका , ग्रामपंचायत मुरुड, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरासह शिराढोण, पूर्व लोटा, कोथळा, आवाढ, शिरपुरा, करंजकल्ला, दाभा , हिंगणगाव या गांवाना पाणीपुरवठा योजनाद्वारे मांजरा धरणातुन पाणी पुरवठा होत आहे.दुष्काळी परिस्थिती असतानाही आजमितीस मांजरा धरणात १४.३५१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये काही अंशी गाळ असण्याची शक्यता आहे. बीड , लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील योजनेस पाणीपुरवठा करण्यासाठी वार्षिक २ दशलक्ष घनमीटर पाणी लागते. वर्षात धरणातुन २ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने धरणातील पाण्याचा पिण्याच्या पाण्यासह बाष्पीभवनासह एकूण ४ दशलक्ष घनमीटर वापर होतो.धरणातील सद्य:स्थितीतील उपलब्ध पाणीसाठा पाहता जुलै अखेरपर्यंत हे पाणी तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागवणार असल्याने ऐन दुष्काळातही मांजरा धरण बीड ,लातुर , उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांसाठी संजीवनी ठरले आहे.केज, धारुर तसेच १२ गाव पाणीपुरवठा योजना धरणपातळीवरुन एक मीटर उंचीवर असल्याने नगरपंचायतने पाणी पुरवठा करण्यासाठी चर खोदण्याची आवश्यकता आहे. तसे नियोजन झाल्यास अडचणी दूर होऊ शकतात. सद्य:स्थितीमध्ये केज धारुरसह १२ गावाना मांजरा धरणातून जुलै अखेर पर्यंत पाणीपुरवठा होऊ शकतो, अशी माहिती शाखा अभियंता शहाजी पाटील यांनी दिली आहे.आवाहन : पाणी काटकसरीने वापरामांजरा धरणातून पाणीपुरवठा होत असलेल्या गावातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास मांजरा धरणातील पाणी एक महिना जास्त म्हणजे आॅगस्टपर्यंत पुरु शकते अशी माहिती पाटबंधारे सिंचन शाखा क्रमांक १ चे शाखा अभियंता शहाजी पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :BeedबीडManjara Damमांजरा धरणwater shortageपाणीटंचाई