शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जनावरांचे वैरण नेत्यांनी खावू नये असे छावणीचे नियोजन करणार : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 17:42 IST

छावणीचा उपयोग पशुधनाला व्हावा. पुर्वीप्रमाणे वैरण नेत्यांनी खावू नये या दृष्टीने नियोजन करु

बीड : दुष्काळजन्य स्थितीमध्ये जनावरं जगली पाहिजे त्यामुळे मागणीप्रमाणे चारा छावणी व्यवस्थेत बदल केला जाईल.  परंतु छावणीचा उपयोग पशुधनाला व्हावा. पुर्वीप्रमाणे वैरण नेत्यांनी खावू नये या दृष्टीने नियोजन करु, योग्य ठिंकाणी पाहिजे त्या प्रमाणात छावणी सुरु करण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

बीड येथे नगर पालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री पंकजा मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. सुरेश धस, आ. विक्रम काळे, आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मराठवाड्याचा भाग दुष्काळाने होरपळला आहे. एक वर्ष सोडले तर सातत्याने समाना करावा लागतोय. दुष्काळमुक्तीसाठी जलयुक्त शिवार योजना उपयुक्त ठरली. आतापर्यंत दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक मर्च- एप्रिलमध्ये यायचे, दुष्काळाचे अनुदान मे- जूनमध्ये मिळायचे. यंदा दुष्काळाची तीव्रता पाहून आम्ही ३१ आॅक्टोबरला दुष्काळ जाहीर केला. ६०० कोटींचे अुनदान दिले. त्यापैकी १५६ कोटी वर्ग केले. ही रक्कम प्रशासनाच्या खात्यात अथवा बॅँकेत ठेवू नका, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा असे संबंधित यंत्रणेला निर्देश दिल्याचे सांगून येत्या १५ मार्चपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. 

बेघरांना घर देण्यास सरकार कटीबद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा संकल्प केला आहे. राज्य सरकारनेही  आतापर्यंत ५ लाख घरे पूर्ण केली, ५ लाख घरे करत आहोत. हे काम कधीच झाले नाही. सरकार बेघरांना घरे देण्यासाठी कटीबध्द असून बीडमध्ये जेवढ्या घरांची मागणी असेल ती मंजूर करु अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. अतिक्रमणे नियमित करत असून ३ लाख अतिक्रमणे नियमित केल्याचे सांगून १० लाख अतिक्रमणे नियमित करण्यात येतील असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

पहा व्हिडिओ :

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीdroughtदुष्काळState Governmentराज्य सरकार