शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

बीड जिल्ह्यात पीकविमाखालील सर्व पिकांना २५ % अग्रीम मदत द्या; धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 14:07 IST

प्रशासन आणि विमा कंपनीचा गोंधळ, केवळ 16 मंडळांमध्ये अग्रीम मंजूर

परळी (बीड) -बीड जिल्ह्यातील सोयाबीनसह विमा लागू असलेल्या विविध पिकांचे रँडम सर्वेक्षण करून जिल्ह्यातील 63 पैकी 16 महसुली मंडळांमधील सोयाबीन पिकविमा धारक शेतकऱ्यांना 25% अग्रीम पीकविमा मंजूर करण्यात आला असून, सोयाबीनसह मागील तीन महिन्यात कमी अधिक पावसाने व किडींच्या विविध प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या व पीकविमा लागू असलेल्या कापूस, तूर, मूग, उडीद आदी सर्वच पिकांना सर्वच महसुली मंडळांमध्ये 25% अग्रीम विमा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात बीड जिल्ह्यात सर्वदूर काही निवडक गावे वगळता पावसाने महिनाभर उघडीप दिली होती, या काळात ऐन जोमात आलेली पिके करपु लागली. त्यातच अंबाजोगाई व अन्य काही भागात गोगलगायी व अन्य किडींच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांना दोन-तीन वेळा पेरण्या करायला भाग पाडले. बालाघाटच्या डोंगर रांगातील बहुतांश भागात अजूनही पाऊसच नाही. त्यामुळे अपेक्षित उत्पादनात प्रचंड मोठी घट येणार असल्याचे स्पष्ट आहे.

अतिवृष्टी व अन्य नैसर्गिक आपत्तीपोटी दिलेल्या मदतीतून बीड जिल्हा यापूर्वीच वगळण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांच्यासह लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी उत्पादनातील घट विचारात घेत अग्रीम पीकविमा मंजूर करण्याची केलेली मागणी विचारात घेत प्रशासनाने जिल्ह्यात रँडम सर्वेक्षण केले. 

मात्र या सर्वेक्षणाचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित विमा कंपनीने 63 पैकी केवळ 16 महसुली मंडळांमध्ये सोयाबीन पिकासाठी अग्रीम 25% विमा मंजूर केला आहे. या प्रकारामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून, शेतकऱ्यांचा आक्रोश सोशल मीडियावर देखील ट्रेंडिंग आहे.

यालाच अनुसरून धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना एक पत्र लिहिले असून, त्यांनी प्रशासनाने केलेल्या रँडम सर्वेक्षणावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जिल्ह्यातील 63 महसुली मंडळांमध्ये मागील तीन महिन्यात वेगवेगळ्या स्वरूपात नुकसान झाले असून, प्रशासनाने सर्वेक्षण करताना गांभीर्य बाळगले नसल्याचे व त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

बीड जिल्ह्यातील सर्वच महसुली मंडळांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. उत्पादनात 50% पेक्षा अधिक घट होणार हे स्वयंस्पष्ट आहे. मात्र जिल्हा प्रशासन व संबंधित विमा कंपनीने सर्वेक्षणाच्या नावावर घातलेला घोळ अक्षम्य असून, शेतकऱ्यांमध्ये यामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. 

त्यामुळे राज्य सरकारने जिल्हा प्रशासन व संबंधित विमा कंपनीला आवश्यकता असल्यास तातडीने पुन्हा फेर सर्वेक्षण करावे व सर्व 63 महसुली मंडळांमधील सोयाबीन सह कापूस, तूर, मूग, उडीद यांसह विमा लागू असलेल्या सर्वच पिकांना 25% अग्रीम विमा मंजूर करून वितरित करण्यासाठी सर्व संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे.

सरसकट 25% अग्रीम विम्यासह शेतकऱ्यांना विशेष मदतीच्या प्रश्नाचे सरकारने तात्काळ समाधान नाही केले तर शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे. 

यासंदर्भात आपण प्रसंगी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची  भेट घेणार असून, 25% अग्रीमसह गोगलगायीनी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना विशेष मदत, ऊसतोड कामगारांची नोंदणी पुन्हा सुरू करणे आदी विषयांवर चर्चा करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :BeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेagricultureशेती