शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ऊस गाळपाचा प्रश्न पेटला, शिल्लक उसाला आग लावून शेतकऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 16:10 IST

गाळपास ऊस न गेल्याने त्यावरील खर्च व डोक्यावरील कर्ज कसे फिटणार या विवंचनेत शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय

गेवराई (बीड) : तालुक्यातील हिंगणगाव येथील एका शेतकऱ्याने ऊस गाळपास जात नसल्याने नैराश्यात होते. त्यामुळे शिल्लक उसाला आग लावून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास हिंगणगाव येथे उघडकीस आली आहे. नामदेव आसाराम जाधव ( 32 ) मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचल्याने शिल्लक उसाचा प्रश्न गंभीर बनल्याचे स्पष्ट झाले आहे.  

नामदेव आसाराम जाधव तालुक्यातील हिंगणगाव येथे राहत. त्यांन गाव शिवारात ३ एकर शेत जमीन आहे. यातील १ एकर शेतात जाधव यांनी उसाची लागवड केली होती. मात्र, गळीत हंगाम संपत आला तरीही जाधव यांचा ऊस शेतातच होता. गाळपाला जात नसलेला ऊस जागेवरच राहिल्याने वजन घटत होते, शिवाय त्याच्यावर केलेला खर्च कसा निघणार याच्या विवंचनेत जाधव होते. 

दरम्यान, आज सकाळी जाधव शेतात गेले. येथे दुपारी १२ वाजेच्या सुमारास जाधव यांनी शेतातील उभ्या ऊसाला आग लावली. त्यानंतर शेतातच लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन जाधव यांनी आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गाळपास ऊस जात नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पुढे गंभीर समस्या उभ्या आहेत. जाधव यांची आत्महत्या यामुळेच झाल्याने शिल्लक उसाचा प्रश्न गंभीर वळणावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.  प्राथमिक माहितीनुसार जाधव यांच्याकडे बँकेचे व खाजगी सावकाराचे कर्ज होते. जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेfarmer suicideशेतकरी आत्महत्या