शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

शिल्लक निधीची छावणी चालकांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:26 IST

बीड : जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी दुष्काळजन्य स्थितीत शेतकऱ्यांचे पशुधन जगावे म्हणून शासनाने सामाजिक संस्थांना चारा छावण्या सुरू करून ...

बीड : जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी दुष्काळजन्य स्थितीत शेतकऱ्यांचे पशुधन जगावे म्हणून शासनाने सामाजिक संस्थांना चारा छावण्या सुरू करून चालवण्यासाठी परवानगी दिली होती, मात्र छावण्या बंद होऊन दोन वर्षे झाली तरी शिल्लक निधी अद्याप छावणीचालकांना मिळालेला नाही. छावणी चालकांना शिल्लक राहिलेली रक्कम व आकारलेल्या दंडाची रक्कम तत्काळ द्यावी, अशा मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना देण्यात आले.

दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा व शासनाला सहकार्य म्हणून सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने चारा छावण्या सुरू केल्या. शासन निधी देण्यात विलंब केला तरी सामाजिक संस्थांनी इतरांकडून उसनवार करीत चारा छावण्या चालू ठेवून शेतकऱ्यांना दिलासा व शासकीय यंत्रणेला मदत केली होती. नंतर काही दिवसांनी शासनाने छावणीचालक संस्थांचा निधी उपलब्ध करून दिला.

परंतु निधी देताना काही रक्कम शासनाने आपल्याकडेच ठेवून घेतली आहे. जी आजपर्यंत मिळाली नसल्याचे छावणीचालकांचे म्हणणे आहे. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ५० जनावरे हालचाल रजिस्टरवरील गृहीत धरले जातील, असे आश्वासन दिले होते; परंतु ते पाळले गेले नाही व नंतर जनावरांची संख्या कमी भरली म्हणून दंड आकारणी केल्याचे छवणीचालकांनी निवेदनात म्हटले आहे. आज छावण्या बंद होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत तरी शिल्लक राहिलेला निधी आजपर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे प्रशासनाने शिल्लक राहिलेली रक्कम व आकारलेल्या दंडाची रक्कम तत्काळ देण्याची मागणी निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात डॉ. राजेंद्र बंड, हनुमान जगताप, बाळासाहेब हावळे, बाबू बहिरवाल, हिरामण शिंदे आदींचा सहभाग होता.