शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीविरोधी कायदे रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST

अंबाजोगाई : शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र काही केल्या थांबत नाही. आर्थिक पॅकेजेस, कर्जमाफी ...

अंबाजोगाई : शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र काही केल्या थांबत नाही. आर्थिक पॅकेजेस, कर्जमाफी आदी सरकारकडून केल्या जाणाऱ्या मदतीनेही परिस्थितीत बदल झालेला नाही. यासाठी शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनीचे तुकडे पडत आहेत. जमीनधारणा इतकी लहान झाली आहे की, त्यावर कुटुंबाची उपजीविका भागविणेदेखील कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याची आणि शेती व शेतकऱ्यांशी संबंधित जाचक कायदे रद्द करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शेतकऱ्यांसाठी शेतकरीविरोधी कायदे गळफास बनले आहेत. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार करून तातडीने पावले उचलायला हवीत.

भूसंपादन कायदा हा नेहमीच शेतकऱ्यांना धोकादायक ठरत आला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी काढून त्या इतर व्यावसायिकांना देणे थांबविले पाहिजे. या परिस्थितीमुळे कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळत नाही. म्हणून हे कायदे रद्द केल्यावरच कृषी विकासाचा मार्ग खुला होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी कृषी क्षेत्राची पुनर्बांधणी होणे आवश्यक झाले आहे, अशी मागणीही मुंदडा यांनी केली आहे.