शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दुष्काळ तोंडावर असताना आरक्षित पाण्याचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:20 IST

परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पुढील काळात माजलगाव तालुक्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. माजलगाव धरणातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. धरणात सध्या असलेले पाणी पुढील चार ते पाच महिने केवळ पिण्यासाठी पुरु शकते, अशी परिस्थिती असताना धरण बॅकवॉटरवरून मोठ्या प्रमाणावर मोटारीद्वारे पाण्याचा बेसुमार उपसा होत आहे. यावर अंकुश न ठेवल्यास मोठ्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.

ठळक मुद्देहजारो मोटार रात्रंदिवस चालू : कार्यवाही शून्य, माजलगाव धरण भर पावसाळ्यात वजा ५ टक्के

पुरुषोत्तम करवा ।लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पुढील काळात माजलगाव तालुक्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. माजलगाव धरणातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. धरणात सध्या असलेले पाणी पुढील चार ते पाच महिने केवळ पिण्यासाठी पुरु शकते, अशी परिस्थिती असताना धरण बॅकवॉटरवरून मोठ्या प्रमाणावर मोटारीद्वारे पाण्याचा बेसुमार उपसा होत आहे. यावर अंकुश न ठेवल्यास मोठ्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.माजलगाव धरण हे बीड, माजलगाव आणि किमान ७० ते ८० गावांसाठी वरदान आहे. पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या या धरणामुळे सुटली असली तरी यावर्षी पावसाचे प्रमाण नगण्य राहिल्यामुळे धरण भर पावसाळ्यात जोत्याखाली आहे.असे असले तरी सध्या धरणात असलेल्या पाण्यावर पिण्याच्या पाण्याची गरज पुढील किमान ४ ते ५ महिने भागू शकते कारण उन्हामुळे होणारे बाष्पीभवन आणि पाणीपुरवठा वगळता धरणाच्या पाण्यातून होत असलेला बेसुमार पाणी उपसा हा भविष्यातील गंभीर परिस्थितीचे करण ठरू लागले आहे. प्रशासनाच्या वतीने उपलब्ध असलेला जलसाठा हा केवळ पिण्यासाठी आरक्षित केलेला असताना बेसुमार उपशामुळे धरणाची पातळी दिवसेंदिवस कमालीची खालावत चालली आहे. सध्या धरणाची पाणी पातळी ही वजा ५ टक्के इतकी घटली असून शनिवारी पाणी पातळी ही ४२५.५९ मी. इतकी होती. तर उपयुक्त साठा हा १२६.७० दलघमी इतका कमी असल्यामुळे आता शेती व परळी येथील थर्मलला पाणी देणे आता शक्य होणार नाही. उपलब्ध साठा केवळ आणि केवळ पिण्यासाठीच पुरु शकतो, अशी माहिती धरण अभियंता राजेंद्र दहातोंडे यांनी दिली.कार्यवाहीसाठी पथक नियुक्तमाजलगाव धरणातून व इतर जल साठ्यांमधून पाणी चोरी रोखण्यासाठी प्रशासनाने शुक्रवारी उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, महावितरण, पाटबंधारे विभागाचे अधिकारी व अभियंते यांची बैठक घेण्यात येऊन पाणी संरक्षणासाठीच्या उपाययोजनांची समीक्षा करण्यात आली. महसूल, पोलीस, पाटबंधारे, महावितरणच्या लोकांचे एक पथक तयार करण्यात आले असून,कार्यवाही बाबतचे पूर्ण अधिकार त्यांना देण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार एन.जी. झम्पलवाड यांनी दिली.नदी पात्रातूनही उपसामाजलगाव धरणा खालोखाल सिंदफणा नदी पात्रातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा सुरू असून, नदी पत्रातील पाणी चोरीवर देखील कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणwater shortageपाणीटंचाई