शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

गारपीटग्रस्तांना तत्काळ नुकसान भरपाई द्या; प्रकाश सोळंके यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 18:19 IST

माजलगांव तालुक्यातील अनेक गावांना रविवारी झालेल्या गारपिटीने तडाखा दिला. यात झालेल्या नुकसानीची पाहणी आज दुपारी माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केली. या वेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीची मदत देण्याची मागणी केली. 

माजलगांव (बीड ) : तालुक्यातील अनेक गावांना रविवारी झालेल्या गारपिटीने तडाखा दिला. यात झालेल्या नुकसानीची पाहणी आज दुपारी माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केली. या वेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीची मदत देण्याची मागणी केली. 

काल झालेल्या गारपिटीने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यातील मंगरूळ नंबर 2 येथे आज दुपारी माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके, जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, बाजार समितीचे सभापती अशोक डक, जयदत्त नरवडे, जिल्हा परिषद सदस्य कल्याण अबुज यांनी भेट दिली. येथे त्यांनी शेतकरी रवींद्र बापमारे यांच्या गारपिटीने नुकसान झालेल्या पपईच्या बागेची पाहणी केली. गारपिटीने संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाल्याने जवळपास 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर त्यांनी काळेगाव, दुब्बाथडी या शिवारात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या शिवारातील हरभरा, ज्वारी, गहू, कापूस व पपई, अंबा, केळी, टरबूज, खरबूज आदी फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.  

सरसकट पंचनामे करा गारपिटीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे सरसकट पंचनामे करून शेतक-यांना तत्काळ प्राथमिक मदत द्यावी, पुढील कारवाई लवकरात लवकर करून योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सोळंके यांनी यावेळी केली. यासोबतच मागील तीन वर्षांपासून शासन केवळ शेतक-यांवर घोषणांचा पाऊस पडत आहे. प्रत्यक्ष मात्र त्यांनी कसलीही मदत दिलेली नाही अशी टीका डक यांनी केली.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस