शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

बीड जिल्हाभरात पाऊस ७९ टक्के, धरणांमध्ये पाणीसाठा केवळ १८ टक्केच

By शिरीष शिंदे | Updated: October 2, 2023 18:44 IST

धरण क्षेत्र परिसरात पाऊस झाला नसल्याचा परिणाम

बीड : मान्सूनचा चार महिन्यांचा हंगाम संपला असून या कालावधीत एकूण ७९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्या तुलनेत जिल्ह्यातील १४३ लहान-माेठ्या पाणीसाठा प्रकल्पात केवळ १८ टक्केच पाणीसाठा झाला आहे. सरासरीच्या तुलनेत झालेला बहुतांश पाऊस हा मुर स्वरुपाचा असल्याचे मानले जात आहे. धरण क्षेत्र परिसरात पाऊस झाला नसल्याने पाणीसाठा अत्यल्प झाला असल्याचा अंदाज आहे. आता, सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे डोळे परतीच्या पावसाकडे लागले आहेत.

जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पेरण्या रखडल्या होत्या. जुलै महिन्याच्या अखेरीस बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झाली होती. परिणामी याच काळात पेरणीची टक्केवारी वाढली. बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात २०२३-२४ मध्ये एकूण ७ लाख ८२ हजार ३०८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ही पेरणी जिल्ह्याच्या सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९९.५६ टक्के आहे. पावसाच्या खंडामुळे सोयाबीन, मूग व उडीद पिकाची उत्पादकता घटण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली होती. दरम्यान, गणपती बाप्पांच्या आगमनानंतर पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर चांगल्या पावसाला सुरुवात झाली. मुर स्वरूपाच्या पावसाने सरासरी पावसाची टक्केवारी ५० टक्क्यांवरून थेट ७९.१ टक्क्यांवर जाऊन पाेहोचली. हा पाऊस पिकांना जीवनदान देणारा ठरला. परंतु धरणांसाठी लाभदायक ठरला नाही.

आता परतीच्या पावसावर मदारमागील काही वर्षांचा मागोवा घेतला तर परतीच्या पावसाने सर्व धरणे काही दिवसांत किंवा एकाच दिवसात भरून गेल्याचे लक्षात येईल. २०१६-१७ मध्ये बीडमध्ये एकाच रात्री झालेल्या पावसामुळे सर्वच्या सर्व धरणे भरून गेली असल्याचा अनुभव बीडकरांना आहे. आतापर्यंत चांगला पाऊस झाला तरी पाणीसाठा नसल्याची परिस्थिती परतीच्या पावसामुळे बदलून जाऊ शकते असा विश्वास अनेक शेतकऱ्यांना आहे. केवळ बीड जिल्हाच नाही तर राज्यात परतीच्या पावसाचा मोठा प्रभाव असतो.

प्रकल्प-उपयुक्त पाणीसाठा (दलघमी)-टक्केवारी

माजलगाव-परळी विभाग-३९.२००-१२.५६

बीड विभाग-८.८८४-३३.९५

परळी विभाग-२१.८८-२७.३९

मध्यम प्रकल्प-१७.१४२-३७.३९

लघु प्रकल्प-१९.५२३-४४.८७

सर्व प्रकल्प- १३२.६१२-१८.५३

 

आतापर्यंत झालेला पाऊस

तालुका-वार्षिक सरासरी-आतापर्यंतचा पाऊस-टक्केवारी

बीड-५९४.५-४२३.३-७०.९

पाटोदा-५३८.७-४३०.७-७९.७

आष्टी-५४६.१-५१४.२-९३.७

गेवराई-५८७.०-३६२.४-६१.५

माजलगाव-६१६.९-४३४.९-७०.२

अंबाजोगाई-६३२.४-६०१.४-९४.७

केज-५८३.६-५६५.७-९६.६

परळी-६२८.१-३६८.४-५८.४

धारुर-६६९.८-४६८.४-६९.७

वडवणी-६००.७-३६०.५-५९.८

शिरुर-५१५.६-३९४.७-७६.२

एकूण-५६६.१-४४९.२-७९.०

 

बिंदुसरा धरणात १९ टक्के पाणीसाठा

माजलगाव प्रकल्पात १२.५६ टक्के, तालुक्यातील पाली येथे बिंदुसरा धरणात सद्स्थितीला १८.९१ टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. शिरुर तालुक्यातील सिंदफणा प्रकल्पात ५७.३७ टक्के तर पाटोदा तालुक्यातील महासांगवी प्रकल्पात ५६.३९ टक्के पाणीसाठा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

 

टॅग्स :RainपाऊसBeedबीडDamधरण