शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

३२७ कोटी रुपयांचा आराखडा बीड जिल्हा नियोजन बैठकीत मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्हा नियोजन समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी सन २०१९-२० या वर्षासाठी ...

ठळक मुद्देपंकजा मुंडे : दुष्काळी उपाययोजनेसह क्रीडा विकासाला देणार चालना : मेटे, मुंडे गैरहजर

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा नियोजन समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी सन २०१९-२० या वर्षासाठी ३२७ कोटी ५७ लाख रुपयांचा आराखड्याला ८१ कोटीच्या वाढीव निधीसह मंजूरी देण्यात आली आहे. मंजूर आराखडा १७ जानेवारी रोजी वित्तमंत्र्यांच्या पुढे मंजूरीसाठी ठेवण्यात येणार आहे.या बैठकीस खा. डॉ.प्रीतम मुंडे, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जि.प. सिईओ अमोल येडगे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. संगीता ठोंबरे, आ. आर.टी देशमुख, आ. सुरेश धस, आ.लक्ष्मण पवार, जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार यांच्यासह नियोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी मोठी तरतूद केल्याने जिल्हयातील शाळांना नवे रुप प्राप्त होईल. यापुढे अंगणवाडी बांधकामासाठी प्रीकास्टींग तंत्राचा वापर करण्यात येईल, कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणेने लक्ष द्यावे असे निर्देश त्यांनी दिले. या प्रसंगी खा.डॉ. प्रीतम मुंडे यांनी जिल्हयातील क्रीडा विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा करु असे सांगितले. यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चारा व पाण्याचा प्रश्न जिल्हयात गंभीर असल्याची बाब सांगितली.बोअरला परवानगी नाकारावीबैठकीनंतर पत्रकारपरिषदेमध्ये पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनांसोबत,विविध क्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी आराखड्यात अधिक तरतूद केल्याचे सांगितले. तलावांमधील गाळ काढण्यात येणार असून गरजेनूसार चारा छावण्या सुरु केल्या जातील. भूजल पातळीविषयी खालावल्याने बोअर घेण्यासाठी परवानगी नाकारली पाहिजे, प्रशासनाने याविषयी निर्णय घ्यावा. जलयुक्त शिवार घोटाळ््यासंदर्भात अधिकाऱ्यांना अटक केले जात नाही या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. प्रशासनस्तरावर कारवाई केली जाईल. यावेळी खा.डॉ.प्रीतम मुंडे व जिल्हाधिकारी एम.डी.सिंह उपस्थित होते.त्यांना विकासाचे महत्त्व वाटत नसेलजिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या गैरहजेरीबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, जिल्ह्याच्या विकासाचे महत्त्व त्यांना वाटत नसेल म्हणून ते गैरहजर असतात, ते फक्त विधीमंडळात बोलतात, तसेच यापुर्वीच्या देखील अनेक बैठकांना ते गैरहजर होते अशी टिपणीही त्यांनी केली.शिवसेना वाढावी.. राष्टÑवादी कमी व्हावी..उद्धव ठाकरे यांच्या बीड जिल्हा दौºयासंदर्भात विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या, राष्ट्रवादी कमी होऊन शिवसेना वाढली तर आनंद आहे. भाजप मात्र कमी होणार नसल्याचे त्या म्हणाल्या. बीड जिल्ह्यातील शिवसेनेचा राजकीय दुष्काळ संपवा, असे आवाहन ठाकरे यांनी त्या सभेत केले होते.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडPankaja Mundeपंकजा मुंडेPritam Mundeप्रीतम मुंडे