शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

जनतेच्या पदरी निराशाच-धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:36 IST

देशातील जनतेला मोठ्या आश्वासनाच्या मोहपाशात अडकवून गल्लीपासून ते थेट दिल्लीपर्यंत सत्ता मिळवली; परंतु गेल्या चार वर्षांत सर्वसामान्य जनतेच्या हाती पडले काय, असा खडा सवाल उपस्थित करून आता परिवर्तनाची लाट येणार असल्याचा विश्वास विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. शिरूर येथे विजयी संकल्प मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते ,

ठळक मुद्देएकहाती सत्ता असताना हाती काय लागले?

लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर कासार : देशातील जनतेला मोठ्या आश्वासनाच्या मोहपाशात अडकवून गल्लीपासून ते थेट दिल्लीपर्यंत सत्ता मिळवली; परंतु गेल्या चार वर्षांत सर्वसामान्य जनतेच्या हाती पडले काय, असा खडा सवाल उपस्थित करून आता परिवर्तनाची लाट येणार असल्याचा विश्वास विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. शिरूर येथे विजयी संकल्प मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते ,राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे बीड येथे विजयी संकल्प मेळाव्यासाठी येणार असून, बीडमध्ये आतापर्यतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी आपण सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करीत विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या मनमानी वाटचालीवर मुंडे यांनी टीका केली.अच्छे दिनची प्रतीक्षा करण्यात चार वर्ष निघून गेली. हाती काय लागले, असा सवाल करताच काही नाही, काही नाही, असेच उत्तर देण्यात आले. आता सत्तांतरासाठी तयार व्हा, असे आवाहन करताच टाळ्यांचा कडकडाट झाला ,या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रोहिदास पाटील होते. अमरसिंह पंडित, प्रकाश सोळंके, बाळासाहेब आजबे, रवींद्र क्षीरसागर, शिवाजी राऊत, महेंद्र गर्जे, सतीश शिंदे, चंपावती पानसंबळ, कृष्णा पानसंबळ, गोकुळ सव्वासे आदी होतेप्रास्ताविकात महेबुब शेख यांनी शहराची सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या अडवणुकीचा पाढा वाचून दाखवला. त्यानंतर तालुका अध्यक्ष विश्वास नागरगोजे, सतीश बडे, रोहिदास पाटील, चंपावती पानसंबळ, बाळासाहेब आजबे सतीश शिंदे यांनी मनोगत व्यक्त करत स्थानीक आमदाराच्या कारभाराचा पाढा वाचला मात्र त्यांचे नांव सुध्दा घेण्याचे टाळले.रविंद्र क्षीरसागरा यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत बैठक जिंकली. आता बीड येथे होत असलेल्या विजयी संकल्प मेळाव्यास शरद पवार यांचे विचार ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून आतापर्यतच्या गर्दीचे विक्रम मोडीत काढा, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.चूक झाल्यास ही शेवटचीच निवडणूकआता परिवर्तनाची वेळ आली आहे. सरकारने केलेली फसगत कोणी विसरणार नाहीत. मोदीजींनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती न करता शेतकºयांसह सर्वसामान्य जनतेची पिळवणूकच केली. नोटबंदी, कर्जमाफी, बोंडअळीचे अनुदान, जनधन खाते या सर्व बाबी सांगून पुन्हा ही चूक केल्यास ही निवडणूक कदाचित शेवटची ठरेल अशी शक्यता बोलून दाखवली.तुमच्या विहिरीतील पाण्याचासुध्दा सरकारला भरणा करावा लागेल. शेतात कोणते पीक घ्यायचे हे देखील विचारावे लागेल अशा स्वरूपाची वाटचाल सुरू आहे ती आम्ही कदापिही होऊ देणार नाही. पक्ष बदलणाºया स्वार्थी नेत्यांना सरडा म्हणणे देखील सरड्याचा अपमान ठरेल असे सुनावले.तुमच्या स्वार्थासाठी शहराला वेठीस धरू नका. जनता तुम्हाला कदापिही माफ करणार नाही. प्रतिवर्षी दोन कोटीचा रोजगार, बोंडआळीचे हेक्टरी ३४ हजार रुपयांचे अनुदान,कर्ज माफी या सर्व गोष्टी फसव्याच निघाल्याचे मुंडे यांनी यावेळी आपल्या भाषणातून सांगितल.े

टॅग्स :BeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडे