शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

रस्ते कागदावर, पैसा समोरच्या बंगल्यात जायचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:06 IST

पाच वर्षांपूर्वी गेवराई मतदार संघासाठी जेवढा निधी आला, तो फक्त कागदावरच यायचा. रस्ते कागदावर आणि पैसे मात्र समोरच्या बंगल्यात जायचे अशी टीका करत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सभास्थळाजवळ असलेल्या ‘कृष्णाई’ बंगल्याकडे कटाक्ष टाकला.

ठळक मुद्देपंकजा मुंडे यांची टीका : मुख्यमंत्री म्हणाले, जनता विरोधकांना २५ वर्षे जवळ करणार नाही; पवारांची केली प्रशंसा

सखाराम शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : पाच वर्षांपूर्वी गेवराई मतदार संघासाठी जेवढा निधी आला, तो फक्त कागदावरच यायचा. रस्ते कागदावर आणि पैसे मात्र समोरच्या बंगल्यात जायचे अशी टीका करत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सभास्थळाजवळ असलेल्या ‘कृष्णाई’ बंगल्याकडे कटाक्ष टाकला. तर राज्यातील जनता आमचे दैवत आहे व संकटात भाजपा सरकार त्यांच्यासोबत आहे. विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेता सुध्दा मिळाला नाही व या पुढे देखील मिळणार नाही. पुढील २५ वर्षे राज्यातील जनतादेखील विरोधकांना जवळ करणार नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.गेवराई येथील शाहुनगरी येथे मंगळवारी महाजनादेश यात्रेच्या सभेत ते बोलत होते. बीडहून निघालेल्या महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यासाठी गढीपासून ते गेवराईपर्यंत जवळपास ४ हजार मोटार सायकलींची रॅली काढण्यात आली. सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री पंकजा मुंडे, खा.डॉ.प्रितम मुंडे, आ.आर.टी. देशमुख, आ.सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, आ. सुरजितसिंह ठाकूर, आ.संगिता ठोंबरे, आ.भीमराव धोंडे, जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, शिवराज पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, राजेंद्र मस्के आदी उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रामाणिक आणि विकासाची दृष्टी असल्यामुळे लक्ष्मण पवार आम्हाला आवडतात. या पाच वर्षात रस्ते कागदावर नाही तर जनतेसाठी चकाचक मजबूत बनविले. भ्रष्टाचारमुक्त करणाऱ्या पवारांच्या पाठिशी म्हणून आम्ही आहोत. जातीची शिडी घेऊन राजकारण करणाºया मंडळींना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी जागा दाखवली, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :BeedबीडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपा