शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ तोंडावर असताना आरक्षित पाण्याचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:20 IST

परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पुढील काळात माजलगाव तालुक्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. माजलगाव धरणातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. धरणात सध्या असलेले पाणी पुढील चार ते पाच महिने केवळ पिण्यासाठी पुरु शकते, अशी परिस्थिती असताना धरण बॅकवॉटरवरून मोठ्या प्रमाणावर मोटारीद्वारे पाण्याचा बेसुमार उपसा होत आहे. यावर अंकुश न ठेवल्यास मोठ्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.

ठळक मुद्देहजारो मोटार रात्रंदिवस चालू : कार्यवाही शून्य, माजलगाव धरण भर पावसाळ्यात वजा ५ टक्के

पुरुषोत्तम करवा ।लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पुढील काळात माजलगाव तालुक्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. माजलगाव धरणातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. धरणात सध्या असलेले पाणी पुढील चार ते पाच महिने केवळ पिण्यासाठी पुरु शकते, अशी परिस्थिती असताना धरण बॅकवॉटरवरून मोठ्या प्रमाणावर मोटारीद्वारे पाण्याचा बेसुमार उपसा होत आहे. यावर अंकुश न ठेवल्यास मोठ्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.माजलगाव धरण हे बीड, माजलगाव आणि किमान ७० ते ८० गावांसाठी वरदान आहे. पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या या धरणामुळे सुटली असली तरी यावर्षी पावसाचे प्रमाण नगण्य राहिल्यामुळे धरण भर पावसाळ्यात जोत्याखाली आहे.असे असले तरी सध्या धरणात असलेल्या पाण्यावर पिण्याच्या पाण्याची गरज पुढील किमान ४ ते ५ महिने भागू शकते कारण उन्हामुळे होणारे बाष्पीभवन आणि पाणीपुरवठा वगळता धरणाच्या पाण्यातून होत असलेला बेसुमार पाणी उपसा हा भविष्यातील गंभीर परिस्थितीचे करण ठरू लागले आहे. प्रशासनाच्या वतीने उपलब्ध असलेला जलसाठा हा केवळ पिण्यासाठी आरक्षित केलेला असताना बेसुमार उपशामुळे धरणाची पातळी दिवसेंदिवस कमालीची खालावत चालली आहे. सध्या धरणाची पाणी पातळी ही वजा ५ टक्के इतकी घटली असून शनिवारी पाणी पातळी ही ४२५.५९ मी. इतकी होती. तर उपयुक्त साठा हा १२६.७० दलघमी इतका कमी असल्यामुळे आता शेती व परळी येथील थर्मलला पाणी देणे आता शक्य होणार नाही. उपलब्ध साठा केवळ आणि केवळ पिण्यासाठीच पुरु शकतो, अशी माहिती धरण अभियंता राजेंद्र दहातोंडे यांनी दिली.कार्यवाहीसाठी पथक नियुक्तमाजलगाव धरणातून व इतर जल साठ्यांमधून पाणी चोरी रोखण्यासाठी प्रशासनाने शुक्रवारी उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, महावितरण, पाटबंधारे विभागाचे अधिकारी व अभियंते यांची बैठक घेण्यात येऊन पाणी संरक्षणासाठीच्या उपाययोजनांची समीक्षा करण्यात आली. महसूल, पोलीस, पाटबंधारे, महावितरणच्या लोकांचे एक पथक तयार करण्यात आले असून,कार्यवाही बाबतचे पूर्ण अधिकार त्यांना देण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार एन.जी. झम्पलवाड यांनी दिली.नदी पात्रातूनही उपसामाजलगाव धरणा खालोखाल सिंदफणा नदी पात्रातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा सुरू असून, नदी पत्रातील पाणी चोरीवर देखील कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणwater shortageपाणीटंचाई