शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

बीडमध्ये केवळ १७.३० टक्के इतकेच पीककर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:26 IST

मागील वर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून सुरु असलेले कर्जमाफीचे गुºहाळ अजून संपलेले नाही. या प्रक्रियेमुळे मागील खरीप हंगामात पीक कर्जाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले. दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ १७.३० टक्के इतकेच पीक कर्जाचे वाटप झाले. आता आगामी हंगामाच्या दृष्टीने पीक कर्जाचे नियोजन करण्याच्या सूचना शासन स्तरावर देण्यात आल्या आहेत. परंतू कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय पीक कर्जाची मागणी येण्याची सुतराम शक्यता दिसत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील वर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून सुरु असलेले कर्जमाफीचे गुºहाळ अजून संपलेले नाही. या प्रक्रियेमुळे मागील खरीप हंगामात पीक कर्जाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले. दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ १७.३० टक्के इतकेच पीक कर्जाचे वाटप झाले. आता आगामी हंगामाच्या दृष्टीने पीक कर्जाचे नियोजन करण्याच्या सूचना शासन स्तरावर देण्यात आल्या आहेत. परंतू कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय पीक कर्जाची मागणी येण्याची सुतराम शक्यता दिसत नाही.

मागील वर्षी बीड जिल्ह्यात राष्टÑीयकृत बॅँका, महाराष्टÑ ग्रामीण बॅँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला खरीप हंगामात १९२७ कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तर रबी हंगामासाठी ३४० कोटी ७२ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. मात्र पीक कर्ज घेण्याची इच्छा असणाऱ्या अनेक शेतकºयांना कर्जमाफीसाठीचे सोपस्कर पार पाडावे लागले. कर्ज माफच होणार आहे. त्यानंतर बघू अशी भूमिका अनेकांनी घेतली. कर्जमाफीच्या कामांबरोबरच बॅँकांना शेतकºयांच्या पीक विमा हप्त्याचा भरणा करावा लागला. ही प्रक्रियाही कीचकट व मंदगतीने होत राहिली.मागील वर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाने हजेरी लावल्याने मुबलक पाणी उपलब्ध झाले. त्याचा शेतीला अराधार झाला. हंगामी पिकांबरोबरच भाजीपाल्याची लागवडही वाढली. यासाठी शेतकºयांना फारशी आर्थिक गरज निर्माण झाली नाही.एकदा कर्जमाफी झाली म्हणजे पुढचे पाहता येईल या विचाराने शेतकºयांनी बॅँकांकडे पीक कर्जाची मागणी केली नाही. त्याचबरोबर बॅँकाही कामाच्या व्यापामुळे शेतकºयांपर्यंत पोहचू शकल्या नाही. त्यामुळे खरीप हंगामात निर्धारित कालावधीत ३३३ कोटी ३८ लाख रुपयांचे पीककर्ज बॅँकांनी वाटप केले. तर रबी हंगामात ११४ कोटी ४३ लाख रुपये पीककर्जाचे वाटप केले आहे. येत्या हंगामात पीककर्जाची मागणी वाढण्याची शक्यता आहे.कर्जमाफी पूर्ण झाली तरच पीककर्ज प्रक्रियामागील आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी हंगामात पीककर्ज वाटप करण्याबाबत नियोजनाच्या सूचना केल्या होत्या. मागील वर्षी विशेषत्वाने कर्जमाफीच्या घोषणेमुळे पीककर्जाची मागणी पुढे येऊ शकली नाही. कर्जमाफीच्या घोषणेची पुर्णत: अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. तांत्रिकदृष्ट्या वंचित राहिलेल्या शेतकºयांना २० मेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे आधी कर्जमाफीची प्रक्रिया शासन व प्रशासन व बॅँकांना पूर्ण करावी लागणार आहे.

निरंक खातेदारांना मिळेल कर्जकर्जमाफी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आगामी हंगामातील पीककर्ज वाटपाची उद्दिष्टयपूर्ती सुलभ होणार आहे. तर कर्जमाफी योजनेत ज्या शेतकºयांचे खाते निरंक झाले त्यांना पीककर्ज घेता येणार आहे.

कर्जमाफी आतापर्यंतचीबीड जिल्ह्यात १४ लाख ९ हजार ९७० शेतकºयांना ७१३ कोटी ३३ लाख रुपयांची कर्जमाफी झाल्याचे व ही रक्कम कर्जखाती जमा झाल्याचे जिल्हा अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण यांनी सांगितले.

तरीही प्रमाण कमीच...!२७ राष्ट्रीयीकृत बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँक व जिल्हा ग्रामीण बँकांना पीककर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये एसबीआयने खरीप हंगामात ७३५९, मराठवाडा ग्रामीण बँकेने ८९१३ व जिल्हा बँकेने ३५ हजार ८१४ शेतकºयांना पीककर्जाचे वाटप केले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा