शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:29 IST

बीड : मुले पळवून नेणारी टोळी बीडमध्ये आली असल्याची अफवा सोशल मीडियावरून दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रत्यक्षात मात्र असे काहीच नसून ही अफवा असल्याचा खुलासा पोलीस प्रशासनाकडून करण्याबरोबरच त्या थांबवा, असे आवाहन केले जात आहे. अशातच सचिन डोंगरे नामक व्यक्तीने ‘पेठबीड भागात एका व्यक्तीस मुले पळवून घेऊन जाताना रंगेहाथ पकडले’, ...

ठळक मुद्देखात्री न करता पोस्ट फॉरवर्ड करणे अंगलट

बीड : मुले पळवून नेणारी टोळी बीडमध्ये आली असल्याची अफवा सोशल मीडियावरून दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रत्यक्षात मात्र असे काहीच नसून ही अफवा असल्याचा खुलासा पोलीस प्रशासनाकडून करण्याबरोबरच त्या थांबवा, असे आवाहन केले जात आहे. अशातच सचिन डोंगरे नामक व्यक्तीने ‘पेठबीड भागात एका व्यक्तीस मुले पळवून घेऊन जाताना रंगेहाथ पकडले’, अशी अफवा पसरविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हेच त्याच्या अंगलट आले असून पेठबीड पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

अफवा रोखण्यासाठी पोलिसांकडून कठोर पाऊले उचलली जात असून बीडमध्ये पहिला गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी खात्री न करता आलेल्या पोस्ट फॉरवर्ड करताना विचार करण्याची गरज आहे. मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात विविध अफवा पसरविल्या जात आहेत. यामुळे अनेक निरापराध व्यक्तींना मारहाण होत आहे.

औरंगाबाद, परभणी, जालना येथे मारहाण झाल्यानंतर बीड, परळी व माजलगावमध्ये चोर समजून पाच जणांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीधर यांनी पत्रक काढून या सर्व अफवा असल्याचे सांगितले. नागरिकांनी घाबरून न जाता संशयीत व्यक्ती आढळल्यास त्याला मारहाण न करता जवळील पोलिसांच्या स्वाधीन करा. कसलीच खात्री न करता एखाद्याला मारहाण होत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे माजलगावमध्ये जवळपास १० लोकांवर गुन्हेही दाखल झाले होते.

एवढे करूनही नागरिकांमध्ये अद्याप पुरेसा बदल झाला नसल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावरून फिरणाºया अफवा काही केल्या कमी होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर या अफवा थांबवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.आतापर्यंत ७ लोकांना मारहाणमाजलगाव, परळी, गेवराई व बीडमध्ये आतापर्यंत ७ निरापराध लोकांना नागरिकांनी चोर समजून मारहाण केली आहे. शुक्रवारी दुपारी मांजरसुंबा येथील एका भंगार वेचणाºया इसमास पेठबीड भागात जबर मारहाण करून पोलीस ठाण्यात आणले. याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाल्याने भीती निर्माण झाली आहे.

गावागावात लावले फलकया अफवा असून यावर विश्वास ठेवू नका. कोणालाही मारहाण करू नका. संशयितांना पोलिसांच्या ताब्यात द्या अशा सूचना देऊन त्याखाली संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि बीट अंमलदारांचा मोबाईल क्रमांक टाकून गावागावात फलक लावले आहेत. असे असले तरी अफवांना आळा बसेना झाला आहे. तसेच आता गावात जाऊन दवंडीही देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रमुखांनी केले आहे. 

टॅग्स :BeedबीडCrimeगुन्हाMarathwadaमराठवाडाSocial Mediaसोशल मीडिया