शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

जनावरांचे वैरण नेत्यांनी खावू नये असे छावणीचे नियोजन करणार : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 17:42 IST

छावणीचा उपयोग पशुधनाला व्हावा. पुर्वीप्रमाणे वैरण नेत्यांनी खावू नये या दृष्टीने नियोजन करु

बीड : दुष्काळजन्य स्थितीमध्ये जनावरं जगली पाहिजे त्यामुळे मागणीप्रमाणे चारा छावणी व्यवस्थेत बदल केला जाईल.  परंतु छावणीचा उपयोग पशुधनाला व्हावा. पुर्वीप्रमाणे वैरण नेत्यांनी खावू नये या दृष्टीने नियोजन करु, योग्य ठिंकाणी पाहिजे त्या प्रमाणात छावणी सुरु करण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

बीड येथे नगर पालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री पंकजा मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. सुरेश धस, आ. विक्रम काळे, आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मराठवाड्याचा भाग दुष्काळाने होरपळला आहे. एक वर्ष सोडले तर सातत्याने समाना करावा लागतोय. दुष्काळमुक्तीसाठी जलयुक्त शिवार योजना उपयुक्त ठरली. आतापर्यंत दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक मर्च- एप्रिलमध्ये यायचे, दुष्काळाचे अनुदान मे- जूनमध्ये मिळायचे. यंदा दुष्काळाची तीव्रता पाहून आम्ही ३१ आॅक्टोबरला दुष्काळ जाहीर केला. ६०० कोटींचे अुनदान दिले. त्यापैकी १५६ कोटी वर्ग केले. ही रक्कम प्रशासनाच्या खात्यात अथवा बॅँकेत ठेवू नका, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा असे संबंधित यंत्रणेला निर्देश दिल्याचे सांगून येत्या १५ मार्चपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. 

बेघरांना घर देण्यास सरकार कटीबद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा संकल्प केला आहे. राज्य सरकारनेही  आतापर्यंत ५ लाख घरे पूर्ण केली, ५ लाख घरे करत आहोत. हे काम कधीच झाले नाही. सरकार बेघरांना घरे देण्यासाठी कटीबध्द असून बीडमध्ये जेवढ्या घरांची मागणी असेल ती मंजूर करु अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. अतिक्रमणे नियमित करत असून ३ लाख अतिक्रमणे नियमित केल्याचे सांगून १० लाख अतिक्रमणे नियमित करण्यात येतील असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

पहा व्हिडिओ :

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीdroughtदुष्काळState Governmentराज्य सरकार