शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

शेतकरीविरोधी कायदे रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST

अंबाजोगाई : शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र काही केल्या थांबत नाही. आर्थिक पॅकेजेस, कर्जमाफी ...

अंबाजोगाई : शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र काही केल्या थांबत नाही. आर्थिक पॅकेजेस, कर्जमाफी आदी सरकारकडून केल्या जाणाऱ्या मदतीनेही परिस्थितीत बदल झालेला नाही. यासाठी शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनीचे तुकडे पडत आहेत. जमीनधारणा इतकी लहान झाली आहे की, त्यावर कुटुंबाची उपजीविका भागविणेदेखील कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याची आणि शेती व शेतकऱ्यांशी संबंधित जाचक कायदे रद्द करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शेतकऱ्यांसाठी शेतकरीविरोधी कायदे गळफास बनले आहेत. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार करून तातडीने पावले उचलायला हवीत.

भूसंपादन कायदा हा नेहमीच शेतकऱ्यांना धोकादायक ठरत आला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी काढून त्या इतर व्यावसायिकांना देणे थांबविले पाहिजे. या परिस्थितीमुळे कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळत नाही. म्हणून हे कायदे रद्द केल्यावरच कृषी विकासाचा मार्ग खुला होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी कृषी क्षेत्राची पुनर्बांधणी होणे आवश्यक झाले आहे, अशी मागणीही मुंदडा यांनी केली आहे.