शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

बीडमध्ये महाश्रमदानातून वृक्ष लागवडीसाठी खोदले एक हजार खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 18:39 IST

शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत बीडच्या वनविभागाने रविवारी पालवण येथील डोंगरावर आयोजित महाश्रमदानात १२ सामाजिक संस्था व ३०० नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्ष लागवडीसाठी एक हजार खड्डे खोदले.

बीड : शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत बीडच्या वनविभागाने रविवारी पालवण येथील डोंगरावर आयोजित महाश्रमदानात १२ सामाजिक संस्था व ३०० नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्ष लागवडीसाठी एक हजार खड्डे खोदले. या जागेवर १ जुलै रोजी वृक्षारोपण केले जाणार असल्याची माहिती विभागीय वनअधिकारी अमोल सातपुते यांना दिली.

वैश्विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल, वाढते प्रदूषण याबाबत गांभिर्याने घेत शासनाने या वर्षी विविध विभाग आणि जनतेच्या सहभागातून ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षी १३ कोटी वृक्षांची लागवडी केली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत बीडच्या वनविभागाने आतापासूनच कंबर कसली असून, जिल्हाभर ३३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत पालवण ते पिंपळवाडी येथील डोंगरावर ४० हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यामुळे रविवारी पालवण येथील डोंगरावर महाश्रमदान करण्यात आले. विभागीय वनअधिकारी अमोल सातपुते यांनी केलेल्या आवाहनानुसार सामाजिक संस्था, नागरिक, विद्यार्थ्यांनी महाश्रमदानात सहभाग नोंदवला.

यावेळी अमोल सातपुते म्हणाले की, गेल्या काही वर्षात वृक्षतोड मोठया प्रमाणात झाल्याने त्याचा विपरीत परिणाम जनसामान्यांवर, वातावरणावर झालेला दिसून येत आहे.  वृक्ष आणि वन याचे महत्व संत तुकाराम महाराजांनी चारशे वषार्पूर्वी त्यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगाच्या माध्यमातून सांगितले आहे. यासाठी शासनाने पुढाकार घेतला असुन प्रत्येकाने एक झाड लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली तर महाराष्ट्रात भेडसावू लागलेले संभाव्य धोके रोखण्यात मानवाला यश मिळेल आणि त्यातूनच चिरंतन शाश्वत विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल असे सांगितले. 

यावेळी इंडियन मेडिकल असोशिएनचे डॉ. खरवडकर, डॉ. प्रदिप शेळके, डॉ. कट्टे, सामाजिक वनीकरणचे काजी, वनपरिक्षेत्र अधिकारी एल.बी.दिवाणे, पाटोदा वनपरिक्षेत्र अधिकारी सयमा पठाण, वनपाल अरविंद पायाळ, वनरक्षक एस. एस. वनवे, शिवाजी कांबळे, लांडगे, ए.पी.बहिरवाळ, रेणुका माऊली सेवाभावी संस्थेचे राजू वंजारे, अभिजीत वैद्य, शालिनी परदेशी, नीता कांबळे, विशाखा परदेशी, अश्विनी तिपाले, आरती पिल्ले, ललिता तांबारे, यश वंजारे, शिवराम घोडके, अनिल शेळके, शेख तय्यब, संतोश थोरात, शेख अमीर पाशा, दीपक तांगडे, बाजीराव ढाकणे, किरण डोळस, रेखा शितोडे,  माया तिरमले, मातृभूमि प्रतिष्ठाणचे संजय तांदळे, महारूद्र मोराळे, हेल्पिंग हँड ग्रुपचे व्यंकटेश माने, जगजीवन घोडके, अॅड. डोईफोडे, प्रेरणा डोईफोडे आदींनी सहभाग घेतला होता.

१ जुलैला लावणार ४० हजार रोपे सकाळी ७ ते अकरा वाजेपर्यंत झालेल्या महाश्रमदानात वृक्ष लागवडीसाठी एक हजार खड्डे खोदले आहेत. या ठिकाणी वनविभागाच्या वतीने पूर्वी ३९ हजार खड्डे खोदण्यात आले आहे. त्यात आज एक हजार खड्डयांची भर पडली आहे. एकूण ४० हजार खड्ड्यांमध्ये १ जुलै रोजी रोपे लावण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

पथनाट्यातून जनजागृतीया कार्यक्रमात प्लास्टिक बंदी व त्यावरील दंड, स्वच्छ भारत अभियान, झाडे लावा, शौचालयाचा वापराबाबत पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. यामध्ये किशोर धुताडमल, रंगा अडागळे, संतोष पैठणे, राजु धुताडमल, नीलेश लोंढे, ओम धुताडमल यांनी गाण्यांतून जनजागृती केली.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीड