शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

कैदी बनले टाळकरी अन् माळकरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 01:32 IST

विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेले कैदी आणि बंद्यांच्या मन:परिवर्तनासाठी युवकांनी उचललेले पहिले पाऊल यशस्वी ठरले आहे. सात दिवस चाललेल्या कीर्तन महोत्सवाचा बुधवारी थाटात ‘काला’ झाला. गंभीर गुन्ह्यातील कैद्यांमध्ये सात दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांमुळे मन:परिवर्तन होत असल्याचे दिसले. अनेकांनी हातात टाळ, मृदंग, वीणा, पेटी घेत विठ्ठल नामाचा गजर केला. यामुळे संपूर्ण कारागृह भक्तीमय झाले होते.

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेले कैदी आणि बंद्यांच्या मन:परिवर्तनासाठी युवकांनी उचललेले पहिले पाऊल यशस्वी ठरले आहे. सात दिवस चाललेल्या कीर्तन महोत्सवाचा बुधवारी थाटात ‘काला’ झाला. गंभीर गुन्ह्यातील कैद्यांमध्ये सात दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांमुळे मन:परिवर्तन होत असल्याचे दिसले. अनेकांनी हातात टाळ, मृदंग, वीणा, पेटी घेत विठ्ठल नामाचा गजर केला. यामुळे संपूर्ण कारागृह भक्तीमय झाले होते.

कारागृह अधीक्षक एम.एस.पवार यांच्या पुढाकारातून व प्रा.नाना महाराज कदम, सुरेश जाधव, माणूसकी ग्रुपच्या सहकार्याने मागील आठ दिवसांपासून येथील जिल्हा कारागृहात श्रावण विशेष कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवसापासूनच येथे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.कीर्तन, प्रवचन, भारूड, भजन, पोवाड्यांच्या माध्यमातून कैद्यांचे मनोरंजनाबरोबरच त्यांचे मन:परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. बुधवारी प्रा.नाना महाराज कदम यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अधीक्षक एम.एस.पवार, ह.भ.प. हरिदास जोगदंड, प्रा.संभाजी जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत काल्याची दहीहंडी फोडली. कार्यक्रमामुळे वातावरण भक्तीमय झाले होते. यावेळी ओंकार महाराज कागदे, विष्णूपंत महाराज लोंढे, नवनाथ महाराज नाईकवाडे, अतुल महाराज येवले, अंगद महाराज सातपुते, संदीप महाराज आमटे, गणेश महाराज बांडे, रेवण महाराज वायभट, गोरख महाराज वायभटसह कारागृह कर्मचारी, कैदी, बंदी आदी उपस्थित होते.

‘दो आंखे बारह हाथ’ची झाली आठवणमराठवाड्यात बीड जिल्हा कारागृहात सलग सात दिवस कीर्तन महोत्सव प्रथमच झाला. या महोत्सवात अध्यात्मातून प्रबोधनाचा प्रयत्न करण्यात आला. कारागृहातील बंद्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून व्ही. शांताराम यांच्या ‘ दो आंखे बारह हाथ’ या चित्रपटाची आठवण अनेकांना झाली. अशा उपक्रमांमुळे कैदी आणि बंद्यांच्या मनात नक्कीच परिवर्तन होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कारागृह प्रशासनाकडून प्रमाणपत्रकीर्तन महोत्सवाचे आयोजन करून तो यशस्वी पार पाडल्याबद्दल कारागृह प्रशासनाच्या वतीने प्रा.नाना महाराज कदम, सुरेश जाधव व प्रा.संभाजी जाधव यांना कारागृह अधीक्षक एम.एस.पवार यांनी प्रमाणपत्र देऊन गौरविले. यामुळे प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया प्रा.कदम महाराज यांनी व्यक्त केली.

मी बदललो, तुम्ही बदला - थोरातसहा वर्षांपूर्वी मी पण याच कारागृहात एक रात्र राहिलो आहे. त्यावेळी त्रास काय असतो, हे समजले आणि बदलण्याचा निर्णय घेतला. ज्या कारागृहात आरोपी म्हणून आलो आज त्याच कारागृहाच्या पालन पोषण समितीचा अध्यक्ष आहे. आणि ज्या रूग्णालयात पाच दिवस आरोपी म्हणून कोठडीत उपचार घेतले त्याच रूग्णालयाचा आज मी बॉस आहे. त्यामुळे झालेल्या घटना विसरून नवे आयुष्य सुरू करावे. प्रत्येकाने बदलण्याची जिद्द ठेवावी. मी जसा बदललो, तसे तुम्ही पण बदलू शकता, असा विश्वास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी कैद्यांना दिला. यावेळी डॉ.थोरात भावनिक झाले होते.

कीर्तन महोत्सव नव्हे आनंदोत्सव - पवारसात दिवस चाललेला हा कीर्तन महोत्सव नसून आमच्या बंदी, कैद्यांसाठी आनंद देणारा उत्सव ठरला. त्यांच्यात या महोत्सवामुळे काही प्रमाणात का होईन बदल झाला आहे. हे पाहून आनंद होत आहे. यापुढेही कैद्यांच्या मन:परिवर्तनासाठी असे कार्यक्रम घेण्याची गरज आहे. आमच्याकडून सर्व सहकार्य राहील. या आनंदोत्सवाची सांगता झाल्याचे दु:ख होत असल्याचे कारागृह अधीक्षक एम.एस.पवार यांनी सांगितले.

पोलीस-कैद्यांनी लुटला फुगडीचा आनंदकाल्याचे कीर्तन सुरू होण्यापूर्वी कारागृहात दिंडी काढण्यात आली. यावेळी कैद्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करीत मृदंगाच्या तालावर ठेका धरला. तर दिंडी दरम्यान, आपण कोण आहोत, हे विसरून पोलीस, बंदी तसेच कैद्यांनी फुगड्या खेळल्या. यावरून कारागृहातील कैदी आणि बंद्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून आला. त्यांचे मन: परिवर्तन करण्यात यश आल्याचे दिसून येते.

टॅग्स :BeedबीडPrisonतुरुंगMarathwadaमराठवाडा