शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये ५५ लाखांचा धान्य घोटाळा; तीन गोदाम व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 13:47 IST

याच प्रकरणातील चौकशीचा अहवाल बाजूने देण्यासाठी अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती.  

ठळक मुद्दे१४ हजार ६८७ क्विंटल धान्याची तफावत बीड तहसीलदारांना आढळली.परमिट  एकापेक्षा अधिक वेळा वापर करून अपहार केला. 

बीड : बीडच्या शासकीय धान्य गोदामातून १४ हजार ६८७ क्विंटल धान्य काळ्या बाजारात विक्री करून तब्बल ५५ लाख रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन तीन गोदाम व्यवस्थापकांवर बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणातील चौकशीचा अहवाल बाजूने देण्यासाठी अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती.  

अतुल अरविंद झेंड, संजय नारायण हांगे व नितीन तुकाराम जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या तत्कालीन गोदाम व्यवस्थापकांची नावे आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी हरीश्चंद्र गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शासकीय धान्य गोदाम आहे. या गोदामात २० फेब्रुवारी २०१८ रोजी व्यवस्थापकांच्या अहवालातून १४ हजार ६८७ क्विंटल धान्याची तफावत बीड तहसीलदारांना आढळली. त्यांनी हा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला. त्याप्रमाणे २४ मार्च २०१८ रोजी पुरवठा विभाग, औरंगाबादच्या उपायुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी २८ मार्च २०१८ ला अपर जिल्ह्याधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांनी २९ आॅक्टोबर २०१८ रोजी या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच जणांचे पथक नियुक्त केले.

या पथकाने चौकशी करून अहवाल अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. यामध्ये ५५ लाख ३ हजार ५०९ रूपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले. २४ फेब्रुवारी २०१९ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी त्याचे अवलोकन केले, मात्र निर्णय झाला नव्हता. १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी यावर निर्णय घेऊन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे गवळी यांनी बीड ग्रामीण ठाणे गाठून तत्कालीन तीन गोदाम व्यवस्थापकांविरोधात फिर्याद दिली. त्याप्रमाणे फसवणूक व इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ हे करत आहेत. 

असा केला अपहार तत्कालीन गोदाम व्यवस्थापक अतुल अरविंद झेंड व संजय नारायण हांगे यांनी डिसेंबर २०१४ ते मार्च २०१६ या कालावधीत १५५८ क्विंटल धान्य (किंमत ३८ लाख ७ हजार ३५७ रूपये), संजय हांंगे यांनी याच कालावधीत साखरेच्या मूळ परमिटची एकापेक्षा अधिक वेळा नोंद करून ५७३.४४ क्विंटल साखरेचा (किंमत १४ लाख ७ हजार ७७७ रूपये) घोटाळा केला. याच कालावधीत नितीन तुकाराम जाधव यांनी ३ आॅक्टोबर २०१५ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत ११२.०५ क्विंटल (किंमत २३ लाख ८ हजार ३७४ रूपये) धान्याचे मुळ धान्य परमिट एकापेक्षा अधिक वेळा वापर करून अपहार केला. 

धान्यमाफियांची साखळी सक्रियशासकीय धान्य गोदामातून गरिबांसाठी आलेले धान्य काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची साखळी आहे. काहीही घोटाळा झाला की चौकशी अधिकारी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार करतात. धान्यमाफियांची एक साखळी बीड जिल्ह्यात सक्रिय असल्याचे सांगण्यात येत आहे. गरिबांना उपाशी ठेवून धान्य काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा प्रकार यावरून स्पष्ट झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कांबळे एसीबीच्या जाळ्यातयाच प्रकरणाची चौकशी एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांच्याकडे होती. त्याचा अहवाल गोदाम व्यवस्थापकांच्या बाजूने देण्यासाठी कांबळेंनी ५ लाख रूपयांची लाच मागितली होती. याचवेळी एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले होते.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस