शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

बीड जिल्ह्यात केवळ ३८ टक्केच कर वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:20 IST

कर भरणा करण्यास नागरिकांची उदासिनता असून कर वसुली करण्यास नगर पालिका व नगर पंचायतींचा आखडता हात असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यात केवळ ३८ टक्के कर वसुली झाली आहे. पालिकांमध्ये अंबाजोगाई आघाडीवर असून माजलगावचा सर्वात नीचांक आहे. तर नगर पंचायतीत केज पहिल्या क्रमांकावर असून पाटोद्याची केवळ ४ टक्केच वसुली आहे. ही आकडेवारी पाहता प्रशासनासाठी हा चिंतेचा विषय बनला असून कडक पाऊले उचलण्यास प्रशासन धजावत नसल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देपालिकांत अंबाजोगाई आघाडीवर तर माजलगावचा नीचांक

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कर भरणा करण्यास नागरिकांची उदासिनता असून कर वसुली करण्यास नगर पालिका व नगर पंचायतींचा आखडता हात असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ३८ टक्के कर वसुली झाली आहे. पालिकांमध्ये अंबाजोगाई आघाडीवर असून माजलगावचा सर्वात नीचांक आहे. तर नगर पंचायतीत केज पहिल्या क्रमांकावर असून पाटोद्याची केवळ ४ टक्केच वसुली आहे. ही आकडेवारी पाहता प्रशासनासाठी हा चिंतेचा विषय बनला असून कडक पाऊले उचलण्यास प्रशासन धजावत नसल्याचे बोलले जात आहे.

आर्थिक वर्ष संपत आल्याने पालिक व नगर पंचायतींच्या वतीने कर वसूलीला अधिक गती देण्यात आली आहे. मागी महिनाभरापासून कर वसुलीचा टक्का वाढला असला तरी जिल्ह्याचा एकुण वसुलीचा टक्का पाहता खुपच कमी आहे. पालिकांनी कर वसुलीसाठी विशेष पथके नियुक्त केली. शिवाय कारवायाही करण्यास सुरूवात केली. वास्वविक पाहता या कारवाया केवळ सर्वसामान्यांवर करण्यात आल्या. धनदांडग्यांना वगळण्यात आल्याने वसुलीचा टक्का वाढत नसल्याचे सूत्रांकडून समजते. कर बुडविणाऱ्यांवर धनदांडग्यांवरही सर्वसामान्यांप्रमाणेच कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सर्वांवर समान कारवाई आणि कारवाईचा धाक दाखवून वसुली केल्यास वसुलीची टक्केवारी वाढल्याशिवाय राहणार नाही, असे सांगण्यात येते.

मालमत्ता, पाणीपट्टी, रोहयो, शिक्षण कर आकारले जातात. पाणीपट्टी आणि घरपट्टीत समाधानकारक वसुली झालेली आहे. परंतु मालमत्ता कराची टक्केवारी खूपच कमी आहे. मालमत्ता कर भरण्यास नागरिकांची उदासिनता असल्याचे दिसून येत आहे. तसेच शासकीय कार्यालयांकडेही मोठ्या प्रमाणात थकबाकी असून वसुलीसाठी अद्याप तरी पालिकांनी पाऊले उचलले नसल्याचे दिसून येते.सर्व वसुली करुन पालिकांचा कारभार सुधारावा, अशी मागणी होत आहे.अशी आहे वसुली : वारंवार बैठका घेऊनही यंत्रणेचे दुर्लक्षकर वसुली करण्यात अंबाजोगाई नगर पालिका आघाडीवर आहे. अंबाजोगाईत ६९.४९ एवढी वसुली झाली असून बीड ४०, परळी ३०, गेवराई ४६, धारूर ४४, माजलगावची केवळ २४ टक्के वसुली आहे. न.पं.मध्ये केज पंचायतीने ५४ टक्के वसुली केली आहे तर आष्टी २०, शिरूरकासार १३, वडवणी ४१ टक्के एवढी वसुली आहे. पाटोद्यात मात्र केवळ चार टक्के वसुली झाल्याची नोंद जिल्हा प्रशासन विभागाकडे आहे. जिल्हा प्रशासन अधिकारी मिलींद सावंत यांनी सर्व नगर पालिका व नगर पंचायतींच्या मुख्याधिकाºयांच्या कर वसुलीसंदर्भात वारंवार बैठका घेतल्या. त्यांना सूचना केल्या. कारवाईचे आदेशही दिले. परंतु मुख्याधिकाºयांनी पहिले पाढे पंचावन्न असेच कार्य केले. त्यामुळेच वसुलीचा टक्का ३८ टक्यांवर थांबला आहे. सावंत यांच्या सूचनांकडे मुख्याधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

टॅग्स :BeedबीडTaxकरMarathwadaमराठवाडाAmbajogaiअंबाजोगाई