शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

बीड जिल्ह्यात केवळ ३८ टक्केच कर वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:20 IST

कर भरणा करण्यास नागरिकांची उदासिनता असून कर वसुली करण्यास नगर पालिका व नगर पंचायतींचा आखडता हात असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यात केवळ ३८ टक्के कर वसुली झाली आहे. पालिकांमध्ये अंबाजोगाई आघाडीवर असून माजलगावचा सर्वात नीचांक आहे. तर नगर पंचायतीत केज पहिल्या क्रमांकावर असून पाटोद्याची केवळ ४ टक्केच वसुली आहे. ही आकडेवारी पाहता प्रशासनासाठी हा चिंतेचा विषय बनला असून कडक पाऊले उचलण्यास प्रशासन धजावत नसल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देपालिकांत अंबाजोगाई आघाडीवर तर माजलगावचा नीचांक

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कर भरणा करण्यास नागरिकांची उदासिनता असून कर वसुली करण्यास नगर पालिका व नगर पंचायतींचा आखडता हात असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ३८ टक्के कर वसुली झाली आहे. पालिकांमध्ये अंबाजोगाई आघाडीवर असून माजलगावचा सर्वात नीचांक आहे. तर नगर पंचायतीत केज पहिल्या क्रमांकावर असून पाटोद्याची केवळ ४ टक्केच वसुली आहे. ही आकडेवारी पाहता प्रशासनासाठी हा चिंतेचा विषय बनला असून कडक पाऊले उचलण्यास प्रशासन धजावत नसल्याचे बोलले जात आहे.

आर्थिक वर्ष संपत आल्याने पालिक व नगर पंचायतींच्या वतीने कर वसूलीला अधिक गती देण्यात आली आहे. मागी महिनाभरापासून कर वसुलीचा टक्का वाढला असला तरी जिल्ह्याचा एकुण वसुलीचा टक्का पाहता खुपच कमी आहे. पालिकांनी कर वसुलीसाठी विशेष पथके नियुक्त केली. शिवाय कारवायाही करण्यास सुरूवात केली. वास्वविक पाहता या कारवाया केवळ सर्वसामान्यांवर करण्यात आल्या. धनदांडग्यांना वगळण्यात आल्याने वसुलीचा टक्का वाढत नसल्याचे सूत्रांकडून समजते. कर बुडविणाऱ्यांवर धनदांडग्यांवरही सर्वसामान्यांप्रमाणेच कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सर्वांवर समान कारवाई आणि कारवाईचा धाक दाखवून वसुली केल्यास वसुलीची टक्केवारी वाढल्याशिवाय राहणार नाही, असे सांगण्यात येते.

मालमत्ता, पाणीपट्टी, रोहयो, शिक्षण कर आकारले जातात. पाणीपट्टी आणि घरपट्टीत समाधानकारक वसुली झालेली आहे. परंतु मालमत्ता कराची टक्केवारी खूपच कमी आहे. मालमत्ता कर भरण्यास नागरिकांची उदासिनता असल्याचे दिसून येत आहे. तसेच शासकीय कार्यालयांकडेही मोठ्या प्रमाणात थकबाकी असून वसुलीसाठी अद्याप तरी पालिकांनी पाऊले उचलले नसल्याचे दिसून येते.सर्व वसुली करुन पालिकांचा कारभार सुधारावा, अशी मागणी होत आहे.अशी आहे वसुली : वारंवार बैठका घेऊनही यंत्रणेचे दुर्लक्षकर वसुली करण्यात अंबाजोगाई नगर पालिका आघाडीवर आहे. अंबाजोगाईत ६९.४९ एवढी वसुली झाली असून बीड ४०, परळी ३०, गेवराई ४६, धारूर ४४, माजलगावची केवळ २४ टक्के वसुली आहे. न.पं.मध्ये केज पंचायतीने ५४ टक्के वसुली केली आहे तर आष्टी २०, शिरूरकासार १३, वडवणी ४१ टक्के एवढी वसुली आहे. पाटोद्यात मात्र केवळ चार टक्के वसुली झाल्याची नोंद जिल्हा प्रशासन विभागाकडे आहे. जिल्हा प्रशासन अधिकारी मिलींद सावंत यांनी सर्व नगर पालिका व नगर पंचायतींच्या मुख्याधिकाºयांच्या कर वसुलीसंदर्भात वारंवार बैठका घेतल्या. त्यांना सूचना केल्या. कारवाईचे आदेशही दिले. परंतु मुख्याधिकाºयांनी पहिले पाढे पंचावन्न असेच कार्य केले. त्यामुळेच वसुलीचा टक्का ३८ टक्यांवर थांबला आहे. सावंत यांच्या सूचनांकडे मुख्याधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

टॅग्स :BeedबीडTaxकरMarathwadaमराठवाडाAmbajogaiअंबाजोगाई