शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

शेतकरीविरोधी कायदे रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST

अंबाजोगाई : शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र काही केल्या थांबत नाही. आर्थिक पॅकेजेस, कर्जमाफी ...

अंबाजोगाई : शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र काही केल्या थांबत नाही. आर्थिक पॅकेजेस, कर्जमाफी आदी सरकारकडून केल्या जाणाऱ्या मदतीनेही परिस्थितीत बदल झालेला नाही. यासाठी शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनीचे तुकडे पडत आहेत. जमीनधारणा इतकी लहान झाली आहे की, त्यावर कुटुंबाची उपजीविका भागविणेदेखील कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याची आणि शेती व शेतकऱ्यांशी संबंधित जाचक कायदे रद्द करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शेतकऱ्यांसाठी शेतकरीविरोधी कायदे गळफास बनले आहेत. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार करून तातडीने पावले उचलायला हवीत.

भूसंपादन कायदा हा नेहमीच शेतकऱ्यांना धोकादायक ठरत आला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी काढून त्या इतर व्यावसायिकांना देणे थांबविले पाहिजे. या परिस्थितीमुळे कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळत नाही. म्हणून हे कायदे रद्द केल्यावरच कृषी विकासाचा मार्ग खुला होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी कृषी क्षेत्राची पुनर्बांधणी होणे आवश्यक झाले आहे, अशी मागणीही मुंदडा यांनी केली आहे.