शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणखी एक हत्या टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:03 IST

करणीच्या संशयावरुन शेजारणीला संपवल्यानंतर पत्नीलाही संपविण्यासाठी निघालेल्या अशोक जंगले या आरोपीला पोलिसांनी वेळीच बेड्या ठोकल्या. १० मिनिटेही उशीर झाला असता तर तो पसार होऊन पुण्यात जाऊन आपल्या पत्नीचीही हत्या करणार होता. हा उलगडा पोलीस तपासातून झाला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका महिलेची हत्या टळली आहे.

ठळक मुद्देपेठ बीड खून प्रकरण : शेजारणीला संपवून बायकोच्या हत्येसाठी निघाला होता खुनातील आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : करणीच्या संशयावरुन शेजारणीला संपवल्यानंतर पत्नीलाही संपविण्यासाठी निघालेल्या अशोक जंगले या आरोपीला पोलिसांनी वेळीच बेड्या ठोकल्या. १० मिनिटेही उशीर झाला असता तर तो पसार होऊन पुण्यात जाऊन आपल्या पत्नीचीही हत्या करणार होता. हा उलगडा पोलीस तपासातून झाला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका महिलेची हत्या टळली आहे.शीलावती गिरी (५०, रा. अयोध्यानगर, बीड) या महिलेचा शेजारीच राहणाऱ्या अशोक जंगले याने शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बतईने गळा चिरुन हत्या केली होती. त्यानंतर तो फरार होऊन बीड तालुक्यातील इरगाव येथे आपल्या काकाच्या गावी गेला. दुचाकीतील पेट्रोल संपल्याने तो पाडळशिंगीकडे पायी निघाला. हायवेला पोहोचून तो पुण्याला जाणार होता. १० मिनिटांवर हायवे असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याला रविवारी न्यायालयात हजर केले. २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी वेळोवेळी तपासाबाबत सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक बी. एस. बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप नि. कैलास लहाने यांनी तपास सुरु केला. पोलिसांनी गुन्ह्यातील दुचाकी, हत्यार व अशोकचे रक्ताने माखलेले कपडे जप्त केले आहेत.दरम्यान, शीलावती यांनी घरावर करणी केली. त्यामुळेच आपला संसार उद्धवस्त झाला. यातूनच अशोकने शीलावती यांची हत्या केली. पत्नी अंजली जंगले ही आपल्यासोबत नांदत नसल्याने तो संतापला होता. शीलावती यांची हत्या करण्यापूर्वी सकाळी त्याचे अंजलीसोबत कडाक्याचे भांडण झाले. त्याने तिला संपविण्याची फोनवरुन धमकीही दिली होती. मात्र, अंजलीने हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. त्यानंतर काही तासांनीच अशोकने शीलावती यांचा काटा काढला. अंजलीची हत्या करण्यासाठी तो पुण्याकडे निघाला होता. पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत त्याला बेड्या ठोकल्या. त्यामुळे अंजलीचा जीव बचावला. हा सर्व प्रकार तपासातून समोर आल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.अंजली मुलांसोबत असते पुण्यातअंजली व अशोक यांना दोन मुले आहेत. दोघातील वादांमुळे अंजली पुण्यात राहत होती. केटरींगचे काम करुन ती उदरनिर्वाह भागवत होती. अशोकला अंजलीचा पत्ता माहीत होता. शनिवारी रात्री तो पुण्याला जाणार होता. रागाच्या भरात तिची हत्या करणार होता, असे सूत्रांकडून समजते.२४ तासात ३ खुनांमुळे हादरला होता बीड जिल्हाशनिवारी अवघ्या २४ तासात तब्बल ३ खुनांमुळे जिल्हा हादरला होता. याच दिवशी चौथाही खून होणार होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो टळला. या तिन्ही गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसMurderखून