शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
4
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
5
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
6
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
7
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
8
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
9
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
10
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
11
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
12
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
13
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
15
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतच संपवले जीवन; पालकांचा शिक्षकावर गंभीर आरोप
16
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
17
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
18
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
19
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
20
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये ५५ लाखांचा धान्य घोटाळा; तीन गोदाम व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 13:47 IST

याच प्रकरणातील चौकशीचा अहवाल बाजूने देण्यासाठी अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती.  

ठळक मुद्दे१४ हजार ६८७ क्विंटल धान्याची तफावत बीड तहसीलदारांना आढळली.परमिट  एकापेक्षा अधिक वेळा वापर करून अपहार केला. 

बीड : बीडच्या शासकीय धान्य गोदामातून १४ हजार ६८७ क्विंटल धान्य काळ्या बाजारात विक्री करून तब्बल ५५ लाख रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन तीन गोदाम व्यवस्थापकांवर बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणातील चौकशीचा अहवाल बाजूने देण्यासाठी अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती.  

अतुल अरविंद झेंड, संजय नारायण हांगे व नितीन तुकाराम जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या तत्कालीन गोदाम व्यवस्थापकांची नावे आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी हरीश्चंद्र गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शासकीय धान्य गोदाम आहे. या गोदामात २० फेब्रुवारी २०१८ रोजी व्यवस्थापकांच्या अहवालातून १४ हजार ६८७ क्विंटल धान्याची तफावत बीड तहसीलदारांना आढळली. त्यांनी हा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला. त्याप्रमाणे २४ मार्च २०१८ रोजी पुरवठा विभाग, औरंगाबादच्या उपायुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी २८ मार्च २०१८ ला अपर जिल्ह्याधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांनी २९ आॅक्टोबर २०१८ रोजी या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच जणांचे पथक नियुक्त केले.

या पथकाने चौकशी करून अहवाल अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. यामध्ये ५५ लाख ३ हजार ५०९ रूपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले. २४ फेब्रुवारी २०१९ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी त्याचे अवलोकन केले, मात्र निर्णय झाला नव्हता. १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी यावर निर्णय घेऊन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे गवळी यांनी बीड ग्रामीण ठाणे गाठून तत्कालीन तीन गोदाम व्यवस्थापकांविरोधात फिर्याद दिली. त्याप्रमाणे फसवणूक व इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ हे करत आहेत. 

असा केला अपहार तत्कालीन गोदाम व्यवस्थापक अतुल अरविंद झेंड व संजय नारायण हांगे यांनी डिसेंबर २०१४ ते मार्च २०१६ या कालावधीत १५५८ क्विंटल धान्य (किंमत ३८ लाख ७ हजार ३५७ रूपये), संजय हांंगे यांनी याच कालावधीत साखरेच्या मूळ परमिटची एकापेक्षा अधिक वेळा नोंद करून ५७३.४४ क्विंटल साखरेचा (किंमत १४ लाख ७ हजार ७७७ रूपये) घोटाळा केला. याच कालावधीत नितीन तुकाराम जाधव यांनी ३ आॅक्टोबर २०१५ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत ११२.०५ क्विंटल (किंमत २३ लाख ८ हजार ३७४ रूपये) धान्याचे मुळ धान्य परमिट एकापेक्षा अधिक वेळा वापर करून अपहार केला. 

धान्यमाफियांची साखळी सक्रियशासकीय धान्य गोदामातून गरिबांसाठी आलेले धान्य काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची साखळी आहे. काहीही घोटाळा झाला की चौकशी अधिकारी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार करतात. धान्यमाफियांची एक साखळी बीड जिल्ह्यात सक्रिय असल्याचे सांगण्यात येत आहे. गरिबांना उपाशी ठेवून धान्य काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा प्रकार यावरून स्पष्ट झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कांबळे एसीबीच्या जाळ्यातयाच प्रकरणाची चौकशी एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांच्याकडे होती. त्याचा अहवाल गोदाम व्यवस्थापकांच्या बाजूने देण्यासाठी कांबळेंनी ५ लाख रूपयांची लाच मागितली होती. याचवेळी एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले होते.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस