शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शेतकरीविरोधी कायदे रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST

अंबाजोगाई : शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र काही केल्या थांबत नाही. आर्थिक पॅकेजेस, कर्जमाफी ...

अंबाजोगाई : शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र काही केल्या थांबत नाही. आर्थिक पॅकेजेस, कर्जमाफी आदी सरकारकडून केल्या जाणाऱ्या मदतीनेही परिस्थितीत बदल झालेला नाही. यासाठी शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनीचे तुकडे पडत आहेत. जमीनधारणा इतकी लहान झाली आहे की, त्यावर कुटुंबाची उपजीविका भागविणेदेखील कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याची आणि शेती व शेतकऱ्यांशी संबंधित जाचक कायदे रद्द करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शेतकऱ्यांसाठी शेतकरीविरोधी कायदे गळफास बनले आहेत. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार करून तातडीने पावले उचलायला हवीत.

भूसंपादन कायदा हा नेहमीच शेतकऱ्यांना धोकादायक ठरत आला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी काढून त्या इतर व्यावसायिकांना देणे थांबविले पाहिजे. या परिस्थितीमुळे कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळत नाही. म्हणून हे कायदे रद्द केल्यावरच कृषी विकासाचा मार्ग खुला होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी कृषी क्षेत्राची पुनर्बांधणी होणे आवश्यक झाले आहे, अशी मागणीही मुंदडा यांनी केली आहे.