शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्ण बेशुद्ध अन् कर्मचाऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 4:47 PM

रुग्ण बेशुद्ध होण्याचे कारण मात्र अद्यापही अस्पष्ट असून चुकीचा आणि जास्त प्रमाणात गोळ्या खाल्ल्याने असे होऊ शकते, अशी चर्चा होत आहे.

बीड : व्यसन सोडविण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात राहिलेली ५० वर्षीय व्यक्ती अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर केंद्रातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. जिल्हा रुग्णालयात या रुग्णाला दाखल केल्यानंतर येथील तज्ज्ञांनी तपासले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला बीडमधून औरंगाबादला रेफर करण्यात आले. हा सर्व प्रकार मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता उघड झाला. यामुळे व्यसनमुक्ती केंद्रातील बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

जामखेड येथील एक ५० वर्षीय इसम १८ ऑक्टोबर रोजी नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाला. त्याच्यासोबत दाखल करताना एक नातेवाईकही होते. दारू, तंबाखू, गांजाचे व्यसन असल्याचे त्यांच्या प्रवेश पत्रावर लिहिलेले आहे. तसेच येरवडा येथे उपचार घेऊन आल्याचाही उल्लेख आहे; परंतु मंगळवारी सकाळी हा रुग्ण अचानक बेशुद्ध पडला. त्याला केंद्रातीलच दोन कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात दाखल केले. फिजिशियनने तपासून मानसोपचार तज्ज्ञांना बोलावले. डॉ. मोहंमद मुजाहेद यांनी तपासल्यानंतर रुग्ण गंभीर असल्याचे दिसले. त्यामुळे त्याला तत्काळ औरंगाबादला रेफर केले. रेफर करेपर्यंतही हा रुग्ण शुद्धीवर आला नव्हता. त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु सोबत कोणी नसल्याने तो झाला नाही, तर केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी बोलणे टाळले. रुग्ण बेशुद्ध होण्याचे कारण मात्र अद्यापही अस्पष्ट असून चुकीचा आणि जास्त प्रमाणात गोळ्या खाल्ल्याने असे होऊ शकते, अशी चर्चा होत आहे.

मानसोपचार तज्ज्ञाची उपस्थिती बंधनकारकव्यसनमुक्ती केंद्राला आरोग्य संचालकांची परवानगी लागते. मेंटल हेल्थ ॲक्ट २०१७ नुसार शासन मान्यता आवश्यक असते. या ठिकाणी मानसोपचार तज्ज्ञ कायमस्वरूपी हजर असणे अवश्यक आहे. नार्को टेस्ट विभागाकडून याची तपासणी होणे अपेक्षित असते; परंतु बीडमध्ये असे काहीच नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच चक्कर येणे, बेशुद्ध पडण्यासारख्या घटना घडतात. याची तपासणी होणे आवश्यक आहे.

काय म्हणतात, व्यसनमुक्ती केंद्रचालकयाबाबत नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या चिठ्ठीवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. यावर एकाने मी काहीच बोलू शकत नाही, आपण डॉ. राजकुमार गवळे यांना बोला, असा सल्ला दिला. यावर डॉ. गवळे यांना बोलल्यानंतर त्यांनी शेरकर यांना बोला, असे सांगितले. त्यानंतर शेरकर यांना संपर्क केला. यावर ते म्हणाले, आठवड्यातून एक वेळा मानसोपचार तज्ज्ञ येतात. त्यांनी दिलेल्या प्रिस्क्रीप्शननुसार औषधी दिली जातात. मीसुद्धा बाहेर आहे. काय घडले हे मला पहावे लागेल, असे सांगितले.

नेमका रूग्ण कोण? सर्व गोंधळचनवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात संबंधित रूग्ण दाखल झाला, तेव्हा त्याचे नाव वेगळेच आहे. त्याला औषधी लिहून दिलेल्या चिठ्ठीवर आणि प्रवेशासह हमीपत्रावर वेगळेच नाव असल्याचे समोर आले आहे. नातेवाईक कोण आणि रूग्ण कोण? याचाच गोंधळ उडाल्याचे या कागदपत्रांवरून दिसले. यावरून येथील कारभार ढिसाळ आणि दुर्लक्षित असल्याचे दिसून येते.

अधिक उपचारासाठी औरंगाबादला पाठवले अपघात विभागातून कॉल येताच मी गेलाे. रूग्ण बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला उपचार करणे आपल्याकडे शक्य नव्हते. प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने त्याला औरंगाबादला रेफर केले.- डॉ.मोहमंद मुजाहेद, मानसोपचार तज्ज्ञ, बीड

टॅग्स :Beedबीड