शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

बीड जिल्हाभरात पाऊस ७९ टक्के, धरणांमध्ये पाणीसाठा केवळ १८ टक्केच

By शिरीष शिंदे | Updated: October 2, 2023 18:44 IST

धरण क्षेत्र परिसरात पाऊस झाला नसल्याचा परिणाम

बीड : मान्सूनचा चार महिन्यांचा हंगाम संपला असून या कालावधीत एकूण ७९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्या तुलनेत जिल्ह्यातील १४३ लहान-माेठ्या पाणीसाठा प्रकल्पात केवळ १८ टक्केच पाणीसाठा झाला आहे. सरासरीच्या तुलनेत झालेला बहुतांश पाऊस हा मुर स्वरुपाचा असल्याचे मानले जात आहे. धरण क्षेत्र परिसरात पाऊस झाला नसल्याने पाणीसाठा अत्यल्प झाला असल्याचा अंदाज आहे. आता, सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे डोळे परतीच्या पावसाकडे लागले आहेत.

जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पेरण्या रखडल्या होत्या. जुलै महिन्याच्या अखेरीस बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झाली होती. परिणामी याच काळात पेरणीची टक्केवारी वाढली. बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात २०२३-२४ मध्ये एकूण ७ लाख ८२ हजार ३०८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ही पेरणी जिल्ह्याच्या सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९९.५६ टक्के आहे. पावसाच्या खंडामुळे सोयाबीन, मूग व उडीद पिकाची उत्पादकता घटण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली होती. दरम्यान, गणपती बाप्पांच्या आगमनानंतर पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर चांगल्या पावसाला सुरुवात झाली. मुर स्वरूपाच्या पावसाने सरासरी पावसाची टक्केवारी ५० टक्क्यांवरून थेट ७९.१ टक्क्यांवर जाऊन पाेहोचली. हा पाऊस पिकांना जीवनदान देणारा ठरला. परंतु धरणांसाठी लाभदायक ठरला नाही.

आता परतीच्या पावसावर मदारमागील काही वर्षांचा मागोवा घेतला तर परतीच्या पावसाने सर्व धरणे काही दिवसांत किंवा एकाच दिवसात भरून गेल्याचे लक्षात येईल. २०१६-१७ मध्ये बीडमध्ये एकाच रात्री झालेल्या पावसामुळे सर्वच्या सर्व धरणे भरून गेली असल्याचा अनुभव बीडकरांना आहे. आतापर्यंत चांगला पाऊस झाला तरी पाणीसाठा नसल्याची परिस्थिती परतीच्या पावसामुळे बदलून जाऊ शकते असा विश्वास अनेक शेतकऱ्यांना आहे. केवळ बीड जिल्हाच नाही तर राज्यात परतीच्या पावसाचा मोठा प्रभाव असतो.

प्रकल्प-उपयुक्त पाणीसाठा (दलघमी)-टक्केवारी

माजलगाव-परळी विभाग-३९.२००-१२.५६

बीड विभाग-८.८८४-३३.९५

परळी विभाग-२१.८८-२७.३९

मध्यम प्रकल्प-१७.१४२-३७.३९

लघु प्रकल्प-१९.५२३-४४.८७

सर्व प्रकल्प- १३२.६१२-१८.५३

 

आतापर्यंत झालेला पाऊस

तालुका-वार्षिक सरासरी-आतापर्यंतचा पाऊस-टक्केवारी

बीड-५९४.५-४२३.३-७०.९

पाटोदा-५३८.७-४३०.७-७९.७

आष्टी-५४६.१-५१४.२-९३.७

गेवराई-५८७.०-३६२.४-६१.५

माजलगाव-६१६.९-४३४.९-७०.२

अंबाजोगाई-६३२.४-६०१.४-९४.७

केज-५८३.६-५६५.७-९६.६

परळी-६२८.१-३६८.४-५८.४

धारुर-६६९.८-४६८.४-६९.७

वडवणी-६००.७-३६०.५-५९.८

शिरुर-५१५.६-३९४.७-७६.२

एकूण-५६६.१-४४९.२-७९.०

 

बिंदुसरा धरणात १९ टक्के पाणीसाठा

माजलगाव प्रकल्पात १२.५६ टक्के, तालुक्यातील पाली येथे बिंदुसरा धरणात सद्स्थितीला १८.९१ टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. शिरुर तालुक्यातील सिंदफणा प्रकल्पात ५७.३७ टक्के तर पाटोदा तालुक्यातील महासांगवी प्रकल्पात ५६.३९ टक्के पाणीसाठा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

 

टॅग्स :RainपाऊसBeedबीडDamधरण