शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा, जनतेत भीती; बीड जिल्ह्याचा होतोय का बिहार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 16:07 IST

विनोदाने बीडला बिहार म्हटले जात होते, परंतु आठवड्यापासून हा विनोद सत्यात उतरवू पाहत आहे.

- सोमनाथ खताळ

बीड : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात खून, दरोडे, लुटमार, धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्याचे प्रमुख आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालय आवारातच गोळीबाराची घटना घडली. या सर्व घटनांमुळे सामान्य जनता दहशतीखाली आहे. पोलिसांचा वचक कमी झाल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा झाले आहेत. विनोदाने बीडला बिहार म्हटले जात होते, परंतु आठवड्यापासून हा विनोद सत्यात उतरवू पाहत आहे. असे असतानाही बीड पोलीस आणि यंत्रणा सुधारण्याऐवजी आवाज उठविणाऱ्यांची मुस्कटदाबी करून गुन्हे दाखल करत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून कायदा व सुव्यवस्थाच हरवली आहे. खून, मारामारी, हल्ले, विनयभंग, बलात्कार, लुटमार अशा गंभीर घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच वाहतुकीचेही बारा वाजले आहेत. जिल्हादंडाधिकारी कार्यालयात गोळीबार होतो, पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर चाकूहल्ला होतो. गजबजलेल्या बसस्थानकासमोर भरदुपारी तरुणाचा खून हाेतो, यासारख्या अनेक घटनांनी जिल्हा हादरला आहे. परंतु मागील आठवड्यापासून तर एक दिवसाआड खून होत आहे. तसेच हल्लेही वाढले आहेत. या घटनांमुळे पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्यातरी बीडकरांसह जिल्हावासीय पोलीस यंत्रणेवर नाराज असून संताप व्यक्त करत असल्याचे दिसते. कायदा व सुव्यवस्थेवर सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडूनही ठोस आवाज उठविला जात नसल्याने त्यांच्याविरोधातही रोष आहे. आता यावर वेळीच उपाययोजना करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे गरजेचे आहे. जिल्हावासीयांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे आव्हान आता बीड पोलिसांसमोर आहे.

या घटनांनी हादरला जिल्हाबीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मुद्रांक कार्यालयातील भरदुपारी झालेला गोळीबार, परळीतील बहीण-भावाचा खून, परळीतच पैशाच्या व्यवहारातून महिलेचा खून, अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथील तीन चिमुकल्यांसह आईचा संशयास्पद मृत्यू, गेवराई व परळीत मृतदेहांचे सांगाडे आढळणे, आडसमध्ये काकाचा पुतण्यानेच केलेला खून, सिरसदेवीमध्ये झोपेतच दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला, बीडमध्ये बहिणीसह नियोजित वरावर भावाचा हल्ला, परळीत जुन्या रेल्वे स्थानकाजवळ युवकावर हल्ला, आष्टी तालुक्यातील वटाणवाडी येथे महिलेचा खून या गंभीर घटनांनी जिल्हा हादरला. एवढेच नव्हे तर परळीतील संभाजीनगर ठाण्यातील अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून झालेला अत्याचार, परळी ग्रामीण ठाण्यात अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार या सारख्या गंभीर व अंगावर थरकाप आणणाऱ्या घटनांचा हा लेखाजोखा आहे. यासह चोरी, अवैध वाळूउपसा, अवैध धंदे, शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या, मारामाऱ्या, शासकीय कामात अडथळा आदी गुन्ह्यांची संख्याही मोठी आहे.

एसपींविरोधात पोस्ट, जिल्हाध्यक्षांवर गुन्हाजिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आपचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यात त्यांनी पोलीस अधीक्षकांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. यावर सुधारणा करण्याऐवजी शिवाजीनगर पोलिसांनी येडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. कोणी आवाज उठविला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचे यावरून दिसत आहे. पोलिसांच्या विरोधात कोणी बोलायचेच नाही? असा काहीसा नियम पोलिसांनी लावल्याची चर्चा आहे. पोलिसांविरोधात बातम्या छापल्या तरी त्यांना नोटीस पाठविण्यासह गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिला जात असल्याची पत्रकारांमध्ये चर्चा आहे.

पंकजा मुंडेंनी उठविला आवाजजिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून याला सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केला होता. तसेच गृहमंत्र्यांनी बैठक घेण्याची मागणीही केली होती. परंतु यावर सत्ताधाऱ्यांनी ब्र शब्दही काढला नाही. या मुद्याला धरून राजकारण होत असले तरी वास्तवही आहे. याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे.

कोण काय म्हणतंय

ए राजा, खा राजा अन जा राजा असे अधिकाऱ्यांना वाटत आहे, पोलीस आरोपींशी संगनमत करतात, म्हणावा तसा तपास करीत नाहीत. आम्हाला अनेक प्रकरणात असे दिसले आहे. त्यामुळे आरोपी सुटतात आणि त्यांचे मनोबल वाढते. त्यामुळेच जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. सध्या तरी पोलीस प्रशासन जनतेच्या हिताचे काम करीत आहे.-  अॅड. अविनाश मंडले, बीड

राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. अधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे काम करू दिले नाहीत. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक हे रबरी स्टॅम्पप्रमाणे काम करीत आहेत. पोलीस प्रशासनाचा धाकच जाणवत नाही. वाळू माफिया, खून, हल्ले वाढल्याने भीती आहे. आपण महाराष्ट्रात आहोत की बिहारमध्ये हेच समजत नाही. पोलिसांकडून गुन्हेगारांना सोडून सामाजिक कार्यकर्त्यांवर मर्दानगी दाखविली जात आहे.- डॉ. गणेश ढवळे, सामाजिक कार्यकर्ते बीड

जैसा राजा तैसी प्रजा. एसपीसह प्रत्येकांचे नुसतेच विशेष पथके नियुक्त केलेत. एवढी मोठी यंत्रणा असताना रोज क्राईम घडत आहे. प्रमुखांचाच धाक नसल्याचे हे दिसत आहे. पोलिसांबद्दल लोकांच्या मनात जरबच राहिलेला नाही.- दिलीप खिस्ती, ज्येष्ठ पत्रकार बीड

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, असा प्रश्न आहे. इतर क्राईम तर वाढलेच आहे; परंतु महिला अत्याचाराचे प्रमाणही वाढत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे महिलांच्या मनात भीती आहे. त्या स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. दक्षता समितीच्या बैठकाही झाल्या नाहीत. महिलांच्या संरक्षण, नियोजनाबाबत काहीच केले जात नाही, हे दुर्दैव. - मनीषा तोकले, सामाजिक कार्यकर्त्या बीड

गेल्या काही दिवसांत घडलेल्या गुन्हेगारी घटना या वैयक्तिक स्वरुपाच्या आहेत. यातील कुठलेही प्रकरण प्रतिबंधात्मक कारवाईजोगे नव्हते. अचानक घडलेल्या या घटना असून, संबंधित ठाण्यांत गुन्हे नोंद झालेले आहेत. यावर योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू आहे.- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड