शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पाच महिन्यांनंतर परळीतून वीजनिर्मिती; तीन संचांतून ६०० मेगावॅट विजेची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 6:11 PM

मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून विजेची मागणी नसल्याने परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीन संच बंद होते. 

ठळक मुद्देतिन्ही संचांची स्थापित क्षमता ७५० मेगावॅट  ६, ७ आणि ८ हे संच सुरू करण्यात आले. 

परळी (जि. बीड) : मराठवाड्यातील एकमेव नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचे बंद तीन संच तब्बल पाच महिन्यांनंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा कार्यान्वित झाले आहेत. 

राज्यात वीजेची मागणी वाढल्याने नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीन संच सुरू केल्याने राज्यातील वीज निर्मितीत वाढ झाली आहे. एकूण ७५० मेगावॅट क्षमतेच्या येथील थर्मल मधील तीन संचातून गुरु वारी दुपारी ६०० मेगावॅट वीजेची निर्मिती सुरु होती.  दाऊतपुर -दादाहरी वडगाव शिवारात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे २५० मेगावॅट क्षमतेचे संच  क्र मांक ६, संच क्र मांक ७ व संच क्र मांक ८ हे तीन संच आहेत. 

गेल्या पाच महिन्यात वीजनिर्मिती येथील संचातून झाली नाही. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे तिन्ही संच सुरु  करण्यात आले आहे. अगोदर संच क्रमांक ८ हा सुरू करण्यात आला त्यानंतर ६ व ७ क्रमांकाचे दोन संच सुरू करण्यात आले. 

तिन्ही संचांची स्थापित क्षमता ७५० मेगावॅट या तीन संचांची एकूण स्थापित क्षमता ७५० मेगावॅट आहे. गुरुवारी दुपारी तीन संचांतून ६०० मेगावॅट एवढी वीजनिर्मिती सुरु होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे राज्यातील उद्योगधंदे बंद होते. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून विजेची मागणी नसल्याने परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीन संच बंद होते.  

टॅग्स :Beedबीडelectricityवीज