शहरं
Join us  
Trending Stories
1
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
2
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
3
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
4
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
5
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
6
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
7
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
8
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
9
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
10
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
11
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
12
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
13
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
14
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
15
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
16
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
17
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
18
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
19
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
20
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये पावसाचा कहर; देवीनिमगावातील पूल धोकादायक, तर अर्धामसला गावाचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 15:42 IST

या दोन्ही घटनांमुळे प्रवाशांची आणि शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

कडा/गेवराई (बीड) : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पूरस्थितीमुळे गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथील पूल धोकादायक बनला असून, गेवराई तालुक्यातील अर्धामसला गावाचा संपर्क तुटला आहे. या दोन्ही घटनांमुळे प्रवाशांची आणि शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

देवीनिमगावातील पूल खिळखिळा; जड वाहतूक बंदआष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथील नदीवर असलेला पूल धोकादायक बनल्याने तो जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलाची उंची कमी असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात तो पाण्याखाली जातो. गेल्या आठ दिवसांत दोनदा महापूर आल्याने पुलाचे संरक्षण कठडे आणि रस्ता उखडला आहे. आता हा पूल ठिकठिकाणी तुटल्यामुळे मोठी वाहने बंद करण्यात आली आहेत. हा पूल पूर्णपणे खिळखिळा झाला असून, यामुळे मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे स्थानिकांनी सांगितले. पैठण-बारामती महामार्गावर हा पूल असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. सामाजिक कार्यकर्ते रमेश गावडे यांनी या पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली आहे.

अर्धामसला गावाचा संपर्क तुटलादरम्यान, गेवराई तालुक्यातही पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यामुळे अर्धामसला गावाजवळून वाहणाऱ्या खराडी नदीला पूर आल्याने गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गावातील नागरिक राजू खळगे आणि अशोक नरवडे यांनी सांगितले की, गावात जाण्यायेण्याचा एकमेव मार्ग गेल्या चार तासांपासून बंद आहे. नदी, नाले आणि ओढ्यांना आलेल्या पुरामुळे शेतातील पिकेही पूर्णपणे वाहून गेली आहेत. सर्व पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या दोन्ही घटनांनी प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

टॅग्स :floodपूरBeedबीडRainपाऊस