शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

धोका वाढतोय; पुन्हा पाच बळी, बाधितांचा आकडा ३० हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 4:33 AM

बीड : जिल्ह्याची कोरोनास्थिती दिवसेंदिवस बिकट बनत आहे. शुक्रवारीही पुन्हा ७३२ नवे रुग्ण आढळून आले. पाच जणांचा मृत्यू झाला. ...

बीड : जिल्ह्याची कोरोनास्थिती दिवसेंदिवस बिकट बनत आहे. शुक्रवारीही पुन्हा ७३२ नवे रुग्ण आढळून आले. पाच जणांचा मृत्यू झाला. दिलासादायक हे की, ३३८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. मागील काही दिवसांत मृत्यू आणि नव्या रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचे दिसत आहे, तसेच एकूण बाधितांचा आकडाही ३० हजार पार गेल्याने चिंता व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल ६ हजार ४९६ जणांची कोरोना चाचणी केली गेली. यामध्ये ५ हजार ७६४ जण कोरोना निगेटिव्ह आढळून आले, तर ७३२ नवे रुग्ण आढळून आले. बीड, अंबाजोगाई आणि आष्टीत सर्वाधिक रुग्ण आढळले. बीडमध्ये २१६, अंबाजोगाईत १२७, आष्टीत १२७, धारूरमध्ये १७, गेवराईत ५५, केजमध्ये ६७, माजलगावात ३५, परळीत ४८, पाटोद्यात २६, शिरूरमध्ये ०६ आणि वडवणी तालुक्यात ०८ नवे रुग्ण आढळून आले. दिवसभरात ३३८ जण कोरोनामुक्त झाले. त्यांना रुग्णालयातून सुटी दिली गेली, तसेच शुक्रवारी पाच जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. यामध्ये माजलगाव शहरातील समर्थनगर भागातील ५८ वर्षीय पुरुष, केज शहरातील ६५ वर्षीय महिला, अंबाजोगाई तालुक्यातील मुडेगाव येथील ७० वर्षीय महिला, केज तालुक्यातील नांदूरघाट येथील ६५ वर्षीय पुरुष, आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथील ५५ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे.

दरम्यान, आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ३० हजार ५१४ झाली आहे. पैकी २६ हजार ७२४ जण कोरोनामुक्त झाले असून, ६९० जणांचा मृत्यू झाला आहे. जि.प.चे सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डाॅ. पी.के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.