शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

दुष्काळ तोंडावर असताना आरक्षित पाण्याचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:20 IST

परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पुढील काळात माजलगाव तालुक्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. माजलगाव धरणातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. धरणात सध्या असलेले पाणी पुढील चार ते पाच महिने केवळ पिण्यासाठी पुरु शकते, अशी परिस्थिती असताना धरण बॅकवॉटरवरून मोठ्या प्रमाणावर मोटारीद्वारे पाण्याचा बेसुमार उपसा होत आहे. यावर अंकुश न ठेवल्यास मोठ्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.

ठळक मुद्देहजारो मोटार रात्रंदिवस चालू : कार्यवाही शून्य, माजलगाव धरण भर पावसाळ्यात वजा ५ टक्के

पुरुषोत्तम करवा ।लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पुढील काळात माजलगाव तालुक्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. माजलगाव धरणातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. धरणात सध्या असलेले पाणी पुढील चार ते पाच महिने केवळ पिण्यासाठी पुरु शकते, अशी परिस्थिती असताना धरण बॅकवॉटरवरून मोठ्या प्रमाणावर मोटारीद्वारे पाण्याचा बेसुमार उपसा होत आहे. यावर अंकुश न ठेवल्यास मोठ्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.माजलगाव धरण हे बीड, माजलगाव आणि किमान ७० ते ८० गावांसाठी वरदान आहे. पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या या धरणामुळे सुटली असली तरी यावर्षी पावसाचे प्रमाण नगण्य राहिल्यामुळे धरण भर पावसाळ्यात जोत्याखाली आहे.असे असले तरी सध्या धरणात असलेल्या पाण्यावर पिण्याच्या पाण्याची गरज पुढील किमान ४ ते ५ महिने भागू शकते कारण उन्हामुळे होणारे बाष्पीभवन आणि पाणीपुरवठा वगळता धरणाच्या पाण्यातून होत असलेला बेसुमार पाणी उपसा हा भविष्यातील गंभीर परिस्थितीचे करण ठरू लागले आहे. प्रशासनाच्या वतीने उपलब्ध असलेला जलसाठा हा केवळ पिण्यासाठी आरक्षित केलेला असताना बेसुमार उपशामुळे धरणाची पातळी दिवसेंदिवस कमालीची खालावत चालली आहे. सध्या धरणाची पाणी पातळी ही वजा ५ टक्के इतकी घटली असून शनिवारी पाणी पातळी ही ४२५.५९ मी. इतकी होती. तर उपयुक्त साठा हा १२६.७० दलघमी इतका कमी असल्यामुळे आता शेती व परळी येथील थर्मलला पाणी देणे आता शक्य होणार नाही. उपलब्ध साठा केवळ आणि केवळ पिण्यासाठीच पुरु शकतो, अशी माहिती धरण अभियंता राजेंद्र दहातोंडे यांनी दिली.कार्यवाहीसाठी पथक नियुक्तमाजलगाव धरणातून व इतर जल साठ्यांमधून पाणी चोरी रोखण्यासाठी प्रशासनाने शुक्रवारी उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, महावितरण, पाटबंधारे विभागाचे अधिकारी व अभियंते यांची बैठक घेण्यात येऊन पाणी संरक्षणासाठीच्या उपाययोजनांची समीक्षा करण्यात आली. महसूल, पोलीस, पाटबंधारे, महावितरणच्या लोकांचे एक पथक तयार करण्यात आले असून,कार्यवाही बाबतचे पूर्ण अधिकार त्यांना देण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार एन.जी. झम्पलवाड यांनी दिली.नदी पात्रातूनही उपसामाजलगाव धरणा खालोखाल सिंदफणा नदी पात्रातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा सुरू असून, नदी पत्रातील पाणी चोरीवर देखील कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणwater shortageपाणीटंचाई