शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
2
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
3
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
4
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
6
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
7
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
8
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
9
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
10
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
11
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
12
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
13
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
14
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
15
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
16
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
17
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
18
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
19
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
20
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

बीडमध्ये पावसाचा कहर; देवीनिमगावातील पूल धोकादायक, तर अर्धामसला गावाचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 15:42 IST

या दोन्ही घटनांमुळे प्रवाशांची आणि शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

कडा/गेवराई (बीड) : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पूरस्थितीमुळे गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथील पूल धोकादायक बनला असून, गेवराई तालुक्यातील अर्धामसला गावाचा संपर्क तुटला आहे. या दोन्ही घटनांमुळे प्रवाशांची आणि शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

देवीनिमगावातील पूल खिळखिळा; जड वाहतूक बंदआष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथील नदीवर असलेला पूल धोकादायक बनल्याने तो जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलाची उंची कमी असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात तो पाण्याखाली जातो. गेल्या आठ दिवसांत दोनदा महापूर आल्याने पुलाचे संरक्षण कठडे आणि रस्ता उखडला आहे. आता हा पूल ठिकठिकाणी तुटल्यामुळे मोठी वाहने बंद करण्यात आली आहेत. हा पूल पूर्णपणे खिळखिळा झाला असून, यामुळे मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे स्थानिकांनी सांगितले. पैठण-बारामती महामार्गावर हा पूल असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. सामाजिक कार्यकर्ते रमेश गावडे यांनी या पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली आहे.

अर्धामसला गावाचा संपर्क तुटलादरम्यान, गेवराई तालुक्यातही पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यामुळे अर्धामसला गावाजवळून वाहणाऱ्या खराडी नदीला पूर आल्याने गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गावातील नागरिक राजू खळगे आणि अशोक नरवडे यांनी सांगितले की, गावात जाण्यायेण्याचा एकमेव मार्ग गेल्या चार तासांपासून बंद आहे. नदी, नाले आणि ओढ्यांना आलेल्या पुरामुळे शेतातील पिकेही पूर्णपणे वाहून गेली आहेत. सर्व पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या दोन्ही घटनांनी प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

टॅग्स :floodपूरBeedबीडRainपाऊस