शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

बीडमध्ये ११४८ नागरिकांमागे एक पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:17 IST

बीड जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत बीड जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरीच आहे.

ठळक मुद्दे२५ लाख जनतेची सुरक्षा केवळ २२५० पोलिसांवर

बीड : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली की पोलिसांचे दुर्लक्ष, पोलिसांचा हलगर्जीपणा, पोलीस निकामी, असे विविध आरोप पोलिसांवर केले जातात. परंतु वास्तव परिस्थितीचा आढावा घेतला असता जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत बीड जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरीच आहे. असे असतानाही कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस दल धडपडत असते. यामध्ये त्यांना काही प्रमाणात यशही येते. परंतु आपण जबाबदार नागरिक म्हणून पोलीस प्रशासनावरच सुरक्षेसाठी सर्वस्वी अवलंबून न राहता स्वत:च सतर्क राहण्याची गरज आहे. २०११ च्या लोकसंख्येप्रमाणे ११४८ नागरिकांमागे एक पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी आहे. हा आकडा अतिशय किरकोळ आहे. त्यामुळेच सुरक्षेसाठी बीड पोलिसांना कसरत करावी लागत असल्याचे समोर आले आहे.

२०११ जनगणनेनुसार जिल्ह्यातील लोकसंख्या २५ लाख ८४ हजार एवढी आहे. यामध्ये १३ लाख ४९ हजार पुरुष, तर १२ लाख ३५ हजार महिला आहेत. यांच्या सुरक्षेची जबाबदारी बीड जिल्हा पोलीस दलावर आहे. २५ लाख नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस दलाकडे २२५० अधिकारी व कर्मचारी आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा अतिशय तोकडा आहे. त्यामुळेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच गुन्हेगारी टाळण्यासाठी जिल्हा पोलीस दलाला कसरत करावी लागत आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात लूटमार, चोे-या, दरोडे, खून, छेडछाड यासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून अनेक वेळा वेळ लागतो. पोलीस आरोपींना अटक करीत नाहीत, त्यांना पाठिशी घालतात, चोºयांचे तपास लागत नाहीत याला पोलीसच जबाबदार आहेत असे अनेक आरोप नागरिकांमधून पोलिसांवर होताना ऐकावयास मिळतात. परंतु वाढते गुन्हे व लोकसंख्येच्या तुलनेत तपास करताना पोलिसांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगण्यात आले.

दामिनी पथकाकडे दुसरीच कामेमहिला व मुलींवर होणाºया अत्याचार, अन्यायाच्या घटना टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यात १२ दामिनी पथकांची नियुक्ती केली. परंतु या पथकाकडे दुसरीच कामे लावली जातात. तपास, बंदोबस्त व इतर कारणांमुळे त्यांना महिला व मुलींशी संवाद साधून त्यांच्यात विश्वास निर्माण करताना अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी सध्या कारवायांच्या आकडेवारीवरुन ही पथके यशस्वी ठरल्याचे दिसते.

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न बनला गंभीरपोलिसांकडे ३६७५ महिलांमागे केवळ एक महिला पोलीस कर्मचारी आहे. हा आकडा सुरक्षिततेच्या दृष्टीने खूपच कमी आहे. त्यामुळेच महिला, मुलींची छेड काढणे, त्यांच्यावर अत्याचार होणे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. परंतु हे टाळण्यासाठी आता महिलांनीही पुढाकार घेत पोलिसांना मदत करण्याची गरज आहे. पोलिसांनीही त्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.गुन्हे अनेक, तपास अधिकारी एकचजिल्ह्यात रोज छोट्यामोठ्या अशा किमान ४० ते ५० गुन्ह्यांची नोंद पोलीस डायरीला असते. याचा तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असते. गुन्ह्यांची व पोलीस दलाची संख्या डोळ्यासमोर ठेवली असता एका अधिकारी व कर्मचाºयाकडे १० ते १५ गुन्हे तपासावर असतात. त्यामुळे त्यांना तपास करताना वेळ मिळत नाही. शिवाय, कार्यालयीन कामकाजाशिवाय बंदोबस्त व इतर कामांचाही ताण असतो, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. एका पोलिसाकडे तपासासाठी एकच गुन्हा असावा त्यामुळे त्यात सत्यता व दर्जा राहील असे खुद्द विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी औरंगाबाद येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात वक्तव्य केले होते.पोलीस जनतेच्या सेवेसाठी सतत प्रयत्नशीलकायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बीड जिल्हा पोलीस दल सतत प्रयत्न करते. त्यात आम्हाला यशही येते. नुकतीच पोलीस भरती झाली असून, नव्याने काही कर्मचारी रुजू होतील. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करतो. शिवाय, त्यांच्याशी संवादही साधतो. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे. पोलीस जनतेच्या सेवेसाठी सतत प्रयत्नशील राहतील.- वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, बीड

टॅग्स :Beed policeबीड पोलीसMarathwadaमराठवाडाPoliceपोलिस