शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
4
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
5
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
6
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
7
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
8
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
9
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
10
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
11
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
12
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
13
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
14
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
15
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
16
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
17
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
18
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
19
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
20
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले

डेंग्यू, मलेरियाला बसणार आळा; नियंत्रणासाठी ३२ विभागांची उच्चस्तरीय समिती पुनर्गठीत

By सोमनाथ खताळ | Updated: August 27, 2024 18:55 IST

सर्व विभागांमध्ये समन्वय साधून राज्यात संसर्गजन्य आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

बीड : राज्यात कीटकजन्य, जलजन्य, प्राणीजन्य आजारांच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी तसेच विविध विभागांच्या समन्वयासाठी एकत्रित आढावा घेण्यात आला. यामध्ये राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समिती पुनर्गठीत करावी, अशा सूचना राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या होत्या. त्यानुसार उच्चस्तरीय समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. याचे अध्यक्ष आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव हे राहणार असून, सदस्य म्हणून इतर ३२ विभागांचे अधिकारी असणार आहेत. सोमवारी याबाबत शासन निर्देश काढण्यात आले आहेत. यामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना आळा बसणार आहे.

राज्यातील संसर्गजन्य आजारावर प्रतिबंध व नियंत्रण मिळविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग, राष्ट्रीय विषाणू परिषद, पुणे, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, शालेय शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग यांच्यात समन्वय आवश्यक आहे. राज्यात कीटकजन्य, जलजन्य व प्राणीजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक प्रभावी उपाययोजनांसाठी व एकत्रित आढाव्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनांनुसार राज्य व जिल्हास्तरीय समिती पुनर्गठन करण्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य आयुक्तांनी सादर केला होता. त्यानुसार आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी बैठका घेऊन उच्चस्तरीय समिती पुनर्गठीत करावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे ही समिती गठीत केली आहे. यामुळे सर्व विभागांमध्ये समन्वय साधून राज्यात संसर्गजन्य आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

राज्यस्तरीय समितीत कोण?आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. त्यात इतर संबंधित ३२ विभागांच्या सदस्यांचा समावेश आहे. सहसंचालक, आरोग्य सेवा (हि. ह. व ज. ज. रोग), पुणे हे याचे सचिव असतील. दर ३ महिन्यांतून एकदा बैठक घेऊन साथरोग व आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक आहे. राज्यातील साथरोग परिस्थितीचे विश्लेषण करून साथरोग उद्भवाची कारणमीमांसा तसेच करावयाच्या प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजनांची रूपरेषा, राज्यातील सध्याच्या साथरोग नियंत्रण व्यवस्थेचा अभ्यास करून त्यात आवश्यक बदल सुचवायचे आहेत.

जिल्हा समितीत कोण असणार?जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काम करेल. यात इतर २० विभागांचे सदस्य असतील. जिल्हा आरोग्य अधिकारी या समितीचे सचिव असतील. राज्याच्या समितीप्रमाणेच यांनाही काम करावे लागेल. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सूचनेनुसार व आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही उच्चस्तरीय समिती गठीत केली जात आहे. याचा शासन आदेश निघाला आहे. ही समिती अभ्यास करून उपाय सुचवेल. त्यामुळे कीटकजन्य, जलजन्य, प्राणीजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक व नियंत्रणासाठी लाभ होणार आहे.-डॉ. आर. बी. पवार, सहसंचालक, आरोग्य सेवा, पुणे

मलेरियाची राज्याची आकडेवारी काय सांगते ?वर्ष - रुग्ण - मृत्यू२०१९ - ८८६६ - ७२०२० - १२९०९ - १२२०२१ - १९३०३ - १४२०२२ - १५४५१ - २६२०२३ - १६१५९ - १९ऑगस्ट २०२४ पर्यंत - ११८०८ - ७

डेंग्यूची राज्याची आकडेवारी काय सांगते?वर्ष - रुग्ण - मृत्यू२०१९- १४८८८ - ४९२०२० - ३३५६ - १०२०२१ - १२७२० - ४२२०२२ - ८५७८ - २७२०२३ - १९०३४ - ५५ऑगस्ट २०२४ पर्यंत - ८३१५ - १५ 

टॅग्स :Beedबीडdengueडेंग्यूHealthआरोग्यTanaji Sawantतानाजी सावंत