शहरं
Join us  
Trending Stories
1
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
2
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
3
Dhurandhar FA9LA song Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
4
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
5
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
6
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
7
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
8
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
9
विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे...
10
Nashik Crime: नणंदेला संशय आला, दरवाजा उघडताच वहिनीला बघून चिरकली! नाशिकमध्ये शीतलला पतीनेच संपवले
11
लखनौ हत्याकांडात नवा ट्विस्ट: जादूटोणा आणि चौथा आरोपी! इंजिनियरच्या वडिलांचा धक्कादायक दावा
12
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
13
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
14
ITR Refund Delay : ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
15
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
16
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Sensex ३०० अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, मेटल शेअर्स सुस्साट
17
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
18
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
19
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
20
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

"संतोष देशमुख प्रकरणात माझी मान खाली गेली"; पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत, मांडली सविस्तर भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 22:07 IST

मस्साजोगचे सरपंच आणि भाजपचे पदाधिकारी असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यात देशात चर्चेचा विषय ठरला. या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली. 

Pankaja Munde News: 'माझ्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या. मी लोकसभेला हरले तरीही माझी मान खाली गेली नाही. पण, संतोष देशमुख हत्या प्रकरणात माझी मान खाली गेली आहे', अशी खंत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. संतोष देशमुख हत्या, बीड जिल्ह्यातील उसवलेली सामाजिक वीण आणि कार्यकर्त्यांची गुन्हेगारी या मुद्द्यावर पंकजा मुंडेंनी सविस्तर भूमिका मांडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पंकजा मुंडे यांनी एका मुलाखतीत बीड जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणाबद्दल बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी कोण आहेत, हे न्यायालयातील सुनावणीतून समोर येईल. ही एका व्यक्तीची नाही, तर नैतिकतेची हत्या आहे. एका माणसाचा जीव जातो. त्याबाबत वातावरण निर्मिती कऱण्ययात येते. एका समाजाला, जातीला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. यामुळे सगळा समाज सुन्न झाला आहे."

"सत्तेवर आहे, जे करायचे ते करा; हे सांगणे चुकीचे" 

"संतोष देशमुख माझा बुथ प्रमुख होता, कार्यकर्ता होता; त्यामुळे मलाही दुख वाटतंय. सत्तेमुळे अहंकार निर्माण होतो. सत्ता असताना कार्यकर्त्यांना सांभाळणे अवघड असते. मी सत्तेवर आहे, जे करायचे ते करा, असे राजकीय नेत्यांकडून सांगितले जाते; हे चुकीचे आहे", असे म्हणत पंकजा मुंडेंना राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर टीका केली. 

"बीडचे नाव गोपीनाथ मुंडे यांच्याशी जोडले होते, आता बीडचे नाव वाईट अर्थाने घेतले जात आहे. वंजारी समाजाच्या मुलांना वसतिगृहे, शाळांमध्ये वाईट वागणूक दिली जात आहे. बीडमध्ये सामाजिक ऐक्याला तडा गेला आहे. लोकांच्या आक्रमक भाषणांमुळे समाजांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. वंजारी समाजाला लक्ष्य केलं जात असून हे चुकीचे आहे", अशी नाराजी पंकजा मुंडेंनी व्यक्त केली. 

लोकसभेला मला त्याचा फटका बसला

"लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये माझा सहा हजार मतांनी पराभव झाला. मी निवडणूक लढवण्यास उत्सुक नव्हते. मराठा आरक्षण प्रश्न पेटला होता. मराठा विरुद्ध ओबीसी, असा संघर्ष तीव्र असतानाच्या काळात मी लोकसभा लढवली. त्याचा मला फटका बसला. परिस्थिती माझ्या विरोधात होती. त्यामुळे मी पराभव स्वीकारला. माझ्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या. मी लोकसभेला हरले तरीही माझी मान खाली गेली नाही. पण, संतोष देशमुख प्रकरणात माझी मान खाली गेली आहे", अशी सल पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराड