शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

पाऊस उघडला, दिवाळीचा बाजार फुलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:26 AM

शनिवारी पावसाने उघडीप दिल्याने व सूर्यदर्शन झाल्याने बाजारात ग्राहकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर दिसून आली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : विधानसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत शुकाशुकाट असलेल्या बाजारपेठेलादिवाळीच्या तोंडावर ग्राहकी अपेक्षित होती. मात्र, नंतरच्या दोन दिवसात जिल्ह्यात झालेल्या पावसाने बाजाराच्या आशेवर पाणी फेरले. अखेर शनिवारी पावसाने उघडीप दिल्याने व सूर्यदर्शन झाल्याने बाजारात ग्राहकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर दिसून आली.यावर्षी पावसाळी मोसमात अपुरा पाऊस झाल्याने दुष्काळी सावट होते. त्यामुळे दसऱ्याच्या वेळी बाजारपेठेत फारशी उलाढाल झाली नाही. मात्र, मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे रबीच्या आशा उंचावल्यामुळे तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी बाजारात कपडे, शोभीवंत वस्तू, दागिने, नवीन खरेदीसाठी ग्राहकांची शनिवारी दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. सुभाष रोड, भाजी मंडई, कारंजा, जालना रोड, धोंडीपुरा, सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स परिसर गर्दीने फुलला होता. त्याचबरोबर वारंवार वाहतुकीची कोंडी होत होती.पावसामुळे खरेदी करणे शक्य झाले नाही अशा ग्राहकांनी आकाशदिवे खरेदी केले. त्या चांगल्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे व्यापाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला. रांगोळी, पणती, गृहसजावटीचे साहित्य, फुलांच्या माळा, विद्युत रोषणाईचे साहित्य खरेदी करण्यात ग्राहक मग्न होते. बांगड्या, इमिटेशन ज्वलेरीची महिला वर्गाकडून खरेदी होत होती.फटाका बाजारात ८० दुकाने थाटलेली आहेत. सुमारे तीन कोटी रुपयांपर्यंत फटाके व्यापारी गुंतवणूक करतात. आठवडाभर पावसामुळे बाजार परिसरात चिखल साचला, तर काही व्यापा-यांचा माल भिजल्याने नुकसान झाले. यंदा ग्राहक येतील की नाही, अशी चिंता असताना शनिवारी उघडीप झाल्याने सर्वच दुकानांवर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली.दस-याच्यावेळी गुंतवणूक करुनही दुष्काळी स्थितीमुळे कापड बाजाराकडे ग्राहक फिरकलेला नव्हता. मात्र, पाऊस झाल्याने खरिपाचे नुकसान झाले तरी रबी हंगाम चांगला जाईल आणि टंचाई मिटल्याने कापड बाजारात रेडीमेड कपडे, साड्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची पावले वळाली. बँ्रडेड कपड्यांना त्यांनी प्राधान्य दिले.

टॅग्स :DiwaliदिवाळीMarketबाजार