शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

ऊस गाळपाचा प्रश्न पेटला, शिल्लक उसाला आग लावून शेतकऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 16:10 IST

गाळपास ऊस न गेल्याने त्यावरील खर्च व डोक्यावरील कर्ज कसे फिटणार या विवंचनेत शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय

गेवराई (बीड) : तालुक्यातील हिंगणगाव येथील एका शेतकऱ्याने ऊस गाळपास जात नसल्याने नैराश्यात होते. त्यामुळे शिल्लक उसाला आग लावून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास हिंगणगाव येथे उघडकीस आली आहे. नामदेव आसाराम जाधव ( 32 ) मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचल्याने शिल्लक उसाचा प्रश्न गंभीर बनल्याचे स्पष्ट झाले आहे.  

नामदेव आसाराम जाधव तालुक्यातील हिंगणगाव येथे राहत. त्यांन गाव शिवारात ३ एकर शेत जमीन आहे. यातील १ एकर शेतात जाधव यांनी उसाची लागवड केली होती. मात्र, गळीत हंगाम संपत आला तरीही जाधव यांचा ऊस शेतातच होता. गाळपाला जात नसलेला ऊस जागेवरच राहिल्याने वजन घटत होते, शिवाय त्याच्यावर केलेला खर्च कसा निघणार याच्या विवंचनेत जाधव होते. 

दरम्यान, आज सकाळी जाधव शेतात गेले. येथे दुपारी १२ वाजेच्या सुमारास जाधव यांनी शेतातील उभ्या ऊसाला आग लावली. त्यानंतर शेतातच लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन जाधव यांनी आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गाळपास ऊस जात नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पुढे गंभीर समस्या उभ्या आहेत. जाधव यांची आत्महत्या यामुळेच झाल्याने शिल्लक उसाचा प्रश्न गंभीर वळणावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.  प्राथमिक माहितीनुसार जाधव यांच्याकडे बँकेचे व खाजगी सावकाराचे कर्ज होते. जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेfarmer suicideशेतकरी आत्महत्या