शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

अनाथ असताना मिळाला ‘सहारा’; आता शेकडो हात करणार कन्यादान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 7:48 PM

‘बालग्राम’मध्ये सोहळा : दानशूरच करणार अहेर अन् बांधणार बस्ता

ठळक मुद्दे या सोहळ्यात दानशूरच अहेर घेणार असून बस्ता बांधण्याची तयारीही काहींनी दर्शविली आहे.

- सोमनाथ खताळ

बीड : अनाथ, उपेक्षित, वंचित मुलांचा सांभाळ करणाऱ्या बालग्राम अनाथालयातील कन्येचा विवाह सोहळा २३ फेब्रुवारीला पार पडत आहे. वयाच्या १४ व्या वर्षी अनाथ म्हणून आलेली बालिका आता २० व्या वर्षी लग्नबंधनात अडकत आहे. ‘सहारा’ देण्याबरोबरच मायेची ऊब मिळाल्यानंतर आता तिचे कन्यादान केले जाणार आहे. या सोहळ्यात दानशूरच अहेर घेणार असून बस्ता बांधण्याची तयारीही काहींनी दर्शविली आहे. 

मनीषाचे (नाव बदललेले) न कळणाऱ्या वयातच आई-वडिलांचे छत्र हरवले. नंतर ती आत्याकडे आली; परंतु तिचा येथे व्यवस्थित सांभाळ झाला नाही. साधारण १४ वर्ष वय असताना ती काळोखाच्या रात्री पोलिसांना मिळून आली. ती काहीच सांगत नव्हती. म्हणून पोलिसांनी तिला थेट सहारा अनाथालयात आणले. येथे प्रीती व संतोष गर्जे यांनी तिला सहारा आणि आई-वडिलांचे प्रेम दिले. सहा वर्षे पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करण्याबरोच तिचे शिक्षण पूर्ण केले. चांगले स्थळ आल्याने तिचे लग्न लावून देण्याचा निर्णय झाला. सोलापूर जिल्ह्यातील मंगेशने (नाव बदललेले) तिला पसंत करून लग्नाची इच्छा व्यक्त केली. २३ फेब्रुवारीला सकाळी ११.४५ वाजता लग्नाची वेळ ठरविण्यात आली आहे. सोहळ्याला लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, व्यापारी आदींची उपस्थित राहणार आहेत. पत्रिका वाटपही सुरू आहे.

सुराणा परिवाराने स्वीकारले पालकत्वपरभणी येथील कविता व गौतम सुराणा यांना मुलगी नाही. त्यांनी मनीषाचे पालकत्व स्वीकारण्याबरोबरच कन्यादानाची तयारी दर्शविली आहे. तिला त्यांनी मानसकन्या मानले आहे. लग्नपत्रिकेवर तसा उल्लेखही आहे. तर प्रीती व संतोष गर्जे आणि बालग्राम परिवाराची कन्या, असाही उल्लेख पत्रिकेवर आहे. लग्नानंतर येणे-जाण्यासह सर्व जबाबदारी सुराणा परिवार घेणार असल्याचे सांगण्यात आले. 

मदतीचे आवाहनबालग्राम परिवारातील मुलीचे हे पहिले लग्न असणार आहे. त्यामुळे खर्चही मोठ्या प्रमाणात आहे. अनेक दानशुरांनी सढळ हाताने मदत केली आहे. आणखी मदतीची गरज व्यक्त केली जात आहे. बालग्राम परिवाराला मदत करण्याचे आवाहन प्रीती व संतोष गर्जे यांनी केले आहे. 

१०७ मुलांचा बालग्राम परिवारवेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, कैद्यांची मुले, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, उपेक्षित, वंचित, निरश्रित अशा विविध गटांतील मुलांचा बालग्राममध्ये सांभाळ केला जातो. सध्या येथे १०७ मुले असून यामध्ये ४८ मुलींचा समावेश आहे. प्रीती व संतोष गर्जे हे तरूण दाम्पत्य या मुलांचा सांभाळ करते. 

टॅग्स :marriageलग्नBeedबीडsocial workerसमाजसेवक