शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

पैठण-पंढरपूर पालखी महामार्गाचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:25 IST

शिरूर कासार : पैठण-पंढरपूर हा पालखी मार्ग म्हणजे वारकऱ्यांसह सर्वांच्या अस्मितेचा मार्ग. मात्र मध्यंतरी कामात समन्वयाअभावी खोडा पडला आणि ...

शिरूर कासार :

पैठण-पंढरपूर हा पालखी मार्ग म्हणजे वारकऱ्यांसह सर्वांच्या अस्मितेचा मार्ग. मात्र मध्यंतरी कामात समन्वयाअभावी खोडा पडला आणि कामच बंद झाले. हे काम सुरू व्हावे यासाठी आ.सुरेश धस यांनी बुधवारी अधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये सकारात्मक चर्चा घडवून आणल्यानंतर पालखी मार्गाचा तिढा सुटला. आता पूर्ववत काम सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पैठण-पंढरपूर हा रस्ता जसा वारकऱ्यांसाठी अस्मितेचा तसाच तो औरंगाबादला जाण्यासाठीसुद्धा जवळचा मार्ग असून सिमेंट रस्त्याचे काम सुरू झाले. काही ठिकाणी कामाने गती घेतली होती. काही ठिकाणी रस्ता काम झाले होते; मात्र अशातच शेतकऱ्यांच्या मावेजाचा प्रश्न उपस्थित झाला आणि कामात खोडा पडला. हा प्रश्न सुटल्याशिवाय रस्त्याचे काम मार्गी लागत नाही आणि सर्वांनाच त्रासाला कारणीभूत ठरेल म्हणून आ.सुरेश धस यांनी या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. बुधवारी सर्व विभागांचे अधिकारी, उपजिल्हाधिकाऱ्यांना सोबत घेऊन थेट त्या त्या गावांत जाऊन अडचणी व प्रश्न समजून घेत त्यावर चर्चा करून पालखी मार्गातील अडसर दूर केला. यावेळी उपजिल्हाधिकारी,सर्व विभागांचे अधिकारी,पी. व्ही. आर. कंपनीचे अभियंता,सार्वजनिक बांधकाम अभियंता, भूसंपादन अधिकारी, ॲड. भाग्यश्री ढाकणे, कृष्णा पानसंबळ, माजी सभापती निवृत्ती बेदरे, नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसरडा,कल्याण तांबे, सुरेश उगलमुगले, ज्या त्या गावचे सरपंच , सदस्य,ग्रामस्थ,शेतकरी उपस्थित होते.

तीन-चार वर्षांपासून सुरू असलेले हे काम शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी आपली जमीन क्षेत्र व घर जात असून त्याचे मोजमाप करून योग्य तो मावेजा देण्याच्या मागणीसाठी काम अडवले होते. अर्धवट पडलेले काम अपघाताला कारणीभूत ठरून जीव गमावण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती तरी मार्ग निघत नव्हता.

आ. सुरेश धस यांनी तालुक्यातील घोगसपारगाव ,माळेगाव (च) ,उकिर्डा (च) ,दहिवंडी ,शिरूर ,राक्षसभुवन ,खोलेवाडी येथील शेतकरी ग्रामस्थांबरोबर चर्चा करून शंका निरसन करून अडलेला मार्ग मोकळा झाला आहे.आता लवकरच पुन्हा मोजमाप प्रक्रिया पूर्ण करून मावेजा मिळवून देण्यात येईल असा विश्वास प्रशासन व आ.धस यांनी दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

===Photopath===

030621\vijaykumar gadekar_img-20210603-wa0006_14.jpg