शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू, मलेरियाला बसणार आळा; नियंत्रणासाठी ३२ विभागांची उच्चस्तरीय समिती पुनर्गठीत

By सोमनाथ खताळ | Updated: August 27, 2024 18:55 IST

सर्व विभागांमध्ये समन्वय साधून राज्यात संसर्गजन्य आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

बीड : राज्यात कीटकजन्य, जलजन्य, प्राणीजन्य आजारांच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी तसेच विविध विभागांच्या समन्वयासाठी एकत्रित आढावा घेण्यात आला. यामध्ये राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समिती पुनर्गठीत करावी, अशा सूचना राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या होत्या. त्यानुसार उच्चस्तरीय समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. याचे अध्यक्ष आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव हे राहणार असून, सदस्य म्हणून इतर ३२ विभागांचे अधिकारी असणार आहेत. सोमवारी याबाबत शासन निर्देश काढण्यात आले आहेत. यामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना आळा बसणार आहे.

राज्यातील संसर्गजन्य आजारावर प्रतिबंध व नियंत्रण मिळविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग, राष्ट्रीय विषाणू परिषद, पुणे, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, शालेय शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग यांच्यात समन्वय आवश्यक आहे. राज्यात कीटकजन्य, जलजन्य व प्राणीजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक प्रभावी उपाययोजनांसाठी व एकत्रित आढाव्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनांनुसार राज्य व जिल्हास्तरीय समिती पुनर्गठन करण्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य आयुक्तांनी सादर केला होता. त्यानुसार आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी बैठका घेऊन उच्चस्तरीय समिती पुनर्गठीत करावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे ही समिती गठीत केली आहे. यामुळे सर्व विभागांमध्ये समन्वय साधून राज्यात संसर्गजन्य आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

राज्यस्तरीय समितीत कोण?आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. त्यात इतर संबंधित ३२ विभागांच्या सदस्यांचा समावेश आहे. सहसंचालक, आरोग्य सेवा (हि. ह. व ज. ज. रोग), पुणे हे याचे सचिव असतील. दर ३ महिन्यांतून एकदा बैठक घेऊन साथरोग व आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक आहे. राज्यातील साथरोग परिस्थितीचे विश्लेषण करून साथरोग उद्भवाची कारणमीमांसा तसेच करावयाच्या प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजनांची रूपरेषा, राज्यातील सध्याच्या साथरोग नियंत्रण व्यवस्थेचा अभ्यास करून त्यात आवश्यक बदल सुचवायचे आहेत.

जिल्हा समितीत कोण असणार?जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काम करेल. यात इतर २० विभागांचे सदस्य असतील. जिल्हा आरोग्य अधिकारी या समितीचे सचिव असतील. राज्याच्या समितीप्रमाणेच यांनाही काम करावे लागेल. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सूचनेनुसार व आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही उच्चस्तरीय समिती गठीत केली जात आहे. याचा शासन आदेश निघाला आहे. ही समिती अभ्यास करून उपाय सुचवेल. त्यामुळे कीटकजन्य, जलजन्य, प्राणीजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक व नियंत्रणासाठी लाभ होणार आहे.-डॉ. आर. बी. पवार, सहसंचालक, आरोग्य सेवा, पुणे

मलेरियाची राज्याची आकडेवारी काय सांगते ?वर्ष - रुग्ण - मृत्यू२०१९ - ८८६६ - ७२०२० - १२९०९ - १२२०२१ - १९३०३ - १४२०२२ - १५४५१ - २६२०२३ - १६१५९ - १९ऑगस्ट २०२४ पर्यंत - ११८०८ - ७

डेंग्यूची राज्याची आकडेवारी काय सांगते?वर्ष - रुग्ण - मृत्यू२०१९- १४८८८ - ४९२०२० - ३३५६ - १०२०२१ - १२७२० - ४२२०२२ - ८५७८ - २७२०२३ - १९०३४ - ५५ऑगस्ट २०२४ पर्यंत - ८३१५ - १५ 

टॅग्स :Beedबीडdengueडेंग्यूHealthआरोग्यTanaji Sawantतानाजी सावंत