शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

शाळेत क्वारंटाईन अन् गावातील तरुणांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवरुन वाद, दोन्ही कुटुंबाला केलं क्वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 22:07 IST

पुणे मुंबई वरून गावात  आलेल्या लोकांना कोरांटाईन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी ग्राम पंचायतींना दिलेले आहेत.

बीड - धारूर (वार्ताहर) - अंबेवडगाव येथील  कोरांटाईन केलेल्या तरुणासोबत गावातील एका तरूणाचे व्हॉटसप वरील मॅसेजच्या कारणावरुन शाळेतच भांडण झाले. हा वाद वाढत असताना सरपंचानी मध्यस्थी करुन हे भांडण सोडवले. मात्र, या दोन्ही कुटूंबाना क्वांराटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला.  

पुणे मुंबई वरून गावात  आलेल्या लोकांना कोरांटाईन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी ग्राम पंचायतींना दिलेले आहेत. त्याप्रमाणे धारूर तालुक्यातील अंबेवडगाव ग्रामपंचायतनेदेखील पुणे मुंबई वरून आलेल्या कांही लोकांना जि.प.शाळेत कोरांटाईन करून शाळेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. अशाच एका कोरांटाईन केलेल्या तरुणासोबत रविवारी १७  मे रोजी अंबेवडगाव गावातील एका तरूणाचे मोबाईल व्हाट्सअॅपवरील मॅसेजच्या कारणावरून भांडण झाले. यानंतर गावातील तो तरुण शाळेत कोरांटाईन केलेल्या तरूणाकडे गेला. शाळेत या दोन तरूणात प्रथम शाब्दिक शिवीगाळ होऊन नंतर चांगलीच धराधरी झाली. या दोन तरुणांच्या भांडणात सोशल डिस्टटंन्ससह इतर सर्व नियम धाब्यावर बसवत दोघांच्याही कुटुंबातील सदस्यांनी वादात उडी घेतली. 

या भांडणात सर्वचजण एकमेकांच्या समोरासमोर तोंडाजवळ तोंड नेत भांडताना दिसत होते. या दोन तरुणांचे शाळेत चालु असलेले भांडण गावकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला. याबाबत येथील सरपंच पौर्णिमा अशोक भोजने यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, झाला प्रकार अयोग्य असून, आम्ही दोन्ही तरुणांसह त्यांच्या कुटुंबाला पोलिसांमार्फत ताकीद दिली. त्यानंतर, दोन्ही कुटुंब होम कोरांटाईन केल्याचे सरपंच भोजने यांनी सांगितले. यापुढे त्यांनी भांडण करुन गावची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर दोन्ही कुटुंबातील सर्वांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही सरपंच भोजने यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीडPoliceपोलिसzp schoolजिल्हा परिषद शाळा