शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणखी एक हत्या टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:03 IST

करणीच्या संशयावरुन शेजारणीला संपवल्यानंतर पत्नीलाही संपविण्यासाठी निघालेल्या अशोक जंगले या आरोपीला पोलिसांनी वेळीच बेड्या ठोकल्या. १० मिनिटेही उशीर झाला असता तर तो पसार होऊन पुण्यात जाऊन आपल्या पत्नीचीही हत्या करणार होता. हा उलगडा पोलीस तपासातून झाला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका महिलेची हत्या टळली आहे.

ठळक मुद्देपेठ बीड खून प्रकरण : शेजारणीला संपवून बायकोच्या हत्येसाठी निघाला होता खुनातील आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : करणीच्या संशयावरुन शेजारणीला संपवल्यानंतर पत्नीलाही संपविण्यासाठी निघालेल्या अशोक जंगले या आरोपीला पोलिसांनी वेळीच बेड्या ठोकल्या. १० मिनिटेही उशीर झाला असता तर तो पसार होऊन पुण्यात जाऊन आपल्या पत्नीचीही हत्या करणार होता. हा उलगडा पोलीस तपासातून झाला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका महिलेची हत्या टळली आहे.शीलावती गिरी (५०, रा. अयोध्यानगर, बीड) या महिलेचा शेजारीच राहणाऱ्या अशोक जंगले याने शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बतईने गळा चिरुन हत्या केली होती. त्यानंतर तो फरार होऊन बीड तालुक्यातील इरगाव येथे आपल्या काकाच्या गावी गेला. दुचाकीतील पेट्रोल संपल्याने तो पाडळशिंगीकडे पायी निघाला. हायवेला पोहोचून तो पुण्याला जाणार होता. १० मिनिटांवर हायवे असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याला रविवारी न्यायालयात हजर केले. २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी वेळोवेळी तपासाबाबत सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक बी. एस. बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप नि. कैलास लहाने यांनी तपास सुरु केला. पोलिसांनी गुन्ह्यातील दुचाकी, हत्यार व अशोकचे रक्ताने माखलेले कपडे जप्त केले आहेत.दरम्यान, शीलावती यांनी घरावर करणी केली. त्यामुळेच आपला संसार उद्धवस्त झाला. यातूनच अशोकने शीलावती यांची हत्या केली. पत्नी अंजली जंगले ही आपल्यासोबत नांदत नसल्याने तो संतापला होता. शीलावती यांची हत्या करण्यापूर्वी सकाळी त्याचे अंजलीसोबत कडाक्याचे भांडण झाले. त्याने तिला संपविण्याची फोनवरुन धमकीही दिली होती. मात्र, अंजलीने हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. त्यानंतर काही तासांनीच अशोकने शीलावती यांचा काटा काढला. अंजलीची हत्या करण्यासाठी तो पुण्याकडे निघाला होता. पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत त्याला बेड्या ठोकल्या. त्यामुळे अंजलीचा जीव बचावला. हा सर्व प्रकार तपासातून समोर आल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.अंजली मुलांसोबत असते पुण्यातअंजली व अशोक यांना दोन मुले आहेत. दोघातील वादांमुळे अंजली पुण्यात राहत होती. केटरींगचे काम करुन ती उदरनिर्वाह भागवत होती. अशोकला अंजलीचा पत्ता माहीत होता. शनिवारी रात्री तो पुण्याला जाणार होता. रागाच्या भरात तिची हत्या करणार होता, असे सूत्रांकडून समजते.२४ तासात ३ खुनांमुळे हादरला होता बीड जिल्हाशनिवारी अवघ्या २४ तासात तब्बल ३ खुनांमुळे जिल्हा हादरला होता. याच दिवशी चौथाही खून होणार होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो टळला. या तिन्ही गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसMurderखून