शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

३२७ कोटी रुपयांचा आराखडा बीड जिल्हा नियोजन बैठकीत मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्हा नियोजन समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी सन २०१९-२० या वर्षासाठी ...

ठळक मुद्देपंकजा मुंडे : दुष्काळी उपाययोजनेसह क्रीडा विकासाला देणार चालना : मेटे, मुंडे गैरहजर

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा नियोजन समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी सन २०१९-२० या वर्षासाठी ३२७ कोटी ५७ लाख रुपयांचा आराखड्याला ८१ कोटीच्या वाढीव निधीसह मंजूरी देण्यात आली आहे. मंजूर आराखडा १७ जानेवारी रोजी वित्तमंत्र्यांच्या पुढे मंजूरीसाठी ठेवण्यात येणार आहे.या बैठकीस खा. डॉ.प्रीतम मुंडे, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जि.प. सिईओ अमोल येडगे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. संगीता ठोंबरे, आ. आर.टी देशमुख, आ. सुरेश धस, आ.लक्ष्मण पवार, जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार यांच्यासह नियोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी मोठी तरतूद केल्याने जिल्हयातील शाळांना नवे रुप प्राप्त होईल. यापुढे अंगणवाडी बांधकामासाठी प्रीकास्टींग तंत्राचा वापर करण्यात येईल, कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणेने लक्ष द्यावे असे निर्देश त्यांनी दिले. या प्रसंगी खा.डॉ. प्रीतम मुंडे यांनी जिल्हयातील क्रीडा विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा करु असे सांगितले. यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चारा व पाण्याचा प्रश्न जिल्हयात गंभीर असल्याची बाब सांगितली.बोअरला परवानगी नाकारावीबैठकीनंतर पत्रकारपरिषदेमध्ये पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनांसोबत,विविध क्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी आराखड्यात अधिक तरतूद केल्याचे सांगितले. तलावांमधील गाळ काढण्यात येणार असून गरजेनूसार चारा छावण्या सुरु केल्या जातील. भूजल पातळीविषयी खालावल्याने बोअर घेण्यासाठी परवानगी नाकारली पाहिजे, प्रशासनाने याविषयी निर्णय घ्यावा. जलयुक्त शिवार घोटाळ््यासंदर्भात अधिकाऱ्यांना अटक केले जात नाही या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. प्रशासनस्तरावर कारवाई केली जाईल. यावेळी खा.डॉ.प्रीतम मुंडे व जिल्हाधिकारी एम.डी.सिंह उपस्थित होते.त्यांना विकासाचे महत्त्व वाटत नसेलजिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या गैरहजेरीबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, जिल्ह्याच्या विकासाचे महत्त्व त्यांना वाटत नसेल म्हणून ते गैरहजर असतात, ते फक्त विधीमंडळात बोलतात, तसेच यापुर्वीच्या देखील अनेक बैठकांना ते गैरहजर होते अशी टिपणीही त्यांनी केली.शिवसेना वाढावी.. राष्टÑवादी कमी व्हावी..उद्धव ठाकरे यांच्या बीड जिल्हा दौºयासंदर्भात विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या, राष्ट्रवादी कमी होऊन शिवसेना वाढली तर आनंद आहे. भाजप मात्र कमी होणार नसल्याचे त्या म्हणाल्या. बीड जिल्ह्यातील शिवसेनेचा राजकीय दुष्काळ संपवा, असे आवाहन ठाकरे यांनी त्या सभेत केले होते.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडPankaja Mundeपंकजा मुंडेPritam Mundeप्रीतम मुंडे