शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

पैठण-पंढरपूर पालखी महामार्गाचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:25 IST

शिरूर कासार : पैठण-पंढरपूर हा पालखी मार्ग म्हणजे वारकऱ्यांसह सर्वांच्या अस्मितेचा मार्ग. मात्र मध्यंतरी कामात समन्वयाअभावी खोडा पडला आणि ...

शिरूर कासार :

पैठण-पंढरपूर हा पालखी मार्ग म्हणजे वारकऱ्यांसह सर्वांच्या अस्मितेचा मार्ग. मात्र मध्यंतरी कामात समन्वयाअभावी खोडा पडला आणि कामच बंद झाले. हे काम सुरू व्हावे यासाठी आ.सुरेश धस यांनी बुधवारी अधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये सकारात्मक चर्चा घडवून आणल्यानंतर पालखी मार्गाचा तिढा सुटला. आता पूर्ववत काम सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पैठण-पंढरपूर हा रस्ता जसा वारकऱ्यांसाठी अस्मितेचा तसाच तो औरंगाबादला जाण्यासाठीसुद्धा जवळचा मार्ग असून सिमेंट रस्त्याचे काम सुरू झाले. काही ठिकाणी कामाने गती घेतली होती. काही ठिकाणी रस्ता काम झाले होते; मात्र अशातच शेतकऱ्यांच्या मावेजाचा प्रश्न उपस्थित झाला आणि कामात खोडा पडला. हा प्रश्न सुटल्याशिवाय रस्त्याचे काम मार्गी लागत नाही आणि सर्वांनाच त्रासाला कारणीभूत ठरेल म्हणून आ.सुरेश धस यांनी या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. बुधवारी सर्व विभागांचे अधिकारी, उपजिल्हाधिकाऱ्यांना सोबत घेऊन थेट त्या त्या गावांत जाऊन अडचणी व प्रश्न समजून घेत त्यावर चर्चा करून पालखी मार्गातील अडसर दूर केला. यावेळी उपजिल्हाधिकारी,सर्व विभागांचे अधिकारी,पी. व्ही. आर. कंपनीचे अभियंता,सार्वजनिक बांधकाम अभियंता, भूसंपादन अधिकारी, ॲड. भाग्यश्री ढाकणे, कृष्णा पानसंबळ, माजी सभापती निवृत्ती बेदरे, नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसरडा,कल्याण तांबे, सुरेश उगलमुगले, ज्या त्या गावचे सरपंच , सदस्य,ग्रामस्थ,शेतकरी उपस्थित होते.

तीन-चार वर्षांपासून सुरू असलेले हे काम शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी आपली जमीन क्षेत्र व घर जात असून त्याचे मोजमाप करून योग्य तो मावेजा देण्याच्या मागणीसाठी काम अडवले होते. अर्धवट पडलेले काम अपघाताला कारणीभूत ठरून जीव गमावण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती तरी मार्ग निघत नव्हता.

आ. सुरेश धस यांनी तालुक्यातील घोगसपारगाव ,माळेगाव (च) ,उकिर्डा (च) ,दहिवंडी ,शिरूर ,राक्षसभुवन ,खोलेवाडी येथील शेतकरी ग्रामस्थांबरोबर चर्चा करून शंका निरसन करून अडलेला मार्ग मोकळा झाला आहे.आता लवकरच पुन्हा मोजमाप प्रक्रिया पूर्ण करून मावेजा मिळवून देण्यात येईल असा विश्वास प्रशासन व आ.धस यांनी दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

===Photopath===

030621\vijaykumar gadekar_img-20210603-wa0006_14.jpg